Tag Archives: congress

रविंद्र चव्हाण म्हणाले, महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर केले प्रतिपादन

१२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी राज्यभरात क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, या निकालांमधून भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांनी स्पष्ट पसंती दिली आहे. १२ जिल्हा परिषदांपैकी सर्व ठिकाणी भाजपा आणि महायुतीचीच सत्ता येणार असून १२५ पंचायत समित्यांपैकी ५० पेक्षा अधिक ठिकाणी भाजपा सत्ता स्थापन करेल, असे प्रतिपादन भारतीय …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, २ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता तर २ ठिकाणी सत्तेत सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा विचार व संघटन विस्तारासाठी स्वबळावर लढलो

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसचा विचार व संघटनेचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढवल्या. काही ठिकाणी राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर युती वा आघाडी करण्यात आली होती. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने त्यांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे, जे की आघाडी केल्यानं मिळू शकत नाही. जनतेने या निवडणुकीत काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला …

Read More »

हिमंता बिस्वा सरमा यांचा गंभीर आरोप, गौरव गोगाई आणि त्यांच्या पत्नीचे पाकिस्तानी एजंटशी संबध आसाम निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते गोगाई यांच्यावर आरोप

काँग्रेस खासदार गौरव गोगोई, त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न आणि पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख यांच्यात ‘गहन संबंध’ आहेत आणि आयबीकडून मिळालेली माहिती गुप्तपणे शेजारील देशाला पुरवण्यात आली असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी असाही …

Read More »

पवन खेरा यांची भारत-अमेरिका व्यापार करारावरून टीका, नाव नरेंडर काम सरेंडरचे हा करार नाही तर ब्लॅकमेलिंग आहे, भारत म्हणजे अमेरिकेचे डंपिंग ग्राऊंड

काँग्रेसने शनिवारी (७ फेब्रुवारी २०२६) असा दावा केला की भारत-अमेरिका व्यापार करार हा “करार नाही तर देशाच्या स्वाभिमानाचा आणि हितांचा समर्पण” आहे आणि तो भारत आणि देशातील नागरिकांचा विश्वासघात आहे. येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना, काँग्रेसचे मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा म्हणाले की, भारत लवकरच अमेरिकन उत्पादनांसाठी डंपिंग …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतच्या झोपडपट्यांची पाडकाम मोहीम रद्द करा खासदार वर्षा गायकवाड यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

रेल्वे प्रशासनाने कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतच्या ३१५४ झोपड्यांचे पाडकाम करण्याची नोटीस २७ जानेवारी २०२६ रोजी दिली असून या नोटीसीमुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. १० फेब्रुवारी २०२६ ते १२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हे पाडकाम करण्यात येणार आहे. ही पाडकाम मोहीम रद्द करावी तसेच बाधित कुटुंबांसाठी कायमस्वरूपी पुनर्वसन योजना सुरू करावी, अशी मागणी मुंबई …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, राहुल गांधींना बोलण्यापासून रोखले पण भाजपाच्या दुबेला मात्र मोकळीक पंडित नेहरु, इंदिरा गांधींबद्दल अश्लील शब्द वापरून बदनामी करणाऱ्या भाजपा खासदार निशिकांत दुबेला निलंबित करा

लोकसभेतील कामकाज बंद पाडण्यात सत्ताधारी पक्षच आघाडीवर आहे. विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, त्यांचे माईक बंद केले जातात. सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे नियम आणि विरोधकांसाठी वेगळे नियम आहेत असे चित्र आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत असताना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सातत्याने बोलण्यापासून रोखत होते, त्यांचा माईक बंद करत होते. पण भाजपा खासदार …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूण येथे पार पडणार असून या तीन दिवसीय निवासी शिबिरात कोकण विभागातील उमेदवार सहभागी होणार आहेत. या शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर आरोप, काहीजण घुसखोरांचे संरक्षण करतायत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना केला आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, “काही लोक घुसखोरांचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.” पंतप्रधानांनी गुरुवारी राज्यसभेत बोलताना ही टिप्पणी केली. राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “अकार्यक्षम शासना”खाली राहणाऱ्या लोकांना अनिश्चित भविष्याचा सामना करावा लागत आहे, तर सत्तेवर असलेले लोक केवळ राजकीय फायद्यांवर लक्ष …

Read More »

प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींना सवाल, एपस्टीन फाईलला घाबरले? लोकसभा कामकाजातून मोदी यांची उपस्थिती झाली कमी

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा कामकाजातील अनुपस्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सरकार टाळत आहे का, असा सवाल केला. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आज राज्यसभेत राहुल गांधी यांना ‘भोळे’ म्हटल्याबद्दल प्रतिक्रिया देताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, विरोधी पक्षनेत्याला …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अर्थसंकल्पातून सामाजिक न्यायाची भूमिका हरपली अमेरिकेच्या टेरिफचे भारतावर गंभीर परिणाम, जगात जे ४० वर्षात घडले नाही ते घडत असून ही फक्त सुरुवात: संजीव चांदोरकर

पूर्वी अर्थसंकल्पावर मोठ मोठ्या चर्चा होत असत व ते समजावून सांगितले जात असे पण आता बजेटच निरर्थक होत चालले आहे, बजेटची उत्सुकताच राहिलेली नाही आणि हे निराशाजनक व चिंताजनक आहे. राहुल गांधी यांनी बजेटचा हलवा कोणत्या समाज घटकाला मिळतो हे दाखवून दिले, ती सामाजिक न्यायाची टीपणी होती, ही सामाजिक न्यायाची …

Read More »