Tag Archives: mumbai

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलांवामध्ये किती आहे पाणी साठा पाणी कपातीचा निर्णय रद्द होणार की तसाच पुढे सुरु राहणार

मान्सूनच्या आगमनाला उशीर झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये वापरा योग्य कमी पाण्याचा साठा राहिला. यापार्श्वभूमीवर पाणी कपातीचा निर्णय मुंबई महानगरापालिकेने घेतला होता. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईसह काही भागात सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आणि धरणक्षेत्रात थोडा थोडा करीत आता ५०.१८ टक्के पाणी …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर ई-समर्थ प्रणालीच्या माध्यमातून पहिल्यांदाच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश

मुंबई विद्यापीठातील शैक्षणिक विभाग, मान्यताप्राप्त संस्था आणि संलग्नित महाविद्यालयातील ( स्वायत्त महाविद्यालये वगळून) पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच ई-समर्थ प्रणालीच्या माध्यमातून ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाने प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषांने एकेडॅमिक बँक ऑफ …

Read More »

मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन, मुंबईतील एसआरए प्रकल्पातील अडचणीसंदर्भात दोन आठवड्यात बैठक झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार

झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर एखादी झोपडी मालकांने विकली तर नव्याने झोपडे घेणाऱ्या मालकांचे नाव परिशिष्ट २ मध्ये समाविष्ट करण्याबाबत मुंबईतील बहुसंख्य एसआरए योजनांमध्ये निर्माण झालेला मोठा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झालेल्या प्रश्नांवर बोलताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत उच्चस्तरिय बैठक दोन आठवड्यात घेण्याचे आश्वासन विधानसभेत दिले. विधानसभेत …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा मंत्री लोढा यांना इशारा, २४ तासात रिकामे करा अन्यथा… पालकमंत्र्यांचा पालिकेशी संबध काय?

राज्यात सत्तापालट होऊन जवळपास एक वर्ष झाला. तसेच मुंबई महापालिकेची मुदत संपून त्यासही कालावधी लोटला. त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या जीवावर सुरु आहे. त्यात मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महापालिकेच्या दालनात कार्यालय थाटल्याची माहिती पुढे आली. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा नेते …

Read More »

इर्शाळवाडी दुर्घटना : शोध आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू मुख्यमंत्री घटनास्थळावर मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळवाडी येथील वस्तीवर काल रात्री दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेत मदतकार्याला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे, आमदार …

Read More »

पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस तर रायगड, रत्नागिरीत पूर परिस्थिती

मागील पंधरा दिवसापासून जवळपास दडी मारलेल्या पावसाने काल पासून सक्रिय होत आज मुंबईसर राज्यभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांपासून पावसानं जोर पकडला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असल्याची माहिती पुढे येत असून पावसामुळं रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती …

Read More »

किरीट सोमय्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी केली सखोल चौकशीची घोषणा अंबादास दानवे, अनिल परब यांच्या मागणीनुसार सखोल चौकशी करण्याचे दिले आश्वासन

ईडी सारख्या तपास यंत्रणांचा धाक दाखवित आणि भाजपा पक्ष संघटनेत आणि विधान परिषद, राज्यसभा आदी ठिकाणी पद देण्याचे आमिष दाखवित भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महिलांचे लैगिंक शोषण करत असल्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या व्हिडीओवरून विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ( …

Read More »

आजचा दिवस मान्सूनचाः २०० हून अधिक मिमी मान्सून बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये बरसणार

आधीच राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सून पावसाने जूनच्या अखेरीस येऊनही जून महिन्यातील तूट भरून काढल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता जुलै महिना अर्धा संपला तरी अद्याप पावसाने अद्याप मुंबईसर राज्यातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली नसल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांवर दुभार पेरणीचे संकट ओढावले असण्याची …

Read More »

मुंबईत सरकत्या जिन्यासह असलेल्या पहिल्या पादचारी पुलाचे लोकार्पण मुंबईकरांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) येथे पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज (दिनांक १५ जुलै २०२३) करण्यात आले. मुंबईकर नागरिकांना अधिकाधिक सुविधा देऊन जगातील अग्रेसर व सुलभ शहर बनवण्याच्या अनुषंगाने राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे उद्गार यावेळी …

Read More »

वैचारिक मूल्यांशी बांधिलकीचा पुनरुच्चार करत कार्यकर्त्यांचा शरद पवार यांच्यावर विश्वास खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती

राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) च्या संस्थापक पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत एका विशेष बैठकीत पक्षाच्या मूळ विचारधारेशी असलेल्या समर्पणाला दुजोरा देण्यासाठी आणि पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आपला अढळ पाठिंबा व्यक्त करण्यासाठी एकत्र आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील माजी पदाधिकारी आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत लोकशाही तत्त्वे, सर्वसमावेशकता आणि …

Read More »