Tag Archives: rajsthan

राहुल गांधी यांची खोचक टीका, परिक्षा रद्द करून विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने चिरडून टाकली नीट युजी परिक्षा एनएटीने रद्द करत परिक्षा नंतर घेणार असल्याचे केले जाहिर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (१२ मे, २०२६) नीट (यूजी) २०२६ परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तथाकथित ‘अमृतकाळ’ देशासाठी ‘विषकाळ’ बनले असल्याची टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने “या भ्रष्ट भाजप राजवटीने चिरडून टाकली …

Read More »

पेपर फुटीमुळे एनटीएने नीट युजी परिक्षा केली रद्द आता पुन्हा नव्याने होणार परिक्षा, सीबीआयकडून पेपर फुटीची चौकशी

पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) मंगळवारी (१२ मे २०२६) ३ मे रोजी आयोजित केलेली नीट युजी NEET-UG २०२६ परीक्षा रद्द केली आहे. तसेच, या “अनियमिततांची” सखोल चौकशी करण्याचे निर्देश सरकारने सीबीआय CBI ला दिले आहेत. परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपांची राजस्थानचे ‘विशेष कृती पथक’ (Special Operations Group) सध्या चौकशी …

Read More »

मध्य प्रदेशनंतर आता राजस्थान मध्येही सिरप औषधावर बंदी जयपूर स्थित कंपनी केसन्स फार्माच्या सिरपचे वितरण थांबवले

राजस्थान सरकारने राज्य औषध नियंत्रकाला निलंबित केले आहे आणि जयपूरस्थित कंपनी केसन्स फार्मा द्वारे उत्पादित औषधांचे वितरण थांबवले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने केसन्स फार्मा द्वारे उत्पादित सर्व १९ औषधांचा पुरवठा पुढील आदेशापर्यंत थांबवला आहे, असे त्यांनी सांगितले. डेक्सट्रोमेथोर्फन असलेल्या इतर सर्व खोकल्याच्या सिरपचे वितरण देखील थांबवण्यात …

Read More »

पराभवानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, वैचारिक लढा सुरुच…

देशातील पाचपैकी चार राज्यातील निवडणूकांचे निकाल आज जाहिर झाले. छत्तीसगड, राजस्थान बरोबर मध्य प्रदेश मध्येही काँग्रेसला कौल मिळेल अशी वातावरण निर्मिती करण्यात आली होती. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडूनही भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या कारभारावरून प्रश्न उपस्थित करत चांगलेच कोंडीत पकडत होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत एक …

Read More »

संसदेत विरोधक पंतप्रधानांची वाट बघतायत, तर पंतप्रधान मुख्यमंत्री गेहलोतांच्या… पीएमओने भाषण हटविल्याने अशोक गेहलोत ऑनलाईन पध्दतीने उपस्थित

एकाबाजूला अडीच महिन्याहून अधिक काळ मणिपूर राज्यातील हिंसाचार काही केल्या थांबायला तयार नाही. त्यातच दिवसेंदिवस तेथील नवनवीन घटनांचे धक्कादायक व्हिडिओ बाहेर येत आहेत. यापार्श्वभूमीवर सध्या संसदेच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरप्रश्नी आपले मत मांडावे यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांकडून रोज गोंधळ घातला जात आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत जायलाही …

Read More »