मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ताकारणाच्या खेळात आतापर्यंत रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून राजकिय सोंगट्या हलविणाऱ्या शिवसेनेने आता विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून कात टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच शरद पवारांच्या वक्तव्याने शिवसेना सरकारचे नेतृत्व करणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरे घराण्यातील व्यक्ती आता थेट मुख्यमंत्री विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले. हिंदूत्ववादाच्या मुद्यावरून शिवसेनेने …
Read More »शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची लवकरच दिल्लीवारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. शिवसेना सरकारला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची प्राथमिक तयारी झालेली असून अंतिम बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे लवकरच काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीला जाणार असल्याचे शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्याच्या सत्ताकारणापासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या …
Read More »शिकाँराच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान केव्हाही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांची सोमवारी बैठक
नवी दिल्ली-मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील किमान सामायिक कार्यक्रमावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोमवारी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी नवी दिल्ली येथे जाणार असून त्यानंतर १९ ते २५ नोव्हेंबरच्या दरम्यान …
Read More »पंचतारांकित हॉटेलमध्ये काँग्रेसची शिवसेनेबरोबर सदिच्छा भेट उध्दव ठाकरेंच्या भेटीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात, चव्हाण, ठाकरे आदी नेते
मुंबईः प्रतिनिधी शिकाँरा महाआघाडीच्यावतीने राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विशेषतः मंगळवारी काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाल्यानंतर आज बुधवारी शिवसेनेशी पुढील चर्चा करण्यासाठी नरिमन पाँईट येथील हॉटेल ट्रायडंट येथे जावून काँग्रेस नेत्यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. तब्बल दोन …
Read More »शि.रा.ला अखेर काँग्रेसकडून बाहेरून पाठिंबा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा निर्णय
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर घोळ संपुष्टात आला असून काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीची माहिती काँग्रेसकडून शिवसेनेला कळविण्यात आल्याचे १० जनपथवरील सुत्रांनी दिली. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा या प्रमुख मुद्यावरून भाजपाबरोबर सवता सुभा मांडला होता. शिवसेनेला सरकार स्थापन …
Read More »शि-काँ-रा महाआघाडीसाठी उध्दव -पवार भेट अंतिम बोलणीसाठी वांद्रे येथील ताज हॉटेलामध्ये गुप्तगू
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून घडामोडींना मोठा वेग आला आहे. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यानंतर लगेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी वांद्रे येथील ताज हॉटेल मध्ये भेटले असून त्यांच्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसंदर्भात भेट सुरु आहे. …
Read More »शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाशिवआघाडी संध्याकाळी जाहीर होणार संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही पक्षांकडून भूमिका जाहीर करणार
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेचा घोळ संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली असून आज संध्याकाळपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना सरकारला पाठिंबा देण्याबाबतची अधिकृत घोषणेची शक्यता आहे. काँग्रेसकडून भूमिका जाहीर झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. त्यानंतर राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील …
Read More »देवेंद्र म्हणाले माझी अडचण होईल…अमित शाह आणि कंपनीवर विश्वास नाही मुख्यमंत्री पदावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ठाम
मुंबईः प्रतिनिधी निवडणूकीसाठी युती करताना अमित शाह यांच्यासमोर मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे आताच जाहीर करू नका नाहीतर माझी पक्षात अडचण होईल अशी विनंती केली. आता ते मुख्यमंत्री पदाबाबत अशी चर्चा झालीच नसल्याचे सांगत मला खोट ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे प्रतित्तुर भाजपा नेते …
Read More »अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची चर्चा कधी झालीच नव्हती शिवसेनेची भाजपाऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा सुरु असल्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील निवडणूकांचे निकाल जाहीर होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेत सरकार स्थापनेसाठी सर्व मार्ग खुले असल्याचे जाहीर केले. त्याचा सर्वात मोठा धक्का आम्हाला बसला. त्यांना अनेकवेळा मी स्वतः फोन केला. पण त्यांनी तो स्विकारला नाही. तसेच अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाबाबत माझ्यासमोर चर्चा झालीच …
Read More »राज्याच्या राजकारणातही “५ स्टार हॉटेल” शिवसेनेचे सर्व रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवले
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अस्थिर राजकिय फायदा घेत घोडेबाजार होवू नये अथवा आमदारांची पळवापळवी होवू नये म्हणून शिवसेनेने आपले सर्व आमदार वांद्रे येथील रंगशारदा हॉटेल या ५ स्टार हॉटेल मध्ये ठेवण्यात आले आहे. शिवसेनेच्या आमदारांनी ठराव मंजूर करुन महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंबंधी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले. त्यानंतर …
Read More »