राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंळाने भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे. राज्याच्या हितासाठी राज्यपाल काँग्रेसच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील अशी अपेक्षा आहे. विशेष अधिवेशन बोलावले नाही तर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसची टीका,…मोदी सरकारचा महिला कुस्तीपटूंवर पोलिसी बळाचा वापर; तीव्र निषेध कनिष्ठ पदावर उच्चशिक्षित मुलं अर्ज करतात याचा अर्थ बेरोजगारी आटोक्यात आणण्यामध्ये भाजपासरकार फेल ठरलेय...
महिलांचा सन्मान आणि सुरक्षा करुन सरकार चालवू असे आश्वासन नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये देशातील जनतेला दिले होते. परंतु आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन करणार्या महिला कुस्तीपटूंवर पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा दिल्लीत जंतरमंतरवर जो प्रकार झाला त्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते …
Read More »देवेंद्र फडणवीस यांनी विलासराव देशमुखांचा संदर्भ देत म्हणाले, मित्रापक्षाला सांगण्याऐवजी संजय राऊतांनी… संजय राऊत यांच्या गटाचा काँग्रेस हा मित्र पक्ष
बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणं म्हणजे एक प्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बेळगावात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना त्यांना याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. …
Read More »रामदास कदम यांची खोचक टीका, सरड्यासारखं रंग बदलण्याचे काम… उध्दव ठाकरे यांच्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या भूमिकेवरून टीका
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. येथील स्थानिक लोकांनी रिफायनरीला विरोध केला असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ६ तारखेला बारसू दौऱ्यावर जाणार आहेत. ते बारसूतील शेतकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी टीका केली. …
Read More »पवारांच्या राजीनामा प्रकरणावर उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, महाविकास आघाडीला तडा जाईल… मी सल्ला देऊ शकत नाही
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यासंदर्भात उद्धव ठाकरेंची कोणतीही प्रतिक्रिया कालपासून समोर आली नव्हती. तसेच लोक माझे सांगाती या पुस्तकात मुख्यमंत्री पदी असताना उध्दव ठाकरे यांच्या कारभारावरून केलेल्या टीकेवर अखेर आज दुपारी मातोश्रीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर आणि पुस्तकातील उल्लेखावरून …
Read More »ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांना शिंदे सरकारच्या समितीतून वगळले जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी पशु व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविले पत्र
आरेच्या सर्वांकष विकासाबरोबर आरेतील आदिवासी व बिगर आदिवासी रहिवाशांना मुलभूत सुविधा देण्यासाठी सातत्याने दिवस-रात्र प्रयत्न करणारे तसेच वेळोवेळी लोकशाहीच्या विविध आयुधांचा वापर करुन विधानसभेत आरेतील विविध प्रश्न मांडणारे ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांना राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीतून वगळण्यात आल्याने विधानसभा क्षेत्रातआश्चर्य व्यक्त करण्यात येत असून आरेतील रहिवाशांमध्ये असंतोष …
Read More »मोठी बातमीः सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार दस्त नोंदणी अर्थात दुय्यम निबंधक कार्यालये नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे महसूल मंत्र्यांचे आवाहन
सामान्य जनतेच्या सोयीसाठी जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत, त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीत अडचण निर्माण होणार नाही आणि यापुढे नॉनस्टॉप दस्त नोंदणी होणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. खरेदी -विक्री व्यवहारामध्ये वाढ होत …
Read More »शरद पवार यांच्या राजीनामा प्रकरणाचा सस्पेन्स कायम आणखी दोन दिवसानंतर राजीनामा निर्णयावर शक्यता
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी पक्षातून दबाव वाढला असला तरी या संदर्भात पक्षीय स्तरावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. राजीनामा मागे घेण्याबाबत पवार यांनी पक्षाच्या नेते आणि पदाधिकारी यांच्याकडे दोन तीन दिवसांचा अवधी मागितला असल्याने याबाबतचा निर्णय नंतर होईल, अशी माहिती जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल …
Read More »सारथीच्या शैक्षणिक सवलती, सुविधांसंदर्भात लवकरच सर्वंकष समान धोरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सारथीमार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि सुविधाबाबत सर्वंकष समान धोरण ठरविण्याबाबत बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी या संस्थांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील …
Read More »शहरांमध्ये आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवणार सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य
राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घनकचरा प्रक्रियेसाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ५७८ कोटी ६३ रुपये किंमतीचा हा प्रकल्प असेल. शहरांमधील घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, …
Read More »
Marathi e-Batmya