Tag Archives: mahavikas aghadi

एकनाथ शिंदे यांचे मविआला आव्हान, समोरा समोर येऊन चर्चा करा अडीच वर्षात काय केले

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक राजकिय पक्षाकडून आपलाच उमेदवार निवडूण यावा यासाठी सर्वच राजकिय पक्षाच्या नेत्यांकडून प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत आहे. भाजपाच्या आशिर्वादाने अडिच वर्षापूर्वी जन्माला आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची वैजापूर येथे सभा आयोजित करण्यात आली …

Read More »

काँग्रेसचे १६ बंडखोर उमेदवारांना ६ वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कारवाई

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केलेल्या १६ जणांना काँग्रेस पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून काव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी ही माहिती दिली आहे. …

Read More »

मविआकडून विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रनामा जाहिरनामाः काय आहेत आश्वासने महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, खोके सरकार खाली खेचून मविआचे सरकार आणा: मल्लिकार्जून खर्गे

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी मविआ अर्थात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहिरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील भव्य पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय कामे करणावर व पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. या महाराष्ट्रनामामध्ये महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात दिले …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल,… भाजपाने काय दिले बटेंगे, कटेंगेचे काम भारतीय जनता पक्षाचे

जनतेला दिलेल्या आश्वसनांची नेहमीच काँग्रेस पक्षाने पूर्तता केली. युपीए सरकारनेही मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार, शिक्षण हक्क कायदा दिला. आताही काँग्रेस पक्षाने हिमाचल प्रदेश, कर्नाटक व तेलंगणातील जनतेल्या दिलेल्या गॅरंटींची पूर्तता यशस्वीपणे केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आकडेवारीसह स्पष्ट सांगत नरेंद्र मोदींनी १२ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री व …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेस हल्लाबोल, शाही परिवारासाठी एटीएम काँग्रेस व मित्रपक्षांच्या तोंडी पाकिस्तानची, विभाजनवाद्यांची भाषा

जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीला सत्ता मिळताच तेथे कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. पाकिस्तान, विभाजनवादी शक्ती, अतिरेकी प्रवृत्ती आणि भारतविरोधी शक्ती ३७० रद्द करण्याची मागणी करतात, त्याचाच पाठपुरावा काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष करू लागले आहेत,असा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर देशविरोधी शक्तींच्या मागणीचा समर्थनाचा आरोप …

Read More »

योगेंद्र यादव यांची भाजपावर टीका, ‘झूट, लूट, फूट सरकार’ विचारांच्या ताकदीने लढाई जिंकता येते – आमदार विनोद निकोले

देशभरात विविध मुद्द्यांवरून चर्चा होत असताना, डहाणू येथे गुरुवारी झालेल्या सभेत भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय निमंत्रक योगेंद्र यादव यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील भाजपा-शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यादव यांनी सरकारवर “झूट, लूट, फूट सरकार” असल्याचा आरोप करत सत्ताधारी नेत्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे केले. यावेळी योगेंद्र यादव म्हणाले, “पंतप्रधान …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठाचा जाहिरनामा प्रकाशित, शिवरायांचं मंदिर ते मोफत शिक्षण…. आणखी काय काय दिली आश्वासनं जाणून घ्या

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच काँग्रेस महाविकास आघाडीकडून राज्यातल्या जनतेसाठी पंचसूत्री जाहिर केली. त्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा पक्षाचा वचननामा अर्थात जाहिरनामा प्रसिद्ध केला. यावेळी छोटेखानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वचननामा काय आहे याची माहिती दिली. कुटुंबप्रमुखांचा वचननामा! अन्नसुरक्षा: शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, देवाभाऊ जिकडे जाऊ तिकडं खाऊ महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत तरूणासाठी केली घोषणा

महाविकास आघाडीच्या झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी, शरद पवार यांनी राज्यातील शेतकरी आणि महिलांसाठी गॅरंटी जाहिर केली. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कर्नाटक, तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला देण्यात आलेल्या गॅरंटी कायम देण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी मविआच्या वतीने महिला आणि शेतकऱ्यांसाठी गॅरंटी देण्यात आली. यावेळी शिवसेना उबाठाचे प्रमुख …

Read More »

काँग्रेस-महाविकास आघाडीच्यावतीने राहुल गांधी यांच्याकडून या गॅरंटी जाहिर महिलांना मोफत प्रवास आणि बँक खात्यात थेट ३ हजार रूपये देणार

विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राज्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुमारंभ करत महाविकास आघाडीची पहिलीच प्रचारसभा आज बीकेसीतील एमएमआरडीच्या मैदानावर पार पडली. या विधानसभा निवडणूकीला नजरेसमोर ठेवत राज्यातील जनतेसाठी पाच वचनांची गॅरंटी यावेळी जाहिर करण्यात आली. यातील पहिल्या गॅरंटीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, राज्यातील महिलांना महाराष्ट्रात कोठेही प्रवास मोफत करण्यात येणार …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत BKC मधील सभेत मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी काँग्रेसच्या ‘गॅरंटी’ जाहीर करणार.

काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर …

Read More »