नुकत्याच झालेल्या गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेत जर भोंगे काढले नाहीत तर मस्जिदीसमोर हनुमान चालिसा वाजवू असा इशारा दिला. त्यानंतर भाजपासह सर्वच राजकिय पक्षांकडून ऐनकेन प्रकारे राजकीय कुरघोड्यांचे राजकारण सुरु झाले. यापार्श्वभूमीवर मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी महत्वाचे वक्तव्य केले …
Read More »राज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले, “त्या” रस्त्याने जायचा कार्यक्रम दिसतोय भोंगा विरूध्द हनुमान चालिसावरून शरद पवारांनी व्यक्त केले मत
मागील काही दिवसांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणात जातीय समीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकेचा भडीमार केला. त्यास शरद पवार यांनीही मुद्देसुद्द उत्तर देत राज ठाकरे यांचे आरोप परतवून लावले. मात्र आता मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे आणि भाजपाची एकच भूमिका असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने आगामी काळात मनसे …
Read More »फडणवीसांच्या टीकेवर शरद पवार म्हणाले, प्रश्नाचे गांभीर्य नसणाऱ्याचं फारस गंभीर… मुंबईतल्या १३ व्या बाँम्बस्फोटावरून पवारांनी दिले उत्तर
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जाती-पातीतील संघर्ष निर्माण झाला असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर मुस्लिम समुदायाचे लांगुलचालन आणि मतांचे राजकारण करण्यावरून भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या एकूण धार्मिक राजकारणाचा पडदा पाश करण्यासाठी सलग १४ ट्विट करत मुस्लिमधार्जिणे राजकारण पवार करत असल्याचा आरोप केला. …
Read More »पवारांच्या “त्या” वक्तव्याने दंगली थांबल्या तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय? मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का?-महेश तपासे
शरद पवारांनी जर एखादं वाक्य बोलून शेकडो लोकांचे प्राण वाचवले असतील… दंगली रोखल्या असतील तर त्याच्यामध्ये फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय? ९३ च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का? हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले. विरोधी …
Read More »शरद पवार म्हणाले, देशातील राजकीय स्थैर्य डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा राज्यस्तरीय कार्यक्रम
आज जेव्हा आपण आपल्या देशाच्या शेजाऱ्यांकडे बघतो त्यावेळी राजकीय स्थैर्य आणि लोकशाहीची किंमत लक्षात येते. भारताचे राजकीय स्थैर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी काढले. राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण …
Read More »राज्याच्या राजकारणातील जॉनी लिवर कोण ? राज ठाकरे आणि आव्हाड मध्ये जुंपली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाणे येथील सभेनंतर राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते यांच्यातील खडाजंगी चांगलीच गाजते आहे. राज ठाकरे यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांवर खरमरीत टीका केली आहे. त्याला राष्ट्रवादीकडूनही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. पक्षाचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत …
Read More »पवारांची राजवर टीका, काय पोरकट आरोप ‘अजित पवार आणि मी वेगळे नाही’ उपमुख्यमंत्री अजित पवारासंबधी वक्तव्यावर शरद पवारांची टीका
भाजपाबद्दल कालच्या भाषणात एकही शब्द आलेला नाही. त्यांच्यावर भाजपाने कदाचित काही जबाबदारी दिलेली असावी त्याचा प्रत्यय कालच्या सभेत आला असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरेंवर करत महागाई, बेरोजगारी एवढी वाढलेली असताना जर एखादा राजकीय नेता आपल्या सभेत एक शब्द बोलत नाही, म्हणजे काय समजायचं? असा …
Read More »राज ठाकरे म्हणाले, पवारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर धाडी ठाण्यातील मनसेच्या उत्तर सभेत टीका करांना दिले उत्तर
मनसेची पाडवा सभा झाल्यानंतर अनेकांनी माझ्या भूमिकेवर संशय व्यक्त करत त्यावर टीका केली. त्या सगळ्यांनी संपलेल्यांबद्दल बोलत नाही म्हणत सगळेच संपलेल्या पक्षाबद्दल बोलत राहीले. मनसे हा संपलेला पक्ष नाही तर दुसऱ्यांना विझविणारा पक्ष असल्याची टीका करत पवारांना ईडीची नोटीस येणार असल्याची कुणकुण लागताच काय नाटक केलं. अजित पवारांच्या बहिणीच्या घरावर …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल, भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? आजपासून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला उरणमधून सुरुवात...
मविआचे निवडून आलेले आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते शक्य झाले नाही. म्हणून ईडी, इन्कम टॅक्सची धाड टाकली जात आहे. ईडी काय महाराष्ट्रातच आहे का ? भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. आजपासून राष्ट्रवादी परिवार …
Read More »गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेत त्रुटी… न्यायालयाचा निकाल आल्यानंतर गृहमंत्री वळसेंची प्रतिक्रिया
काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला करत आंदोलन केले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी बंगल्याच्या दिशेने चपला आणि दगडफेकही केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि १०९ आंदोलनकर्त्यांना अटक करून न्यायालयातही हजर केले. त्यावर न्यायालयाने या …
Read More »
Marathi e-Batmya