Tag Archives: state election commission

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत

मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्र सुरक्षा कक्षात वेळेत जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मोहोळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली गेलेली …

Read More »

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी मतदानाची तयारी पूर्ण जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. ७) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या ७३१; तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्व मिळून एकूण २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ …

Read More »

या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदानादिवशी सुट्टी ७ फेब्रुवारीस मतदान, उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक  होत आहे. या निवडणुकीमध्ये  राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे. यानुसार, निवडणूक  होणाऱ्या …

Read More »

जि.प आणि पंचायत समित्यांच्या मतदान आणि मतमोजणीच्या तारखा बदलल्या ५ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५  पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७  फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. …

Read More »

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर १५ महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर

राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली असून २९ महापालिकांपैकी १५ महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकच पद आरक्षित होत आहे. नियमातील तरतुदीनुसार अनुसूचित जमाती महिला …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासिन नसून निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निर्दशक आहे. देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हिएम EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय …

Read More »

राज्यातील २९ महानगरपालिकांचा निकाल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या राज्य निवडणूक आयोगाने जारी केली माहिती

मागील ७ ते नऊ वर्षानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल १५ जानेवारीला मतदान घेण्यात आले. तर आज या महानगरपालिकांचे निकाल मतमोजणीनंतर जाहिर करण्यात आले. मात्र आज झालेल्या मतमोजणीत चंद्रपूर, कोल्हापूर वगळता जवळपास २५ महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तसेच बहुतांश ठिकाणी महापालिकांच्या …

Read More »

राज्यातील २९ महापालिकांमध्ये दुपारी ३.३० पर्यंत ४१ टक्के मतदानः राहिलेली टक्केवारी उद्या उर्वरित वेळेतील मतदानाची टक्केवारी उद्या जाहिर होण्याची शक्यता

राज्यातील मुंबई महापालिकेसह २९ विविध महापालिकांसाठी आज ७ ते ८ वर्षानंतर मतदान पार पडले. मात्र ज्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा आणि विधानसभेसाठी मतदान पार पडून दोन दोन दिवस मतांची अंतिम टक्केवारी काही केल्या जाहिर केली जात नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणूकीवेळी भाजपाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारवरून संशय व्यक्त करण्यात आला. आता …

Read More »

टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारवाई होणार

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी – २१ (प्रभाग क्रमांक २०० ते २०६) यांनी टपाली मतपत्रिकांबाबत ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व उमेदवारांना पाठविलेले पत्र अनावधानाने प्रसारित झाले होते. पत्र तात्काळ मागे घेण्यात आले असून त्याऐवजी सुधारित पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार, गुरुवार, १५ जानेवारी …

Read More »

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची स्पष्टोक्ती

बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टिकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी …

Read More »