महाराष्ट्रातील जनतेसमोर निसर्गाने संकट उभे करुन मोठे प्रश्न निर्माण केले आहेत मात्र अजूनही सरकार जाग्यावर आलेले नाही त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन करुन लोकांना तात्काळ मदतकार्य सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नांदेड दौऱ्यावर …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले “हे” अन्य तीन निर्णय झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कालावधी, मोफत बुस्टर डोस योजना राबविण्याचा निर्णय
राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसला तरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत निर्णय घेण्याचा धडका लावण्यास सुरुवात केलेली आहे. आज झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाच्या पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडूण देण्याचा निर्णय, …
Read More »काँग्रेसचा टोला, पावसाने १०० वर मृत्यू, लाखो हेक्टर शेती पाण्याखाली अन् ‘सरकार’ बेपत्ता.. शिंदे-फडणवीसांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे महाराष्ट्र अनाथ
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला १५ दिवस झाले तरी अजून मंत्रिमंडळच अस्तित्वात आलेले नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची दुचाकीच काम पहात आहे. राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून १०० वर लोकांचे मृत्यू झालेत तर लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शिंदे-फडणविसांच्या सत्तापिपासूवृत्तीमुळे सरकार स्थापन झाले असले तरी प्रत्यक्षात शासन व प्रशासन राज्यात …
Read More »मविआने स्थगिती दिलेल्या मात्र फडणवीसांच्या काळातील ‘त्या’ चार निर्णयांना पुन्हा मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मान्यता
२०१९ साली सत्तांतर करत औटघटकेचे देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारला घालवित नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने २०१७ ते १९ काळात फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आतच पुन्हा महाविकास आघाडी सरकारला घालवित राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी ‘या दोन’ योजना राबविणार "स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी - २.०" आणि अमृत २.० योजना-राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्दा निकाली सर्वोच्च न्यायालयाकडून निघण्याच्या उंबरठ्यावर असताना त्या पाठोपाठ शहरी आणि ग्रामीण भागातील निवडणूकांचे बिगुलही कधीही वाजण्याची शक्यता असताना या दोन्ही भागांच्या विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आज दोन योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान …
Read More »निवडणूकांच्या तोंडावर शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय: पेट्रोल ५ तर डिझेल ३ ने स्वस्त ६ हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर
एकाबाजूला राज्यातील ओबीसींच्या राजकिय आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, तर दुसऱ्याबाजूला राज्य सरकारच्या वैधतेच्या प्रश्नाबाबतची याचिकाही न्यायालयात प्रलंबित असतानाच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची प्रक्रिया सध्या सुरु आहे. यापार्श्वभूमीवर आगामी जय-पराजयाची राजकिय गणिते मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन मंत्र्यांमध्ये झालेल्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोलवरील …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा नाव घेता उध्दव ठाकरेंना टोला, अडीच वर्षापूर्वीच हा… द्रोपदी मुर्म यांच्या पाठिंब्याच्या निर्णयानंतर लगावला टोला
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित महाविकास आघाडी सरकारला खाली खचले. त्यानंतर तरीही आपण शिवसेनेतच आहोत असे वांरवार सांगत महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपाशी समझौता करण्यासाठी एकप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न त्या ५० बंडखोर आमदारांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी …
Read More »महेश तपासेचा केसरकरांवर पलटवार; बेकायदेशीर प्रवक्त्यांचे बेजाबदार वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्युत्तर
दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेना फुटीमागे शरद पवार हेच होते असा खळबळजनक आरोप करत नारायण राणे, राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्या बंडामागे तेच होते. तसेच ही माहिती आपणास शरद पवार यांनीच दिल्याचा दावा केला. या आरोपावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय मुख्य सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्यपूर्ण संपर्काचे निर्देश
राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गुरू पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दादर …
Read More »ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या संतोष बांगर यांची मुख्यमंत्री शिंदेकडून पुन्हा नियुक्ती हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती कायम
बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन करणाऱ्या आणि बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशीपर्यत उध्दव ठाकरे सोबत राहिलेल्या संतोष बांगर यांनी रात्रीतून आपली निष्ठा बदलून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. त्यांच्या या दलबदलू भूमिकेच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संतोष बांगर यांची हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केल्याचे जाहिर केले. त्यानंतर संतोष बांगर यांनी …
Read More »
Marathi e-Batmya