Tag Archives: vanchit bahujan aaghadi

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडीसाठी प्रामाणिक प्रयत्न काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक टिळक भवन मध्ये संपन्न

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी करण्याचे निर्णय स्थानिक नेतृत्वांकडे दिले होते, तसेच अधिकार वंचितनेही दिले होते. वंचित व काँग्रेसची आघाडी व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा चांगला संवाद आणि प्रामाणिक प्रयत्न सुरु असल्याची माहिती …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, जर कोणी दोषी नसेल, तर सहा जणांना कोणी मारलं? मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाच्या निकालावर केला सवाल

२००८ मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एनआयए आणि इतर तपास यंत्रणांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. “जर या प्रकरणात कोणताही दोषी नसेल, तर सहा नागरिकांचा बळी नेमका कोणी घेतला?” असा थेट सवाल केला. ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणतायत, राज्यपालांचे ते वक्तव्य योग्यच महाराष्ट्राचा अपमान झाला नाही

मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. तसेच कोश्यारी यांनी माफी मागावी, त्यांना राज्यपाल पदावरुन हटवावे अशी मागणी केली जात आहे. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर …

Read More »

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, बसपा आणि चंद्रशेखर रावण यांना मतदान करू नका उत्तरप्रदेश निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचा समाजवादी पक्षाला पाठिंबा

मराठी ई-बातम्या टीम   उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. दादर येथील आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली आरएसएस-बीजेपीचे केंद्रातील सरकार ईडी, इन्कम …

Read More »

सत्ता स्थापनेच्या चर्चेमागे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा घाट वबआचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेच्या फेरीचे नाट्य घडवून आणले जात आहे. मात्र या चर्चेच्या मागे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. गेल्या महिनाभराच्या कालावधीत महाराष्ट्रातील जनता सरकार स्थापनेच नाट्य …

Read More »

वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १२ जागा धोक्यात ९ हजाराहून अधिकचे मतदान घेतल्याने महाआघाडीच्या जागा घटल्या

मुंबईः प्रतिनिधी राज्यात लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणूकीतही वंचित बहुजन आघाडी आपली किमया दाखविणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून दुपारपर्यंत वंचितने आपली जादू दाखवित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ जागा धोक्यात आणल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार अरविंद भातंबरे यांना १४ हजार ८६३ …

Read More »

वरळीतून माघार घे, वंचितच्या उमेदवाराला शिवसेनेकडून धमकी देत २ कोटींची ऑफर पोलिसात आणि निवडणूक आयोगाकडे वंचितची तक्रार

मुंबईः प्रतिनिधी संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरळीतील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा निर्विवाद विजय व्हावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गौतम गायकवाड यांना २ कोटी रूपयांची ऑफर देत उमेदवारी मागे घेण्याची धमकी दिल्याचा आरोप उमेदवार गौतम …

Read More »

बहुजन आघाडीतले “वंचित” बनू लागले प्रस्थापित लक्ष्मण माने, एमआयएमनंतर गोपीचंद पडळकर बाहेर

मुंबईः प्रतिनिधी प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या राजकिय पक्षांना समर्थ पर्याय ठरण्यासाठी आणि उपेक्षित-वंचित समाजाचा स्वतंत्र आवाज निर्माण करण्यासाठी अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. मात्र या वंचित आघाडीतून भटक्या-विमुक्त जमातीचे लक्ष्मण माने, मुस्लिम धर्मियांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा एमआयएम हे आधीच पडले असून धनगर …

Read More »

काँग्रेसची वाट बघणार नाही मात्र एमआय़एमशी चर्चा सुरुच ठेवणार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्यासंदर्भात केंद्रीय नेत्यांशी वंचित आघाडीचे पदाधिकारी संपर्कात होते. मात्र त्यांच्याकडूनही लोकसभेच्या कालवधीप्रमाणे फक्त चर्चेत गुंतवणूक ठेवण्याचा प्रकार सुरु असल्याने त्यांची फारकाळ वाट बघणार नसल्याचे जाहीर करत लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. …

Read More »

आता वंचित अघाडीची सत्ता संपादन महारँली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपकडून महाजनादेश यात्रा, शिवसेनेची जन आर्शीवाद यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवस्वराज्य यात्रा आणि काँग्रेसची महाफर्दापाश यात्रा काढण्यात आल्या. आता त्याच धर्तीवर राज्यातील वंचित, बहुजन समाजाला आकृष्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सत्ता संपादन महारैली काढण्यात येणार असून या यात्रेची सुरुवात 8 सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. …

Read More »