मोदींकडे परदेशात झालेल्या गोळीबारावर कमेंट करण्यासाठी वेळ आहे. पण मणिपूरमधील आदिवासींच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतापेक्षा अमेरिका त्यांना जास्त प्रिय आहे का? ते मणिपूरला भारताचा भाग मानत नाहीत का? भारतातील आदिवासींवर त्यांचे प्रेम नाही का? असा सवालही यावेळी उपस्थित केला.
तसेच शेवटी आपल्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, रविवारी (१४ जुलै) अमेरिकेतील बटलर, पेनसिलव्हेनिया येथे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार झाला होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आणि या घटनेचा निषेध केला. मात्र, मणिपूर येथील घटनेवर मोदींनी मौन बाळगले आहे. किंबहुना अजूनही ते मणिपूर येथील आदिवासी बांधवांच्या हत्याकांडाविषयी बोलायला किंवा मणिपूर येथे पीडितांची भेट घ्यायला तयार नाहीत नसल्याची खोचक टीकाही यावेळी केली.
Modi has the time to comment on a shooting in a foreign land but does not have the time for the massacred Tribals in Manipur.
Why?
• Is USA more dear to him than India?
• Does he not consider Manipur as part of India?
• Does he not love the Tribals of India?— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 15, 2024