आदित्य ठाकरे यांचा विश्वास, मविआचे सरकार राज्यात नाही तर देशात…

बुलढण्यातील प्रचार सभेतून यवतमाळ वशिंची जागा आपण जिंकणार असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त करतानाच महाविकास आघाडीचे सरकार राज्यात नाही तर देशात सरकार येईल, असे चित्र आहे .. भाजपाच सरकार जे डोक्यावर बसवले ते आता जनतेला नकोय .. दहा वर्ष सत्तेत असूनही विचारता की काँग्रेसने काय केले ? भाजपा केंद्रात बसून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करते .. असं म्हणत सरकारवर टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, गारपीट खाली तेव्हा भाजपा मदतीला आलीय ? .. बांधावर कधी आलीय का ? पण इथे मंचावर बसलेल्यांची विचारधारा एकच आहे .. मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांना मदत केली, कर्जमाफी केलीय . पण आताचं सरकार शेतकरी विरोधी आहे , असं म्हणत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर आदित्य ठाकरेंनी टीका केली..

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, या सरकारच्या काळात एकही उद्योग आला नाही .. सगळे उद्योग गुजरातला गेले.. इकडच्या लोकांनी गुजरातला जायचं का ? केंद्र सरकारला गुजरात बद्दल एव्हढे प्रेम का ? मात्र महाराष्ट्र ने काय केले ? असं म्हणत सरकारने महाराष्ट्र विरोधी भूमिकेचा समाचार ही घेतला.

दरम्यान बुलढण्यात प्रचार सभेत उपस्थित शेतकरी बांधवांनी, भगिनींनी भाजप सरकारविरोधात मनात खदखदत असलेला संताप व्यक्त केला . हा संताप फक्त बुलढाण्यातच नाही तर प्रत्येक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पंपावर रांगा कशासाठी ? पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *