भारतात गंगा जमुना संस्कृती गुण्या गोविंदाने नांदत होती. हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात ही भारताची जगात ओळख आहे. भारताची ही खरी ओळखच पुसून टाकण्याचे काम मागील ९ वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश …
Read More »अखेर नाना पटोले विरोधक माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे देशमुखांचे पक्ष सदस्यत्व ६ वर्षांसाठी निष्कासित
काँग्रेसचे माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांची सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री व शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र …
Read More »संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचे राष्ट्रपतींना निमंत्रणच नाही; विरोधक झाले आक्रमक अखेर ठरलं संसदेच्या नव्या इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, तर विरोधकांचा बहिष्कार...
२८ मे रोजी देशाच्या नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे. सेंट्रल व्हिस्टा या नावाने हा प्रकल्प ओळखला जातो. मात्र नव्या संसद भवनाचे उद्घाटन प्रथेप्रमाणे राष्ट्रपतींनी करणे अपेक्षित असताना या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संसद भवनाचं उद्घाटन करणार असल्याने १९ विरोधी पक्ष आक्रमक झाले …
Read More »नाना पटोले यांचे प्रत्युत्तर, महापुरुषांचा अपमान होत असताना भाजपाची तोंडे बंद का होती? भाजपाच्या राहुल गांधी यांच्यावरील टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर
भारतीय जनता पक्षाने सातत्याने महापुरुषांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्याबदद्ल भाजपाच्या मंत्र्यांनी केलेली विधाने जनता विसरलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेली अवमानजनक वक्तव्ये भाजपाला मान्य आहेत का? महापुरुषांचा अपमान करत असताना भाजपाची तोंडे …
Read More »नाना पटोले यांनी स्पष्ट केले,…. आघाडीतही मेरिटनुसारच वाटप…हे ठराव केले मंजूर काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणी बैठकीत राज्य सरकारच्या निषेधाचे ठराव
विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना मेरिटनुसारच जागा वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जागेचा सखोल अभ्यास करुन जागा वाटपावर चर्चा केली जाईल. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हाच काँग्रेसचा निर्धार असून तोच …
Read More »अतुल लोंढे यांची मागणी, दंगलीस चिथावणी देणाऱ्या आशिष शेलारांना अटक करा मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत कर्नाटकची असल्याचा दाखवून माथी भडकवण्याचा डाव
राज्यातील वातावरण अशांत करुन धार्मिक दंगली भडवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचे आशिष शेलार, नितेश राणे सारखे लोक सामाजिक द्वेष वाढवणारी प्रक्षोक्षक विधाने सातत्याने करत आहेत. मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत कर्नाटकची असल्याचे खोटे सांगून आशिष शेलारांनी जनभावना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे अफवा पसरवून शेलार यांनी राजकीय फायद्यासाठी दंगल भडकवण्याचा …
Read More »संजय राऊत यांचे संकेत, आघाडीतल्या पक्षांना काही जागांची अदलाबदल… तिन्ही पक्षात समन्वय साधण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातही आता निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे पडघम लवकरच वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी लोकसभा निवडणूक तर आता अवघ्या एक वर्षावर येऊ ठेवली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तसेच स्थानिक पातळीवरील बैठकांना जोर आला आहे. महाविकास आघाडीतल्या …
Read More »नाना पटोले यांचा टोला, डॉ. मोहन भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्या मागे चौकशी…. समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीचा भाजपाला एवढा त्रास का?
वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, असा खोचक टोला काँग्रेस …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, हे गणित आहे, म्हणून आता आपण मोठा भाऊ… महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे वक्तव्य
कर्नाटक राज्याचा निकाल लागल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांना आणखी वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना पुढील रणनीती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. तसेच आगामी निवडणूकांची पूर्वतयारी म्हणून जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील या गणितामुळे …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, …सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई का होत नाही? कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट
महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य असून सामाजिक एकोपा राखण्यात महाराष्ट्राचा लौकिक आहे परंतु मागील काही महिन्यातील घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही लोक करत असल्याचे दिसत आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न काही संस्था, संघटना करत आहेत. काही लोक भडकाऊ विधाने करुन वातावरण गढूळ करत …
Read More »
Marathi e-Batmya