राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचारातून पंतप्रधान मोदी यांची एक्झिट मुंबईतल्या सभेत पंतप्रधान मोदीं यांची घोषणा, ही माझी शेवटची सभा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रवेश झाला. अद्याप चार-पाच दिवस विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला शिल्लक राहिलेले असतानाच भाजपा महायुतीच्या प्रचारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारातून एक्झिट घेत असल्याचे जाहिर केले.

मुंबईत महायुतीच्या झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेच्या सुरुवातीलाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठीची मुंबई आणि महाराष्ट्रातील शेवटची सभा असल्याचे जाहिर केले.

आजच्या पंतप्रधान मोदी यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे नेहमीप्रमाणे गैरहजर राहिले. तसेच महायुतीचे उमेदवार झिशान सिद्धीकी आणि सना मलिक हे दोघेही सभेच्या ठिकाणी दिसले नाही. या दोघांना जाणीवपूर्वक बोलाविण्यात आले नसल्याची चर्चा सभास्थळी चांगलीच रंगली होती.

त्यामुळे राज्यातील प्रश्नांवर काँग्रेस-महाविकास आघाडीकडून त्यांच्या प्रचारात जोर देण्यात येत असताना आणि पंतप्रधान मोदी व भाजपाला धारेवर धरण्याची एकही संधी सोडली जात नव्हती. तर पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या नेत्यांकडून कलम ३७० चा मुद्दा, एक है तो सेफ है चा मुद्दे सातत्याने उचलले जात होते. त्यामुळे काही ठिकाणच्या सभेत मोदी यांच्या भाषणा दरम्यान उपस्थित लोकांचा फारसा प्रतिसादही मिळत नसल्याचे चित्र दिसून येत होता.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कवर जनसभेला संबोधित करताना महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. आघाडी ही मुंबई आणि महाराष्ट्राचे काही भले करू शकत नाही, तर महायुती ही स्वप्ने पूर्ण करणारी आघाडी असल्याचे म्हणाले. एकीकडे महाराष्ट्राच्या वारशाचा अभिमान बाळगणारी महायुती आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या अभिमानाचा अपमान करणारी महाविकास आघाडीची विचारसरणी आहे. मुंबईत नव्या महायुतीच्या सरकारच्या शपथविधीसाठी तुम्हाला तयारी करावी लागेल, असेही यावेळी सांगितले. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे, त्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मी आलो आहे असा दावा केला.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, हरियाणाने ज्याप्रमाणे काँग्रेसचे सर्व मनसुबे उधळून लावले, त्याचप्रमाणे आता झारखंड आणि महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला लोक चोख प्रत्युत्तर देणार आहेत, तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी महायुतीचे सरकार हवे, जेणे करून मी तुमची सेवा कोणत्याही बंधनाशिवाय करू. महायुतीसाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आघाडीचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम झाले आहेत अशी टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हीच आघाडी जी राममंदिराला विरोध करणारी, मते मिळविण्यासाठी भगवा दहशतवाद हा शब्द वापरत आहे आणि रोज वीर सावरकरांचा अपमान करत आहे. हीच आघाडी आहे जी जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० परत आणण्याचा ठराव पास करते. देशाला पक्षापेक्षा वरचढ ठरवणे हा भाजप-महायुतीचा मंत्र, धोरण, प्रवृत्ती आणि प्रवृत्ती आहे, पण भारत पुढे सरकतो तेव्हा आघाडीचे लोक भोगतात. भारताच्या प्रत्येक कामगिरीवर आघाडीचे लोक प्रश्न उपस्थित करतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा न देणारे हेच लोक आहेत, अशा परिस्थितीत महाआघाडीच्या राजकीय हेतूंबाबत अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल असा इशाराही यावेळी दिला.

उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले की, आघाडीमध्ये एक असा पक्ष आहे ज्याने काँग्रेसच्या हातात रिमोट कंट्रोल दिला आहे. काँग्रेसच्या राजपुत्राच्या (राहुल गांधी) तोंडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्तुतीचे काही शब्द दाखवावेत असे आव्हान मी त्यांना दिले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राजपुत्राच्या तोंडून एकदा बोलताना दाखवा. त्याने असे म्हटल्यानंतर तुम्हाला चांगली झोप येईल आणि तुम्हाला कधीही हॉस्पिटलमध्ये जावे लागणार नाही. वीर सावरकरांना शिव्या घालणाऱ्यांना मिठीत घेत फिरत आहेत अशी टीकाही यावेळी केली.

मुंबईकरांमध्ये सुरक्षिततेची भावना

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुंबईने अनेक दिवसांपासून दहशतवादाची वेदना सहन केली आहे. एक काळ असा होता की जेव्हा प्रत्येकजण बस आणि ट्रेनमध्ये भीतीने प्रवास करत असे, तेव्हा लोकांना प्रश्न पडला की आज आपण आपल्या कुटुंबाला भेटू शकतील की नाही. गेल्या काही वर्षांत लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना वाढली आहे. पण तेव्हा काँग्रेसचे सरकार होते, आज मोदी सरकार आहे. तुम्ही विचार करा, काँग्रेसची सत्ता असताना मुंबईत दहशतवादी घटना घडायच्या, आता हे सर्व थांबले आहे. आज देशात मोदींचे सरकार आहे, दहशतवादाच्या सूत्रधारांना हे माहीत आहे, त्यांनी भारत आणि मुंबईविरुद्ध काहीही केले तरी मोदी त्यांना नरकात सोडणार नाहीत अशी टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पंपावर रांगा कशासाठी ? पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *