राज्यातील काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ख्याती असलेल्या अशोक चव्हाण यांनी आज अचानक काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यातच १५ फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येत असून त्या दौऱ्यातच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अशोक चव्हाण यांच्या …
Read More »काँग्रेस नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आगे आगे देखो…
सर्वच पक्षांचे चांगले आणि बडे नेते आमच्या संपर्कात असून आगे आगे दोखो होता है क्या… असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. वाँर्ड क्र ८२ मध्ये दोन टर्म काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि उत्तर मध्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष …
Read More »जयराम रमेश यांची खोचक टीका, त्यांच्या जाण्यामुळे इतरांना प्रगतीच्या संधी
सध्या छत्तीसगडमध्ये पोहोचलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला आदीवासी बहुल कोरबु आणि सुरजगड येथे आज पोहोचली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना अशोक चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्यावर विचारले असता फारच बोलकी प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण यांच्या जाण्याने दुःख जरी झालेले असले तरी पक्षाच्या ताकदीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सांगितले. जयराम …
Read More »राजदचे तीन आमदार गळाला लावत नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला
इंडिया आघाडीची साथ सोडत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत न जाण्याचा निर्धार केलेल्या जनता संयुक्तचे प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रीय जनता दलाच्या तीन आमदारांना गळाला लावत आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. दरम्यान बिहार विधानसभेचे अध्यक्ष यांनी विधानसभा अध्यक्षपदावरून पाय उतार होण्यास नकार दिला होता. परंतु बहुमताचा आकडा …
Read More »संजय राऊत यांची टीका, आता अशोक चव्हाणही हात चिन्हावर दावा करणार का?
राज्यातील काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा आज सकाळी राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीतील सहभागी पक्षाच्या नेत्यांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्यावर खोचक टीका केली. यावेळी संजय …
Read More »पराभवाच्या छायेत असलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा
महाराष्ट्रातील काँग्रेसचे माजी आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री पद भूषविलेले अशोक चव्हाण यांनी आज अचानक काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे अनेक नेते पराभवाच्या छायेत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यातच अशोक चव्हाण यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण …
Read More »मंदिराचे ट्रस्टी आता समर्थ रामदास तर योगी आदित्यनाथ छत्रपती शिवाजी महाराज ?
तसेही देशात हिंदूत्ववादी राजकारणाला देशातील आणि विशेषत पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेने स्विकारण्यास सुरुवात केली आहे. तसे उत्तर भारतातील केवळ भगव्या कपनीने स्वतःला विद्वान (?) समजणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक कथित भगवी कपनी धारण करणाऱ्यांना महाराष्ट्राचा आणि देशाच्या इतिहासाचा नव्याने शोध लावण्याचा प्रकार सर्रास सुरु झाला आहे. पुणे …
Read More »सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, अजित पवारांसोबत सर्व जिल्हे फिरलो याचा अभिमान
अजित पवारांवर टिका करण्याची मोहीमच पैसे टाकून, पैसे देऊन सोशल मिडियाच्या माध्यमातून केली जात आहे. टिकाटिप्पणी करताना भान सोडून बोलत आहेत. दादांवर टिका करण्यासाठी काही पगारी माणसं ठेवली गेली आहेत. चतुर्थश्रेणी कर्मचार्यांना मी सन्मान देतो पण त्यापेक्षा खालच्या स्तरावरील जे पदाधिकारी आहेत ते एकेरी भाषेत दादांना बोलत आहेत. येत्या पुढच्या …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,… स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार
शासन आपल्या दारी हे अभियान राज्यामध्ये राबविण्यात आले असून या अभियानाच्या माध्यमातून राज्यामध्ये २ कोटी ६० लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सिडको मैदान येथे आयोजित महासंस्कृती मोहत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. …
Read More »छगन भुजबळ यांचे आवाहन, …तर जुन्या मित्रांनी व नेत्यांनी पुनर्विचार करावा
राज्यातील युवक अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. हा प्रतिसाद पाहिल्यानंतर जुन्या मित्रांनी व नेत्यांनी पुनर्विचार केला पाहिजे. ते का उभे आहेत याचा विचार केला पाहिजे असा उपरोधिक टोला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी …
Read More »
Marathi e-Batmya