नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध वाढू लागल्यानंतर रिफायनरीचा प्रकल्प रत्नागिरीतल्या राजापूरमधील बारसू येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थानिकांना विश्वासात घेतल्यानंतर असे आश्वासन देत रिफायनरी प्रकल्प राबविण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या. मात्र प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती परिक्षणाला सुरुवात करताच स्थानिकांचा विरोध मोठ्या प्रमाणावर सुरू …
Read More »राज्य सरकारच्या ‘या’ विभागात निवड झालेल्या २ हजार उमेदवारांना मिळणार नियुक्ती पत्रे महाराष्ट्र दिनी नियुक्ती पत्र देण्यात येणार
राज्य सरकार च्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या २ हजार २ उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर होणाऱ्या शासकीय ध्वजावंदन कार्यक्रमानंतर पात्र निवडक उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता एकत्रित २ हजार २ उमेदवारांना नियुक्ती पत्रप्रदान करणे …
Read More »खरीप हंगामासाठी संरक्षित साठा तयार करा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश
“येत्या खरीप हंगामात युरिया आणि डीएपी खताची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीने नियोजन करा. काळाबाजार करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार यांच्या तपासण्या करुन त्यांच्यावर कडक कारवाई करा. शेतकऱ्यांसाठी आवश्यक खतांचा संरक्षित साठा तयार करुन ठेवा,” असे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी यंत्रणेला दिले. खरीप हंगाम -२०२३ साठी युरिया आणि डीएपी …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा दिल्लीतील हस्तकांची महाराष्ट्रात दादागिरी चालू देणार नाही
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करुन सर्वेक्षण केले जात आहे. या पोलीस दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून पोलीस बळावर कोणाचा विकास साधायचा आहे? स्थानिक जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादणे ही हुकूमशाही असून कोणत्याही परिस्थिती भाजपा सरकारची ही दादागिरी सहन केली जाणार नाही. बारसू रिफायनरीसाठी …
Read More »बीकेसीतील ‘वज्रमुठ’ सभेसाठी काँग्रेसच्या या ६ नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी महाराष्ट्र दिनी जंगी सभेसाठी सोपविली जबाबदारी
महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेच्या माध्यमातून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले असून मुंबईतील बीकेसी मैदानावर सोमवार १ मे रोजी महाराष्ट्र दिनी विशाल वज्रमूठ सभा होत आहे. या सभेच्या नियोजनात काँग्रेस पक्षही मोठ्या ताकदीने कामाला लागला असून सभा यशस्वी करण्यासाठी सहा नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. बीकेसी मैदानावर होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ …
Read More »शालेय शिक्षण अभ्यासक्रमात लवकरच कृषी विषयाचा समावेश होणार शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. यासंदर्भातील अहवाल आज मंत्री सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. …
Read More »बारसूवरून देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, कुणाची सुपारी घेऊन विरोध करताय ते तरी सांगा ? जामनगरमध्ये रिलायन्सची रिफायनरी असून तेथे चांगल्या दर्जाचे आंबे
जनतेने हे पाहिलं आहे की मोदीजींसोबत मिळून जे मुख्यमंत्री काम करतात त्या राज्याचा विकास होतो. महाराष्ट्रातही डबल इंजिन सरकार आहे. विकासाच्या मार्गाने आपण पुढे जात आहोत. कर्नाटकात भाजपाचं बहुमताचं सरकार येईल याची मला खात्री वाटते. एक्झिट पोलचे आकडे काहीही सांगू द्या मात्र आम्ही एक्झिट पोल्सना मागे अनेकदा मागे टाकलं आहे …
Read More »अजित पवार यांचा इशारा, दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका; तात्काळ स्थगित करा खारघर घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या
बारसू रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तात्काळ स्थगित करून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी व त्यावर मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट करत सरकारला दिला. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर …
Read More »ते पत्र दाखवत उदय सामंत यांची टीका, ह्याला म्हणतात दुटप्पीपणा….. बारसू आंदोलन पेटल्याने राजकिय वातावरण तापले
नियोजित नाणार येथील रिपायनरी प्रकल्प स्थलांतरीत करून तो राजापूर तालुक्यातील बारसू येथे घेण्यात आला. मात्र आता बारसू येथील नागरिक रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करत आहेत. सोमवारी रात्रीपासून स्थानिक नागरिकांनी रिफायनरीला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. रात्रीपासून हे आंदोलनकर्ते तिथेच बसून होते. आज प्रकल्पस्थळावरील माती …
Read More »फडणवीसांचे दुर्लक्ष; अखेर संजय राऊत यांनी ठोठावला सीबीआयचा दरवाजा आता सीबीआय चौकशी करणार का?
काही दिवसांपूर्वी भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना घोटाळाप्रकरणी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत कागदपत्रासह आरोप करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशी करण्याचे आवाहन केले. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर संजय राऊत यांनी थेट सीबीआय यंत्रणेचा दरवाजा ठोठावत भीमा-पाटस सकारी साखर …
Read More »
Marathi e-Batmya