Tag Archives: S Chocklingam

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम राबविताना पक्षपातीपणा केला जात असल्याचे दिसून आले आहे. एसआयआर (SIR) मोहिम राबविताना काही बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात पुढील तीन-चार वर्षात कोणत्याच निवडणुका नाहीत, त्यामुळे मुंबईत एसआयआर (SIR) मोहिम राबविताना घाईघाईत न करता त्यासाठी वेळ द्यावा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR कार्यक्रम राबवू नका, लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता

महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो वारकरी वारीत सहभागी होत असल्याने ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावे वगळली जाण्याची भीती आहे, याचा विचार करुन पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर कार्यक्रम आयोजित करू …

Read More »

काँग्रेसच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत मतदारसंख्या वाढली असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करत ही विधानसभा निवडणूक एकप्रकारची मॅच फिक्सिंग होती असा आरोप केला. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनीही निवडणूक आयोगावर आरोप केले होते. मात्र काँग्रेसच्या निवडणूक आयोगावरील आरोपाला भाजपाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. तर भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

ॲड प्रकाश आंबेडकर यांनी मागितली मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तीन प्रश्नांची उत्तरे आमच्या प्रश्नांची उत्तरे व चिंतेचे निराकरण करणे महत्त्वाचे

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निकालावरून आधीच महाविकास आघाडीकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (६ डिसेंबर) रोजी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्र लिहित वंचितने विधानसभा निवडणुकीतील तात्पुरत्या मतदारांच्या मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली …

Read More »

निष्पक्ष आणि शांततेत मतदानासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना निवडणूक मुख्याधिकारी कार्यालयाकडून माहिती

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडावे, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून महाराष्ट्र पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्राची तीन हजार …

Read More »

१ लाख ४२७ मतदान केंद्रांवर ९ कोटी ७० लाख मतदार आपला हक्क बजाविणार मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती

राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांसाठी १,००,४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी १ लाखांहून अधिक मतदान केंद्र निवडणूक मुख्याधिकारी कार्यालयाची माहिती

विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात १ लाख ४२७ मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टीकोनातून राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात ८ हजार ४६२ मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे ७ हजार ५७९, ठाणे …

Read More »

निवडणूक आयोगाकडून पोलिस महासंचालक पदी संजय वर्मा यांची नियुक्ती रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्यानंतर केली नियुक्ती

काँग्रेस महाविकास आघाडीकडून राज्याच्या पोलिस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार उशीरा का होईना निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविले. तसे आदेश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नव्या नावाची घोषणा करण्यासंदर्भात तीन आयपीएस अधिकाऱ्यांची सादर करण्याचे आदेश राज्याच्या गृहविभागाला दिले. त्यातून …

Read More »

निवडणूकीपूर्वी काँग्रेस-महाविकास आघाडीच्या खात्यात पहिला विजय रश्मी शुक्ला केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक मुख्याधिकाऱ्यांना आदेश

राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवृत्तीनंतरही दोन वर्षाची सेवावाढ देण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने अर्थात भाजपाचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर रश्मी शुक्ला यांची पोलिस महाचसंचालक पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी सातत्याने काँग्रेसने दोन वेळा राज्याचे निवडणूक मुख्याधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. …

Read More »

आर्यनलँड निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साधला संवाद

आर्यनलँड देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला. जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात विधानसभा सार्वत्रिक …

Read More »