Tag Archives: narendra modi

नाना पटोले यांचा विश्वास,… निकालांचा परिणाम होणार नाही, इंडिया आघाडी मजबूत

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील दुसऱ्या महत्वाच्या राज्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे तर दक्षिण भारतातून भारतीय जनता पक्षाला जनतेने दारे बंद करून भाजपाच्या धर्मांध अजेंड्याला …

Read More »

राष्ट्रपती मुर्मु यांच्या त्या विधानाने पंतप्रधान आणि शिंदे सरकारच्या घोषणांबाबत प्रश्नचिन्ह

मागील काही महिन्यात ठाणे येथील महापालिकेच्या रूग्णालयात २४ तासात १५ हून अधिक रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यापाठोपाठ संभाजीनंगर अर्थात औरंगाबादेतील, नांदेड येथील शासकिय रूग्णालयातही बालमृत्यू मोठ्या प्रमाणावर झाल्याची घटना उघडकीस आली. तर केंद्र सरकारकडून विविध आजांरावर पुराण काळापासून औषधोपचाराची सुविधा संस्कृत भाषेत लिहून ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला …

Read More »

प्रफुल पटेल यांचा इशारा, भविष्यात पुस्तक लिहिणार…त्यात खूप काही मटेरियल मिळेल

माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. भविष्यात मी देखील पुस्तक लिहिणार असून त्यावेळी मी माझी बाजू मांडेन आणि त्यात खूप काही मटेरियल मिळेल अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी वैचारिक मंथन शिबीरात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबीराच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या सत्रात …

Read More »

…पंतप्रधान मोदी यांनी तीन राज्यांसोबत मुंबईतल्या वार्डातील जनतेशीही साधला संवाद

विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन याला जन आंदोलनाचे रुप द्यावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. महिला, युवा, शेतकरी आणि गरीब हे समाजातील अमृतस्तंभ असून, यांचा विकास हाच शासनाचा ध्यास आहे. या चार वर्गाच्या विकासाद्वारे भारताचा विकास साधण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवून ‘विकसित …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगेना सल्ला, जी चूक सोनिया गांधींनी केली ती करू नका

२००९ साली गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार येणार होते. पण त्यावेळच्या काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना त्यांच्या सल्लागारांनी एका चुकीचे भाषांतर केलेल्या हिंदी वाक्य वापरायला लावले. त्या शब्दामुळे काँग्रेसची सत्ता आली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना माझे सांगणे आहे की, त्यांच्या सल्लागाराचा शब्द ऐकू नये नाही तर त्यांचा प्रश्न सुटणारच नाही …

Read More »

राम मंदिराचा ‘इव्हेंट’, आरोप करत काँग्रेसची घोषणा, अमेठीतून राहुल गांधीच

राम मंदिर हा देशातील कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. पण भाजपाने आणि खास करून मोदी-शाह या दोघांनी या विषयाचा इव्हेंट करून ठेवला आहे, अशी टीका उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अजय राय यांनी केली. मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या निमंत्रणानुसार एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेल्या अजय राय …

Read More »

संजय राऊत यांची खोचक टीका, भाजपावाले सांगतील…. क्रिकेट आता खेळ कुठे राहिलाय, फक्त मॅच फिक्सिंग

आज क्रिकेट विश्वचषक कपची अंतिम लढत भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया या दोन क्रिकेट संघा दरम्यान गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडत आहे. या सामन्याकडे देशभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागलेले असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या क्रिकेट सामन्यावरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. …

Read More »

प्रत्यक्ष निधीपेक्षा दुपटीने खर्च, पण मनरेगाच्या निधीत दुपटीने वाढ करण्याची मागणी

सध्या देशातील मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणूकांसाठी मतदान होत आहे. तर दुसऱ्याबाजूला वर्षाकाठी तरूणांना दोन कोटी नोकऱ्या देणार असल्याची घोषणा २०१४ च्या लोकसभा निवडणूकी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या मनरेगावर सातत्याने टीका करणाऱ्या मोदी सरकारने आणि सदरची योजना काँग्रेसचे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तर बाळासाहेबांनी मोदींना शाबासकी दिली असती त्यांनी यायला नको होते

अयोध्येत राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अयोध्येला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. हा योगायोग असून बाळासाहेब आज असते तर त्यांनी मोदींना शाबासकी दिली असती असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त फोर्ट …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी वेळ न दिल्याने अखेर नवी मुंबईची मेट्रो उद्घाटनाविनाच धावणार

राजकिय श्रेयनामावलीत आपलेही नाव जोडले जावे या उद्देशाने नवी मुंबई मेट्रोचे काम पुर्ण झालेले असतानाही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने अखेर नवी मुंबईची मेट्रो उद्घाटनाविनाच धावणार असल्याचे खात्रीलायक माहिती नगरविकास विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. तर सिडको प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मेट्रो मार्गक्रमनाचा अधिकृत उद्घाटनाचा कार्यक्रम न …

Read More »