Tag Archives: uddhav thackeray

उध्दव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीला ‘हे’ खासदार उपस्थित जवळपास १० आमदार राहिले गैरहजर

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपती निवडणूकीतील भाजपाच्या उमेदवार द्रोपदी मुर्म यांना पाठिंबा देण्याबाबतचे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिले. त्यानंतर दिल्लीतील खासदारांची भूमिका जाणून घेण्यासाठी आज शिवसेना खासदारांची बैठक बोलावली. मात्र या बैठकीला १८ खासदारांपैकी तब्बल १० खासदार गैरहजर राहिल्याचे दिसून आले आहे. तर फक्त ९ खासदार उध्दव ठाकरे …

Read More »

शिंदे गटाकडून नाव वगळण्याला आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर, खंजीर खुपसण्याला… इतकं प्रेम दाखविण्याची गरज नाही

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेवून भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. परंतु नव्याने राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष आणि बहुमत चाचणी वेळी शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्या गटाने एकमेकांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करत व्हिपच्या विरोधात ठाकरे गटाने …

Read More »

समर्थकांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; ज्यांच्याकडून मला धोका होता, तो टळला नाव न घेता उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटातील नेत्यांवर साधला निशाणा

राज्यातील सत्तां संघर्षाच्या नाट्यानंतर जरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कारभार हाकायला सुरुवात केली. मात्र शिवसेनेतील बंडखोरी आणि एकनाथ शिंदे यांनी या बंडखोरीचे केलेले नेतृत्व हा विषय अजूनही मागे पडलेला नाही. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढपूरात शासकिय महापूजेसाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

शिवसेनेतील बंडावर शरद पवार म्हणाले, आताची परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ भाषणामुळे… निवडणूकांसाठी आतापासून तयारी करण्याचे आदेश दिले

राज्यात शिवसेनेमध्ये झालेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेले. त्यानंतर याबाबत शरद पवार यांनी पहिल्यांच भाष्य करताना म्हणाले की, शिवसेनेत जे बंड झाले. त्या बंडखोरांकडे बंडाचे नेमके कारणच नाही. त्यांनी सुरुवातीला एक कारण दिले. आता वेगळेच कारण सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या बंडाला नेमके कारणच नाही. मात्र शिवसेनेत अशावेळी असलेली परिस्थिती …

Read More »

शरद पवार म्हणाले, ‘तो’ विषय अजेंड्यावर नव्हता; श्रीलंकेतील परिस्थितीचा बोध घ्यावा पण तो निर्णय राज्य मंत्रिमंडळाचा असल्याने मान्य करणे भाग

महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत धाराशिव आणि औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला. मात्र तो विषय आमच्या तिन्ही पक्षाच्या कॉमन मिनिमन प्रोग्राममध्ये नव्हता. इतकेच नव्हे तर त्या विषयावर आमच्या पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली होती. मात्र त्याबाबत निर्णय झालेला नव्हता. हा निर्णय घेतल्यानंतरच तो विषय आम्हाला माहित झाल्याची माहिती …

Read More »

विधिमंडळ सचिवांकडून शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीसा: अपवाद फक्त आदित्य ठाकरेंचा दोन्ही गटांपैकी एका गटाचा लागणार निकाल

विधानसभा अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत आणि बहुमत चाचणीवेळी एकनाथ शिंदे गटासोबत असलेल्या ४० आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गटात असलेल्या १३ आमदारांचे प्रतोद भरत गोगावले आणि सुनिल प्रभू यांच्या व्हिपचे पालन केले नसल्याच्या तक्रारी एकमेकांच्या विरोधात केल्या. या दोन्ही तक्रारीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवांनी शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. …

Read More »

अजित पवार यांचा टोला; युतीच्या काळात मानसन्मान मिळत नाही म्हणून एकनाथ शिंदेनी… धास्तीने फक्त दोघांचा शपथविधी

राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर पहिल्यांदाच टीका करताना म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल ते म्हणाले की हे निधी देत नव्हते. पण मी तुम्हाला सांगतो की, मागच्या टर्मला जेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, तेव्हा त्यांनी मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून फक्त १२ लोकांना संधी दिली होती. …

Read More »

संजय राऊतांच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; कसले खोके, मिठाईचे का? मुंबई तोडण्याच्या आरोपावर शिंदे म्हणाले अशी काही चर्चा आमच्यात नाही

महाराष्ट्रात शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीवारीवर आले. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तर आज सकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

संजय राऊत यांचा बंडखोरांवर निशाणा; ५० खोके पचणार नाहीत, कशाला कारणे देताय… शांत बसा आणि ठरवा नेमकी शिवसेना कशासाठी सोडली उगीच मानसकि गोंधळ करू नका

राज्यात शिवसेनेतील बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र ११-१२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात या बंडखोरीवर निर्णय होणार असल्याने या बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून बंडखोरांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. सध्या नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोरांवर …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा बंडखोरांवर निशाणा, आजारपणाचा फायदा घेत घात केला आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला आजपासून सुरुवात

युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला आजपासून सुरुवात झाली. आदित्य ठाकरे यांनी भायखळा येथील शाखा क्र. २१६ ला भेट शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर बोलताना आजारपणाचा फायदा घेत घात केला असा गंभीर आरोप करत भावनित साद घातली. जे कोणी मातोश्रीवर येत आहेत त्यांची निष्ठा …

Read More »