Breaking News

Tag Archives: mla

राज्याची तिजोरी रिकामी ? वाळूच्या महसूल बुडविण्याला कोण देतय साथ शिंदे गटाचे आणि भाजपाच्या आमदारांच्या विरोधात महसूल विभागाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी

मागील काही वर्षात राज्य सरकारकडून जनतेला खुष करण्यासाठी सातत्याने विविध घोषणा केल्या जात आहेत. त्यातच आता तर राज्याच्या तिजोरीला मोठा खड्डा पडला असतानाही राज्यातील जनमानस पुन्हा स्वतःच्या पक्षाकडे वळविण्यासाठी दुसऱ्या राज्यातील घोषणाही आर्थिक कुवत नसताना विद्यमान सरकारकडून जाहिर केल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यातील गौणखनिज अर्थात मुरूम, वाळू, माती आदी गोष्टीतून …

Read More »

मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत शुक्रवारी बैठक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश

मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर हैराण झाले आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या दालनात शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे. आज विधानसभेत आज आमदार अॅड आशिष शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खार दांडा, गझदरबांध आणि वांद्रे परिसरातातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारी विधानसभेत …

Read More »

आमदार रविंद्र वायकर शिंदे गटातः मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्याचे स्पष्टोक्ती

आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर ठाकरे गटातील उर्वरित आमदार खासदारांना शिंदे गटात ओढण्याचे काम भाजपाच्या त्या यंत्रणांच्या मार्फत सध्या युध्द पातळीवर सुरु आहे. त्या अनुषंगाने ठाकरे गटाचे निष्ठावान आमदार असलेले रविंद्र वायकर यांनी त्यांच्या कथित हॉटेलवर पडलेल्या ईडी आणि पोलिसांच्या पडलेल्या धाडींना कंटाळून अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नेतृत्वाखालील गटात …

Read More »

रविंद्र वायकर यांच्या घरी ईडी, तर राजन विचारे यांच्याकडे आयकर विभाग

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत महाराष्ट्रातील जवळपास ४४ आमदारांनी एका फटक्यात पक्ष प्रमुखाला न विचारता आणि घटनात्मक ( शिवसेनेच्या नव्हे राज्यघटनेतील) तरतूदींना बाजूला सारत केंद्रातील महाशक्तीच्या (भाजपा-अमित शाह-नरेंद्र मोदी) च्या पाठिंच्या बळावर महाराष्ट्रात राज्य सरकार स्थापन करत जवळपास २ वर्षे झाले चालविलेही. या सगळ्या घडामोडीत पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यास …

Read More »

कॉम्रेड विनोद निकोले म्हणाले, वाढवण बंदराला या ८ मुद्यांमुळे स्थानिकांसह आमचाही विरोध

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असल्याने आमचाही विरोधच असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी नुकतेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी आमदार निकोले म्हणाले की, वाढवण बंदर …

Read More »

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे उतरणार कोकणातील खळ्यात

सध्या देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूकापैंकी दोन राज्यातील विधानसभेच्या निवडणूका पूर्ण झाल्या आहेत. तर दोन राज्यातील निवडणूकाांसाठी लवकरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदारांवरील सुनावणीला वेग दिला. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका लोकसभेच्या निवडणूकांसोबत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच …

Read More »

प्रकाश सोळंके यांचा आरोपः बंगला, गाड्या जाळण्यामागे मराठा नव्हे तर राजकीय विरोधक अजित पवार गटाच्या प्रकाश सोळंकेचा स्थानिक प्रतिस्पर्ध्यावर आरोप

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील बंगला आणि गाड्या जाळण्यामागे मराठा आंदोलक नसून यात राजकीय विरोधक तसेच अवैध धंदे करणाऱ्यांचा हात असल्याचा आरोप अजित पवार गटाचे आमदार सोळंके यांनी आज येथे केला. या प्रकरणात पोलिसांची भूमिका केवळ बघ्याची होती अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली . आमदार प्रकाश …

Read More »

प्रविण दरेकर यांनी दिला खोचक सल्ला, संजय शिरसाटांनी क्षमतेत बोलावे संजय शिरसाट यांच्या देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावे विधानावरून सल्ला

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चांगलेच कान टोचले आहेत. संजय शिरसाट यांनी आपल्या क्षमतेत बोलावे, असा सल्ला दरेकर यांनी दिला. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज वक्तव्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात चांगले काम …

Read More »

कांदा प्रश्नावरून बच्चू कडू यांचा प्रहार, हे नामर्दाचं सरकार…फक्त ग्राहकांचा विचार करणार केवळ सत्ता टीकविण्यासाठी हे सगळं

नुकतेच राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेल्या दादा भुसे यांनी कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही असे वक्तव्य करत जर कांदा महाग झालाय असं वाटत असेल तर खावू नका असे सांगत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यातच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेल्या ४० टक्के शुल्कावरून राज्यात राजकिय …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला २४ तास होण्यापूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्यांवर कारवाईला सुरूवात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल तर माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ

काल विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाकाळात मृत पावलेल्या लोकांना सोडणार नाही असा गर्भित इशारा ठाकरे गटाला दिला. त्यास २४ तास उलटत नाही तोच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पुढे येत असून त्यांच्यावर मृतांसाठी लागणाऱ्या बँगेच्या …

Read More »