शिवसेनेच्या ‘आमदार संपर्कात’ ला एकनाथ शिंदे यांच्या गटाचे उत्तर सुहास कांदे यांचा व्हिडिओ रिलीज करत दिले प्रत्युत्तर

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदारांकडून दररोज गुवाहाटीचा रस्ता धरण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या गटातील २०-२१ आमदार संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते अनिल देसाई आणि संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील सुहास कांदे यांचा व्हिडिओ जारी करत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे शिवसेनेला थोडीशी याचा सामना कसा याचा प्रश्न पडला आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे अनेक आमदार गुवाहाटीला जाऊन एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं संख्याबळ वाढतच चाललं आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांपैकी काही आमदारांना बळजबरीने गुवाहाटीला नेल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. पण आम्ही स्वत:च्या इच्छेनं आलो असून आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, असं विधान शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केले.

सुहास कांदे यांनी आपल्या व्हिडिओत म्हणाले, एकनाथ शिंदे हेच आमचे नेते असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बंडखोरी का केली? याची कारणंही त्यांनी संबंधित व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा वारसा आणि आनंद दिघे यांची विचारधारा पुढे घेऊन जात आहेत. शिंदे साहेबच आमचे नेते आहे. सध्या आम्ही गुवाहाटीला आलो आहोत, मी माझ्या इच्छेनं येथे आलो आहे. माझ्या नांदगाव मतदार संघाचा विकास करण्यासाठी येथे आलो आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या योजना जर आपल्याला मार्गी लावायच्या असतील, तर आपल्याला शिंदे साहेबांसोबतच थांबावं लागेल. आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे विचार जर पुढे घेऊन जायचे असतील तर आपल्याला शिंदे साहेबांसोबत थांबावं लागेल. नांदगाव विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी मी गुवाहाटीला आलो आहे. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, आम्ही इकडे हसत खेळत राहत आहोत, शिवसेनाच नव्हे तर इतर कोणत्याही नेत्याच्या संपर्कात आम्ही नाही. आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर आहोत आणि मरेपर्यंत हिंदुत्वासाठी आणि नांदगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी शिंदे साहेबांसोबतच राहू असेही त्यांनी यावेळी जाहिर केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचे मत, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांची आजच्या काळातही नितांत गरज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेस पक्ष वर्षभर विविध उपक्रम राबविणार; बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण पाठिंबा दिलेला नाही;

महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *