Tag Archives: ShivsenaOFC

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपाला ओवैसींचा MIM ही चालतो हे भाजपाचे नैतिक अधःपतन अंबरनाथ व अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड

अंबरनाथमधील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना सज्जड दम देत पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. काँग्रेसने कारवाई केली पण भाजपाने मात्र त्यांना पक्षात सामावून घेतले, यातून भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला आहे. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही पक्षाशी युती करत असून अकोटमध्ये …

Read More »

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ला, संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यावर जलिल यांचे आरोप

छत्रपती संभाजी नगरातील बायजीपुरा जिन्सी भागात महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी गेलेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी इम्तियाझ जलील यांना वाहनातून बाहेर खेचून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु इम्तियाज जलील यांनी या कारणामागे भाजपाचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे असल्याचा …

Read More »

मंत्री प्रकाश आबिटकर यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा अखंड क्षमापित पत्राचे वितरण

आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधीत क्षमापित पत्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. गेली २० वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांचे आभार मानले. यावेळी डॉक्टरांनी लोकांना अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, काळोखे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोवर शिवसेना स्वस्थ बसणार नाही काळोखे कुटुंबाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली सांत्वनपर भेट

रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल काही हल्लेखोरांनी निघृणपणे हत्या केली. या हत्येने रायगडमधील राजकारण ढवळून निघाले रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिकांनी पोलीस स्थानकाला घेराव घालून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या …

Read More »

सुनिल तटकरे यांची मागणी, खोपोली प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करावी खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय

खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणून एसआयटी ( SIT) स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना केली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, खोपोलीतील घटना …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने ग्राम, तालुका, जिल्हा प्रशासनाच्या सक्षमीकरणासाठी कर्मयोगी २.० आणि सरपंच संवाद कार्यक्रम राबविणे, राज्यातील २९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याचा निर्णय …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा टोला, खरी शिवसेना कोणाची हे जनतेने दाखवून दिले घरात बसवणाऱ्यांना जनतेने घरीच बसवले

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्येही शिवसेनेचा स्ट्राइक रेट भक्कम राहिला असून, आम्ही जनतेसमोर विकासाचा अजेंडा घेऊन गेलो, स्थानिक प्रश्नांवर भर दिला आणि कोणावरही टीका केली नाही, त्यामुळेच जनतेने आम्हाला भरभरून यश दिले, असे ठाम मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार, बोगस मतदान, पैसा व सत्तेचा निवडणुकीत प्रचंड गैरवापर

नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधिरेखीत झाला आहे. मतदान प्रक्रियेचा पुरता गोंधळ घातला गेला, तारिख पे तारिख चा खेळ केला. ही निवडणूक फ्रि अँड फेअर अशी झाली नाही. सत्ताधारी पक्षाकडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा मुक्तपणे वापर करण्यात आला. निवडणुकीत बोगस मतदार, दडपशाही, सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा …

Read More »

एकनाथ शिंदे यांची घोषणा, ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर राबवणार ‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड, एसआरए अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामधील लाभार्थ्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी १७ ठिकाणी एसआरए समुह पुनर्विकास प्रकल्पाच्या घोषणेसोबतच ‘एसआरए अभय योजने’ला डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ, तक्रारींच्या जलद निपटाऱ्यासाठी ‘एपेक्स ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटींची संख्या वाढविण्याच्या घोषणांचा समावेश आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या ओसीसाठीच्या …

Read More »

एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, मुंबई पागडीमुक्त सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली

मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. भाडेकरू तसेच घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साधारणत १९ हजारांपेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून …

Read More »