Tag Archives: maratha reservation

मंगेश साबळे यांनी सदावर्तेंच्या गाड्या फोडण्याच सांगितलं कारण ? जामीन दिल्यानंतर सदावर्तेंची कार का फोडली यांचं कारणही मंगेश साबळेंनी सांगितलं

मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे अॅड. गुणरत्न सदावर्तें यांची गाडी मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळची पहाटे फोडली. यावेळी गाडी फोडणाऱ्यांनी एक मराठा लाख मराठा, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातील गाड्या फोडल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. …

Read More »

सुनिल तटकरे यांचे आवाहन, मराठा समाजातील तरुणांनो…सहकार्य करा राज्य सरकारने दिलेले आरक्षण टिकले पाहिजे, कायद्याचा आधार असला पाहिजे

सकल मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने अनेक मोर्चे काढले. त्यावेळी कुठे गालबोट लागले नाही मात्र आज जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. सरकारने आरक्षण मिळावे यासाठी पाऊले टाकली आहेत, आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनो राज्य सरकारने दिलेले आरक्षण टिकले पाहिजे, कायद्याचा आधार असला पाहिजे त्यासाठी सहकार्य …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, पंतप्रधान मोदी यांनी जरांगे पाटील यांची भेट घ्यावी दिड वर्षे काय करत होतात

मराठा आरक्षणावर आता खूप लोकांनी बोलून गोंधळ घालू नये. नेमकेपणाने तो प्रश्न कसा सुटेल त्यादिशेने विचार करण्याची गरज आङे. कोणालाही काही विचारलेय आणि कोणी काहीही बोलतेय असा त्याचा विचका करू नये नेमकेपणाने काम करून मराठा समाजाला न्याय दिला गेलाच पाहिजे. ती आमचीही मागणी आहे. आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडणारे ते तिघे कोण ? आरक्षणासाठी यातील एकाने जाळली होती स्वतःची गाडी सदावर्ते यांची फुल्ली ऑक्टोमॅटिक गाडी फोडणारे ते तीन मराठा आंदोलक कोण ?

मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची पहाटे सकाळी मराठा आंदोलनकांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे तसेच सदावर्ते यांच्या इमारतीबाहेर पोलिसांची गाडी सुद्धा उभी करण्यात आली आहे. प्रथमदर्शी यांच्या म्हणण्यानुसार आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची शपथ घेत घोषणा, रक्ताचा थेंब असे पर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार त्यांची काय तिकडे टोमणे सभा सुरु

माझी मराठा समाजाच्या मुलांना हात जोडून एकच विनंती असून तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका. तुमच्या नंतर तुमच्या घरच्यांना कोण बघणार, जर तुम्हीच नसाल तर या आरक्षणाचा उपयोग काय असा सवाल करत मी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतो असे म्हणत (मंचावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत) या एकनाथ शिंदेचा …

Read More »

अजित पवार यांनी स्पष्टच केले, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता… राज्यात जातीनिहाय जनगणना करा

ओबीसी समाजाला आणि अनुसूचित जाती-जमातीसह सध्या ६२ टक्के आरक्षण असून मराठा समाजाला उरलेल्या ३८ टक्क्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत अभ्यास सुरू आहे. मात्र, ओबीसीमधील आरक्षणाला धक्का न लावता आणि न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर होते. माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ओबीसी जनगणनेला विरोध नाही… ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही

ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. याबाबतची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाबाबत टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. नागपूर विमानतळावर आगमन झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी जनगणनेच्या …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी भाजपा सरकारला १० वर्ष का लागावी ? आरक्षणप्रश्नी सरकारने भूमिका स्पष्ट करुन मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवावी

राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ट्रिपल इंजिन सरकारची आरक्षणप्रश्नी स्पष्ट भूमिका नसल्याने हा गुंता वाढत चालला आहे. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही. सरकारमधील मंत्री बोलतात एक तर दुसरीकडे जाहिरात देऊन वेगळाच संदेश देत आहेत, ही गोंधळाची परिस्थिती …

Read More »

राज्य सरकारच्या जाहिरातीवर अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल मराठा आरक्षणासाठी संसदेत घटनादुरुस्ती करण्याची मागणी

मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या जाहिरातीवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने आज प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणासंदर्भात ठळकपणे प्रकाशित केलेल्या जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे भावनिक आवाहन, …भावांनो टोकाचे पाऊल उचलू नका मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील...

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन दिवस शिल्लक राहिल्याची आठवण करून दिली. तसेच २५ तारखेला मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी पुढील रणनीती जाहिर करणार असल्याची घोषणा करत आमरण कडक उपोषण करणार असल्याचे जाहिर केले. तसेच जोपर्यंत मराठा समजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत गावाची सीमाही शिवू देणार नाही असा …

Read More »