नीलम गोऱ्हे यांचा आरोप, महिला आरक्षणाला पाठिंबा सांगत प्रत्यक्षात विरोध महिला आरक्षण विधेयक नामंजूर; ‘इंडिया’ आघाडीविरोधात शिवसेना महिला आघाडीचे मुंबईत जोरदार आंदोलन

महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत ‘इंडिया’ (INDIA) आघाडीविरोधात जोरदार निदर्शने केली. घोषणाबाजी करत या विधेयकाच्या निषेधार्थ महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या होत्या.

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘इंडिया’ आघाडीवर तीव्र टीका करत म्हटले की, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महिला आरक्षण विधेयकाबाबत काँग्रेस व सहयोगी पक्षांनी दुटप्पी भूमिका घेतली. “एकीकडे महिला आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे प्रत्यक्षात लोकसभेत विधेयक नामंजूर करण्यासाठी विरोध केला जातो. हा महिलांच्या भावनांचा विश्वासघात आहे,” असा आरोप केला.

डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, मतदारसंघ पुनर्रचनेच्या नावाखाली दिशाभूल केली जात असून, महिला सक्षमीकरणाच्या प्रश्नावर खोटा प्रचार करण्यात आला. “महिलांना न्याय देण्याऐवजी राजकीय स्वार्थासाठी या विधेयकाला अडथळे आणले गेले.”

तसेच, महिलांच्या मतांचा अधिकार मागणाऱ्यांनी आधी त्यांच्या हक्कांबाबत प्रामाणिक भूमिका घ्यावी. अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये महिलाच योग्य तो निर्णय घेतील, असा इशाराही दिला.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी या विधेयकाला स्पष्ट पाठिंबा दिल्याचेही त्यांनी नमूद केले.शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांचा सन्मान म्हणजेच महिलांना अधिकार या भुमिकेतुन अनेक योजना आणल्या आहेत. महायुती व एन. डी.ए. ची भुमिका महिला सक्षमीकरणाचे आहे.

याऊलट युपीए आघाडीने पुतनेची भुमिका घेऊन महिलांना डावलण्याचे विषारी काम केले आहे.काँग्रेसने सत्ता असुनही आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवली नाही . तंदुरमध्ये जाळलेली नैना ते लातुरची कल्पना गिरींचा खुन , मुस्लिम महिलांच्या अधिकारांचा गळा घोटण्यास शाहबानोच्या निमित्ताने पोटगी नाकारणारे विधेयक, समान नागरी कायद्यात विरोध असा काँग्रेसचा दुटप्पी इतिहास पाहिला तर महिलांची फसवणूक एवढेच ते करत असतात अशी टीकाही यावेळी केली.

या आंदोलनात आमदार मनीषा कायंदे, बेस्ट अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, संजय निरुपम, शिवसेना उपनेत्या कला शिंदे यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, वारकऱ्यांनी पुण्यातच वारीमध्ये सहभागी व्हावे आळंदी व देहूच्या वारकऱ्यांना आवाहन

मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी आहे. त्यामुळे मुंबईसह पुण्यातही नागरिकांचे प्रचंड नुकसान आणि जनजीवन विस्कळीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *