Tag Archives: congress

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार सेवानिवृत्तीच्या भाषणात, आरोपांचा वाढता ट्रेंड अयोग्यरित्या दोषी ठरविले जात असल्याचा विरोधकांचे नाव न घेता आरोप

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, ज्यांचा निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाचा कार्यकाळ मंगळवारी संपत आहे, त्यांनी निवडणुकीदरम्यान “दिशाभूल करणाऱ्या कथनकांचा वाढता ट्रेंड” असल्याचा इशारा दिला आणि म्हटले की निवडणूक निकाल स्वीकारण्यास तयार नसलेल्यांकडून संस्थेला “अयोग्यरित्या दोषी ठरवले जाते”. त्यांच्या निरोप भाषणात, कुमार यांनी असे प्रतिपादन केले की संस्थांवर “प्रेरित हल्ले” केल्याने जनतेचा …

Read More »

अहमद पटेल यांचे चिरंजीव फैसल पटेल यांची काँग्रेसपासून फारकत राजकीय प्रवासातील वैयक्तीक दुःख आणि निराशेमुळे काम थांबविण्याचा निर्णय

कधी काळी काँग्रेसचे प्रमुख रणनीतीकार आणि बॅकरूम स्ट्रेटेजिस्ट राहिलेले आणि सोनिया गांधी यांचे प्रमुख सल्लागार राहिलेल्या अहमद पटेल यांचा मुलगा फैसल पटेल यांने काँग्रेसपासून फारकत घेत काँग्रेसचे काम थांबविण्याचा निर्णय एक्स या सोशल मिडीवरून जाहिर केला. तथापि, दिवंगत अहमद पटेल यांचे पुत्र फैसल यांनी त्यांच्या राजकीय प्रवासातील वैयक्तिक दुःख आणि …

Read More »

नवनियुक्त प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या मंगळवारी पदग्रहण सोहळा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता सोहळा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा उद्या मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतील. या कार्याक्रमात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीने काँग्रेसच्या नेत्यांकडून आश्चर्य आणि समाधानही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मी तर सतेज पाटील यांचे नाव सुचविले होते

राज्यातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांच्या जागी नव्या व्यक्तीची निवड करण्याची चाचपणी काँग्रेसकडून करण्यात येत होती. मात्र राज्याच्या राजकारणात फारसे परिचित नसलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांची निवड काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदी केली. त्यामुळे काँग्रेसमधील मुरब्बी नेत्यांबरोबरच तरूण नेत्यांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष पदासाठी …

Read More »

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांचा आरोप, हा अपघात नव्हे तर हत्याकांड दर तासाला १५०० जनरल डब्ब्याची तिकिटे विकली जात होती

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर जे घडले ते अपघात नव्हते तर हत्याकांड होते, सुरक्षेचा मोठा अभाव आहे. रेल्वे प्रशासनाला मोठ्या संख्येने भाविकांच्या आगमनाची अपेक्षा होती. १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली स्टेशनवर दर तासाला १५०० जनरल तिकिटे विकली जात होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मृत्युची आकडेवारी लपवण्यात व्यस्त आहेत. याप्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा …

Read More »

नाना पटोले यांची टीका, शेतकऱ्यांना म्हणणारे भाजपा युतीचे सरकारच भिकारी एक रुपयात पीक विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करते काय?

भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे वारंवार उघड झाले आहे. शेतकऱ्याला अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा अपमान केला आता राज्यातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दलचे विधान सत्तेचा माज आल्याचे दर्शवते. शेतकरी भिकारी नाही तर शेतक-यांसह सर्वसामान्य …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या अन्नदाता शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिम्मत होतेच कशी? काही संवेदना आहेत की नाही?

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक रूपयाची भीक आता भिकारीही घेत पण आम्ही शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा दिल्याचे आक्षेपार्ह वक्यव्य केले. त्यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भाजपा युती …

Read More »

वक्फ विधेयकावरून संसदेत गोंधळ, सत्ताधारी आणि इंडिया आघाडीचे सदस्य आमने-सामने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आश्वासनानंतरही विरोधकांचा अखेर सभात्याग

गुरुवारी मांडण्यात आलेल्या वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ वरील संयुक्त समितीच्या अहवालावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एनडीए आणि विरोधी खासदारांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी निषेध नोंदवला, खासदारांनी दावा केला की अंतिम अहवालातून असहमतीच्या नोट्सचे काही भाग काढून टाकण्यात आले आहेत. लोकसभेत, वक्फ मालमत्तेची नोंदणी सुलभ करण्याच्या …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार आहे? महिनाभरात ८ मृत्यू होऊनही राज्य सरकारला जीबीएस आजाराचे गांर्भीय नाही

राज्यात जीबीएस GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहे परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी …

Read More »

सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करा सरकारने न्याय दिला नाही तर लाखो आंबेडकरी जनतेचा ३ मार्चला मंत्रालयाला घेराव

परभणीमध्ये संविधानाची विटंबना केल्यानंतर संतप्त जनता रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोंबिंग ऑपरेशन करून शेकडो आंबेडकरी जनतेला बेदम मारहाण केली, अनेक निष्पाप नागरिकांना अटक केली. आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यालाही अटक करुन कोठडीत मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला पण सरकारने या प्रकरणी पोलिसांवर …

Read More »