Tag Archives: devendra fadnavis

देवस्थान जमिनप्रकरणी जयंत पाटील यांच्या प्रश्नावर फडणवीसांचे चार महिन्यात तपासाचे आश्वासन सरकार बदलताच तक्रारदाराचे संरक्षण काढत त्याच्या विरोधातच गुन्हे दाखल

विधानसभेचे कामकाज सुरु होताच हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण कोणीही खपवून घेऊ शकत नाही. या प्रकरणात तक्रारदाराचे सरंक्षण केले पाहिजे होते. मात्र उलट सरकार बदलल्यानंतर तक्रारदाराचे संरक्षण काढण्यात आले, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ही बाब अयोग्य आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र …

Read More »

उपकार प्राप्त इमारतींचा वाढीव सेवाशुल्क कर रद्दः २० हजार कुटुंबियांना होणार लाभ २५० रुपयेच घेणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

मुंबईतील म्हाडाच्या उपकार प्राप्त इमारतींना महिन्याला आकारण्यात येणारे वाढीव सेवाशुल्क रुपये ६६५.५० रद्द करुन जुन्या दराने २५०/- रुपयेच आकारण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी विचारेल्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. तसेच या इमारती धोकादायक झाल्या …

Read More »

अजित पवारांचा आरोप, प्रत्येक आमदाराला मंत्री करतो म्हणून सांगितलं होतं पण… आमचं सरकार असताना सरसकट निधी वाढविला

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन होताच महाविकास आघाडीतील कामांना सरकारने स्थगिती दिली. आमदारांनी सोबत यावे म्हणून आमदारांना मंत्रिपदाच आश्वासन दिले. त्यामुळे दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झाला नसल्याची खोचक टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …

Read More »

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप,…वैधतेबाबत शंका असल्यानेच निवडणूका पुढे ढकलतायत शिंदे-फडणवीस सरकारवर टांगती तलवार आणि विरोधात वातावरण

महाविकास आघाडी एकत्रित निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी आणि जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे प्रयत्नशील आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारत आयोगाच्या आयुक्त पदाच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारला आदेश दिले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर अवैधतेची टांगती तलवार असून शिंदे-फडणवीसांनाही त्यांच्या …

Read More »

निवडणूक निकालावर अजित पवारांचा खोचक टोला, त्यांच्यातच जोम आहे? आमच्यात जोम नाही? सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीच आला नाही..

कसब्यात २८ वर्षांपासूनचा भाजपाचा बालेकिल्ला काँग्रेसनं जिंकला असून चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांच्या रुपाने भाजपानं जागा राखली आहे. या निवडणुकांवरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. चिंचवडमध्येही जगताप यांच्याविरोधातील दोन उमेदवारांच्या मतांची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त असल्याचं सांगत विरोधकांनी तो भाजपाचा नैतिक पराभव असल्याचा दावा केला. यावरच आज पाथर्डीमध्ये झालेल्या कार्यक्रमात अजित …

Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, … नुकसान मोठं पण सरकार शेतकऱ्यांच्या सोबत होळीचे रंग अर्थसंकल्पातून दिसून येतील

राज्यातील कोकण विभागातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने झोडपून काढले. तर काही ठिकाणी गारा बरसल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य सरकारकडून काय मदत जाहिर करणार अशी विचारणा करण्यात आला त्यावर उत्तर देताना …

Read More »

विरोधी पक्षांनी लिहिलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांचे प्रतिक्रिया, तरीही सुटका नाही भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा देण्याचे काम

महाराष्ट्रापाठोपाठ, झारंखडचे मुख्यमंत्री सोरेन, दिल्लीतील आम आदमी पार्टीचे उपमुख्यमंत्री, पश्चिम बंगाल मध्ये तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बँनर्जी, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षाच्या आमदारांवर विविध यंत्रणांकडून दबाव आणत त्यांचे सरकार अस्थिर करण्यात आले. पैकी दिल्लीचे आम आदमी पार्टीचे नेते तथा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांची प्रदीर्घ चौकशी करून अटकेची कारवाई …

Read More »

१५० रू.त महिनाभराचे राशन बाजारात मिळते का हो? गतिमान सरकारचा सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यासाठी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

कोरोना काळापासून संपूर्ण देशभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. त्यातच महागाईचा आगडोंब उसळलेला असतानाच अनेक सर्वसामान्य नागरीकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तर दुसऱ्याबाजूला ८ वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील तीन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासन दिलेले असताना राज्यातील एकाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट सोडा शेतीसाठी केलेला खर्चही मिळणे दुरापास्त …

Read More »

अंधारेंच्या टीकेला बच्चु कडूंचे प्रत्युत्तर, आमची स्वतःची पानटपरी..कुठे लावायची ते आम्ही ठरवू आम्ही विकासासाठी गुवाहाटीला गेलो

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यानंतर शिवसेनेचे ४० आमदार आणि पाठिंबा देणारे १० अपक्ष आमदारही बंडात सहभागी झाले. त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुतच आहे. त्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा पक्ष बांधणीच्या उद्देशाने शिवगर्जना यात्रा सुरु केली असून ही शिवगर्जना यात्रा घेऊन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या अमरावतीत …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली घोषणा

शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज सांभाळणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत व मंत्री उदय सामंत यांनी …

Read More »