सिंगल युज प्लास्टिकला सशक्त पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने मोलाची भूमिका बजावली पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी केले. २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुधंरा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून …
Read More »आदित्य ठाकरेंचं केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना पत्रः वाचा काय लिहिलंय पत्रात मुंबई, महाराष्ट्रासह देशातील राज्यातील बिघडत्या वायू प्रदुषणावर लक्ष देण्याच्या केल्या सूचना
केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना महाराष्ट्राच्या बिघडत्या वायू प्रदूषणाच्या संकटाबद्दल शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहून लक्ष केंद्रित केल आहे. तसच मुंबईच्या AQI वर लक्ष केंद्रित केले आहे. पूर्णवेळ पर्यावरण मंत्र्याची अनुपस्थिती आणि राज्याच्या बेकायदेशीर सरकारमधील सार्वजनिक समस्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव यामुळे हे संकट अधिकच बिकट …
Read More »‘उष्णतेच्या लाटा आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयक कार्यशाळा १३ आणि १४ फेब्रुवारीला होणार आयआयटीमध्ये परिषद
‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन करणे’ या विषयावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई), नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये देशातील विविध राज्यातील व …
Read More »कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटन आणि दहिसर कांदळवनाचा विकास आराखडा सादर करा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश
कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तेथील पर्यटन सुविधांच्या बळकटीकरणासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. तसेच कांदळवनाची उपयुक्तता सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी त्यासोबतचं कांदळवनाचा अनुभव घेता यावा यासाठी दहिसर येथील कांदळवन परिसरात ‘कांदळवन …
Read More »वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ५० कोटी वृक्ष लागवडीची जगाने दखल घेतली व्हिजन २०४७ शिखर संमेलन-पर्यावरण संवर्धन अभियानाला जनचळवळीचे स्वरूप यावे
मानवी विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणावर प्रतिकुल परिणाम होत आहे. त्यामुळे ऋतुचक्र बिघडले असून पर्यावरणात बदल होत आहेत. एकविसाच्या शतकात ही परिस्थिती बिकट होत चालली आहे. ‘रिझिलन्स अँड सस्टेनेबल समिट : व्हीजन २०४७’ मध्ये जे विचारमंथन होत आहे, ते प्रत्यक्ष स्वरुपात देशाच्या कानाकोपऱ्यात जनचळवळीच्या स्वरुपात पोहोचणे गरजेचे आहे’, असे प्रतिपादन वन, सांस्कृतिक …
Read More »थंडीचा कडाका वाढणार.. बर्फवृष्टी आणि पश्चिमी चक्रवाताचा परिणाम
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्राच्या तापमानात घट होऊन सर्वत्र थंडी अवतरली आहे. हिमालयीन विभागात पुन्हा बर्फवष्टी होणार असल्याने संक्रांतीपर्यंत रात्रीच्या किमान तापमानात आणखी घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट कायम असल्याने या भागात थंडीचा कडाका …
Read More »प्लास्टीकवरील बंदी शिथील, या गोष्टी आता वापरण्यास परवानगी
महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनविण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या स्ट्रॉ, ताट, कप, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर आदी वस्तूंच्या उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव प्रविण दराडे यांनी पत्रकार …
Read More »सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “चला जाणूया नदीला” दुसऱ्या टप्प्यातील अभियान लवकरच
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २ ऑक्टोबरला प्रारंभ झालेल्या “चला जाणूया नदीला ” अभियानांतर्गत नदी संवाद यात्रा आता राज्यभर वेग घेणार असून वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यस्तरीय तसेच जिल्हावार समित्यांची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्य सचिव राज्यस्तरीय समितीचे प्रमुख असतील. यासंदर्भातील शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे. या अभियानाचे यश लोकसहभागात …
Read More »जागतिक दर्जाचा इको पार्क उभारणार निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
पर्यावरण संरक्षण आणि संतुलन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. या संदर्भात राज्याचा वन विभाग सतर्क असून निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे नैसर्गिक उद्यान अर्थात इको पार्क उभारता येईल का याविषयी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज वन विभागाचे प्रधान सचिव व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रायगड जिल्ह्यातील …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फ्रीज, एसी सारख्या उपकरणाचा वापर कमी… जागतिक ओझोन दिनानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
सूर्याच्या हानीकारक किरणांपासून रक्षण करणाऱ्या ओझोनच्या थराला हानी पोहोचू नये यासाठी जगभर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये भारत सहभागी आहे. या अनुषंगाने केंद्र सरकार करीत असलेल्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र शासन आपले संपूर्ण योगदान देत आहे. फ्रीज, एसीसारख्या उपकरणांचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे अशा विविध पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण …
Read More »
Marathi e-Batmya