काँग्रेसचे आजपर्यंत ८९ अध्यक्ष झाले, त्यात सर्व जाती धर्माचे, महिला, पुरुष, आदिवासी, एससी, एसटी, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माचे नेते होते. काँग्रेसने विकासाची कामे करताना त्याची फळे सर्व जाती धर्माला मिळावीत हेच पाहिले पण आता भाजपावाले त्यांना मुस्लिम समाजाची खुप काळजी असल्याचे दाखवत आहेत. मुस्लिम महिलांच्या हितासाठी तीन तलाक व गरिब मुस्लिमांसाठी वक्फ बोर्ड कायदा आणला …
Read More »नागपूरमध्ये बुधवारी १६ एप्रिल रोजी काँग्रेसचा ‘सद्भावना शांती मार्च’ रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली
राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक जातीधर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूरमध्ये मागील महिन्यात धार्मिक हिंसाचार उफाळला होता त्यामागे याच शक्ती होत्या. राज्यात शांतता नांदावी ही काँग्रेसची भूमिका असून सामाजिक सद्भाव वाढीस लागला पाहिजे, याच हेतूने प्रदेश काँग्रेसने प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी नागपूरमध्ये …
Read More »२०२३-२४ मध्ये कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळाला? निवडणूक आयोग आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटीक रिफॉर्म्सची माहिती
२०२३-२४ मध्ये, इलेक्टोरल ट्रस्टने राजकीय पक्षांना सर्वात मोठी रक्कम दान केली असताना, निवडणूक आयोगाने (EC) प्रकाशित केलेल्या आणि अलीकडेच असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) द्वारे संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, पायाभूत सुविधा आणि फार्मास्युटिकल कंपन्या पुढील सर्वात मोठ्या देणगीदार होत्या. या कंपन्यांपैकी, किमान पाच कंपन्यांच्या विविध केंद्रीय एजन्सींच्या चौकशीला सामोरे जावे लागत …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मोदीजी, सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार? पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत हास्यास्पद व अशोभनीय
संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरुंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार? असा थेट सवाल काँग्रेस …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकरः आंबेडकरवादी विचारांचे सामाजिक प्रतिबिंब आणि सद्यस्थिती ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्या बारामती येथील राज्यस्तरीय राजकिय परिषदेतील भाषणाचा संपादित भाग
सर्वप्रथम आंबेडरवादी विचार काय आहेत हे समजून घेतले पाहिजे. अर्थात मर्यादित वेळेत जे मी मांडणार आहे ते काही परिपूर्ण आंबेडकरवादी विचार असे म्हणता येणार नाही. आंबेडकरवादी विचाराची फार मोठी व्याप्ती आहे. माणूस, समाज, देश डआणि जग व्यापून टाकणारा विचार एका तासात मांडणे केवळ अशक्य. आणि त्याही पेक्षा तो मांडण्याची माझीही …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही राज्यपाल आरएन रवी यांची वादग्रस्त कृती इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जय श्री राम म्हणणास सांगितल्याने नव्या वादाला तोंड फुटले
तामिळनाडूतील द्रमुक सरकारला काम न करू देता, विधानसभेने दोन दोन वेळा पारित केलेली विधेयके राष्ट्रपतींनाकडे पाठवून दिल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांना चांगलेच फटकारले. त्यानंतरही राज्यपाल आरएन रवी यांनी आता त्यांच्या एका आवाहनातून नव्या वादाला तोंड फोडले आहे. मदुराई येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना …
Read More »अदानीने केलेली वीज दरवाढ मुंबईकरांचा खिसा रिकामा करणार महागाईच्या आगडोंबात मुंबईकरांना अदानीच्या वीज दरवाढीचा फटका
मुंबईकर उन्हाच्या तडाख्याचा सामना करत असताना अदानी कंपनीने केलेल्या वीज दरवाढीमुळे मुंबईकरांना जोरदार झटका बसणार आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने होणारी दरवाढ म्हणजे ‘आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावली जात असून उन्हात होरपळणाऱ्या मुंबईकरांना अदानीच्या वीज दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. अदानीने ही वीज …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शेतकऱ्यांच्या आत्महत्येस फडणवीस सरकारच जबाबदार… उदयन राजे भोसले बंच ऑफ थॉटवर गप्प का?
राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने निवडणुकीत जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर जनतेचा विश्वासघात केला. लाडक्या बहिणी, एसटी कामगार व शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. शेतमालाला भाव नाही, पीक विमाची भरपाई नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, अशा अस्मानी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी जीवन संपवत आहे, हे महाराष्ट्रासाठी …
Read More »नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या मालमत्ता ताब्यात मालमत्ता ताब्यात घेण्याच्या ईडीकडून कारवाईला सुरुवात
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी संबंधित मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कार्यवाही सुरू केली आहे. ११ एप्रिल रोजी, केंद्रीय तपास यंत्रणेने दिल्ली, मुंबई आणि लखनऊ येथील मालमत्ता रजिस्ट्रारना नोटीस बजावल्या, जिथे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या फायदेशीर मालकीची कंपनी यंग …
Read More »राज्यमंत्री अर्जून मेघवाल म्हणाले, डॉ. आंबेडकरांचा भाजपाने राखला सन्मान भाजपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यशाळा संपन्न
संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला तर भारतीय जनता पार्टीने अनेक कृतींमधून बाबासाहेबांचा सन्मान राखला. विरोधकांनी बाबासाहेब, संविधान आणि भारतीय जनता पार्टी बाबत पसरवलेल्या खोट्या नरेटिव्हला छेद देत कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत सत्य पोहोचवावे असे आवाहन केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी शुक्रवारी केले. प्रदेश भाजपातर्फे …
Read More »
Marathi e-Batmya