राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै २०२५ पासून ३ टक्के वाढ वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे विधानसभेत निवेदन

राज्य शासकीय  व इतर पात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै २०२५ पासून ५५ टक्क्यावरून ५८ टक्के अशी ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे निवेदन वित्त राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत केले.

राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले की, वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२६ पासून रोखीने देण्यात येणार असून जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकीची रक्कम गुढीपाढव्याच्या निमित्ताने मार्च २०२६ मध्ये देण्यात येईल. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील थकबाकीसंदर्भात आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ५.१६ लाख शासकीय कर्मचारी तसेच सुमारे ८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी निवेदनात सांगितले.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांची माहिती, पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली ग्वाही

पंतप्रधान किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये शेतक-यांचा समावेश होण्यासाठी शासन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *