वर्षा गायकवाड यांचा संतप्त सवाल, सरकारने बदलापूर घटनेतून काय बोध घेतला? शाळांमधील मुलींची सुरक्षा वाऱ्यावरच, राज्यातील शाळांमध्ये 'सखी सावित्री' समिती पुन्हा कार्यान्वित करा

भाजपा युती सरकारने राज्यातील शाळांमध्ये मुलींची सुरक्षा तर वाऱ्यावरच सोडली आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेत चेंजिंग रूममध्ये मुलींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना स्टाफमधील एक व्यक्ती पकडला गेला. ही घटना अत्यंत चिंताजनक आहे. बदलापूरच्या शाळेतील घटनेप्रमाणेच या घटनेतही शाळेतील कर्मचारीच आरोपी आहे. सरकारने बदलापूर घटनेतून काय बोध घेतला? असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारला विचारला.

पुण्यातील घटनेवर बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पुण्यात काही दिवसांपूर्वीच दोन मुलींचे शाळेतून अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. आता हा चेंझिग रुममधील व्हिडोओ शुटींग, या सर्व घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने सखी सावित्री समितीची स्थापना केली होती, ज्यामध्ये स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचे काम केले जात होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असे कोणतेही ठोस उपाय आता उचलले जात नाहीत असा आरोपही यावेळी केला.

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लवकरात लवकर सखी सावित्री समिती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात यावीत. शाळांमधील पोक्सो कायद्यांतर्गत येणाऱ्या घटनांवर अंकुश आणणे केवळ अत्यावश्यकच नाही तर सरकारचे कर्तव्यही आहे अशी आठवणही यावेळी सरकारला करून दिली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, डॉ आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *