टेस्लाने भारतात गुंतवणूक करण्याच्या आपल्या योजनांना फुट स्टॉप दिला आहे, एलोन मस्कच्या टीमने भारतीय अधिकाऱ्यांशी संवाद थांबवला आहे. मस्क यांनी एप्रिलच्या उत्तरार्धात देशाचा नियोजित दौरा पुढे ढकलल्यानंतर हे घडले आहे जिथे ते पंतप्रधान मोदींना भेटणार होते अशी माहिती ब्लूमबर्गने आपल्या वृत्तात सांगितले आहे. वृत्तात असे सुचवले आहे की मस्कने त्याच्या …
Read More »राहुल गांधी यांचा प्रहार, हिंदू धर्माच्या नावाखाली तुम्ही हिंसा घडवताय पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी स्वतः लोकसभेत उपस्थित
संसदेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या सदस्यांनी NEET परिक्षा लिकच्या प्रकरणी चर्चेची मागणी केली. मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चर्चेची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधकांनी साभात्याग केला. त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनावरील चर्चा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी उपस्थित केली. त्यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …
Read More »राहुल गांधी यांचा पलटवार , मोदी-शाह यांचा राज्यघटनेवर हल्ला आणीबाणीच्या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर पलटवार
१८ व्या लोकसभेचे पहिले पावसाळी अधिवेशनास आज सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांचे नाव न घेता आणीबाणीचा उल्लेख करत काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर पलटवार केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, जनादेशाचा पंतप्रधान मोदींवर कोणताही परिणाम नाही… इंडिया आघाडीने संसदेच्या प्रवेशद्वारापासून काढला राज्यघटना वाचवा मोर्चा
केंद्रात एनडीएचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर बहुमत सिध्द करण्यासाठी आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित पहिल्याच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. सत्ताधारी एनडीएच्या खासदारांना प्रोटेम अध्यक्ष भर्तहरी महताब यांनी खासदारकीची शपथ दिली. लोकसभेचे कामकाज सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना संबोधित केले आणि सांगितले की, जनतेने …
Read More »अभिनेते प्रकाश राज खिल्ली उडवित म्हणाले, शिकलेला नेता निवडण्यात… पेपरलिक प्रकरणावरून साधला निशाणा
मागील १० वर्षात बिहार, गुजरात, उत्तर प्रदेशात सातत्याने पेपर लिकच्या घटना घडत आलेल्या आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना या पेपर लिकचा फटका बसला आहे. त्यातच भरीस भर म्हणून की काय वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या NEET परिक्षेचा पेपरही लिक झाला. या पेपर लिकचे धागेधोरे गुजरात, बिहार आणि उत्तर …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, नोकरशहांची फेरबदल करणे हा उपाय नाही… नीट NEET पेपरफुटी प्रकरणी सुबोधकुमार सिंग यांच्या बदलीवरून साधला निशाणा
मागील काही दिवसापासून नीट-युजी NEET-UG आणि युजीसी-नेट UGC-NET परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकारडून सातत्याने घुमजाव सुरु आहे. त्यातच केंद्र सरकारने एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंग यांची संचालक पदावरून उचबांगडी केली. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत म्हणाले की, नोकरशहांची फेरबदल करणे हा भारतीय जनता पक्षाने कुजलेल्या …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, अटल सेतुचे काम निकृष्ट दर्जाचे, रस्ता एक फुट खचला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अटल सेतू रस्त्याला भेगा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते, पण महायुती सरकार तर १०० …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, नालंदा ही एक ओळख नाही तर आदर आणि अभिमान नव्या नालंदा कॅम्पसचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १९ जून रोजी बिहारमधील राजगीर येथील नालंदाच्या प्राचीन अवशेषांच्या जागेजवळ असलेल्या नालंदा विद्यापीठ या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. नालंदा हे भारताच्या शैक्षणिक वारशाचे आणि चैतन्यशील सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन करून पंतप्रधान मोदी म्हणाले, पुस्तके आगीच्या ज्वाळांमध्ये जळू शकतात, परंतु अग्नीच्या ज्वाला …
Read More »उद्धव ठाकरे यांचा टोला, मोहन भागवतजी बोलले पण एक वर्ष उशीराने बोलले आता तरी पंतप्रधान अद्यापही जळत असलेल्या मणिपूरला जाणार की नाही
लोकसभा निवडणूकीपूर्वी मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार हा काही केल्या शांत व्हायला तयार नाही. तिकडे अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेलेले नाहीत. त्यावर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतजी बोलले तरी खरे पण एक वर्षाने बोलले. मग आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळत असलेल्या मणिपूरला जाणार की नाही असा सवाल शिवसेना उबाठा …
Read More »शरद पवार यांचा टोला, हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भटकती आत्मा टीकेला प्रत्युत्तर
मोदींचा प्रचार हा मी काही सांगायची आवश्यकता नाही. पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करते? पंतप्रधान हा कुठल्या एखाद्या पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. अपेक्षा अशी असते की देशाच्या पंतप्रधान यांनी देशातील सर्व जाती, धर्म, भाषा या घटकांचा विचार केला पाहिजे, पण हे करायला मोदी विसरले. विसरले असं …
Read More »
Marathi e-Batmya