टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टीसीएस) ने गुरुवारी चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत (किमान आर्थिक वर्ष २६) त्यांच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर (वार्षिक) १.३९ टक्क्यांनी वाढ नोंदवली. पुनरावलोकनाधीन तिमाहीत, नफा १२,०७५ कोटी रुपये झाला जो मागील वर्षीच्या याच कालावधीत ११,९०९ कोटी रुपये होता. आयटी क्षेत्रातील या आघाडीच्या कंपनीचा …
Read More »वेदांत ग्रुपचे अनिल अग्रवाल म्हणाले की, तेलाचे उत्पादन वाढवावे ५ दशलक्षवरून ९ दशलक्ष बॅरलवर उत्पादन पोहोचणार
वेदांत ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी गुरुवारी सांगितले की, भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी भारताने देशांतर्गत तेल उत्पादन वाढवावे. त्यांनी बीपीच्या अंदाजांचा संदर्भ दिला, ज्यामध्ये २०५० पर्यंत भारताची तेलाची मागणी जवळजवळ दुप्पट होईल, जी सध्याच्या ५ दशलक्ष बॅरल प्रतिदिनवरून ९ दशलक्ष बॅरल प्रतिदिन होईल. अनिल अगरवाल …
Read More »स्पाईसजेट एअरलाईनच्या शेअर्समध्ये ४१ टक्क्यांच्या घसरणीनंतर १५ टक्क्याने वाढला आतापर्यंत शेअर्सच्या दरात ४१ टक्क्याची घसरण
गुरुवारी स्पाइसजेट लिमिटेडचे शेअर्स १५.९१ टक्क्यांनी वाढून ३३.०९ रुपयांवर बंद झाले, ज्यामुळे एक मजबूत पुनरागमन झाले. घसरणीनंतरही, वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत या शेअरमध्ये ४१.३५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. सणाच्या आणि हिवाळी प्रवासाच्या हंगामापूर्वी देशांतर्गत नेटवर्कचा विस्तार करण्याच्या उद्देशाने या बजेट एअरलाइनने अलीकडेच नवीन उड्डाण मार्गांची घोषणा केली. एअरलाइनने अलीकडेच अंदमान …
Read More »दादाजी भुसे यांची माहिती, शाळांमध्ये मराठी भाषा राज्यगीत गायन अनिवार्य सर्व शिक्षण मंडळाच्या समन्वयक, प्राचार्य यांची सहविचार बैठक
राज्य शिक्षण मंडळासह अन्य सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन अनिवार्य असून राज्यगीत गायन सुद्धा केले जावे, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली. राज्यातील सर्व शिक्षण मंडळाच्या समन्वयक, प्राचार्य आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची सहविचार बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री भुसे बोलत …
Read More »विजय वडेट्टीवार यांची खोचक मागणी, महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी गुंडांना वेळेत शस्त्र परवाने मिळावे म्हणून विशेष काऊंटरची व्यवस्था करावी
अकोल्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय बोचरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय.२ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाले आहे. या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने हा काळा शासन निर्णय रद्द केलाच पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळनेते विजय वडेट्टीवर यांनी केली. नागपूर …
Read More »डान्स बारनंतर, गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याचा योगेश कदम यांच्यावर आरोप विरोधकांकडून योगेश कदम यांच्या मंत्रीपदाचा राजीनाम्याची मागणी
गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांच्या अडचणी सातत्याने वाढ होत आहे. आईच्या नावाने डान्स बार चालवल्यानंतर आता त्यांच्यावर एका गुंडाच्या भावाच्या नावाने शस्त्र परवाना जारी करण्यास मान्यता दिल्याचा आरोप होत असून योगेश कदम यांच्यावरील या गंभीर आरोपामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून योगेश कदम यांच्यावर …
Read More »स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ राज्य निवडणूक आयोगाने दिली माहिती
राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या यादीतील नावे https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या …
Read More »मुक्तिदिनी ११ ते १३ ऑक्टोबर पर्यंत तपोवन एक्सप्रेसला नगरसूल येथे तात्पुरता थांबा चैत्यभूमी व दीक्षाभूमीनंतर येवला मुक्तिभूमीसंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार रेल्वेकडून पहिल्यांदाच विशेष सोय
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार येवला मुक्तीभूमी येथे १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुक्तिदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई (CSMT) – नांदेड तपोवन एक्सप्रेस या रेल्वेला येवला तालुक्यातील नगरसूल स्थानकावर दि. ११, १२ आणि १३ ऑक्टोबर २०२५ या दिवशी तात्पुरता थांबा मंजूर करण्यात आला आहे. या …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु सेवा वर्गातील लवचिकता
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार असल्याची माहिती माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, या …
Read More »रोहित पवार यांचा आरोप, सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक आकडे फुगवणे दाखवले सरकारची घोषणा मोघम आणि फसवी
सरकारने हिवाळी अधिवेशन १० दिवसांचे न घेता ३ आठवडे घेतले पाहिजे. यामध्ये लोकांचे काय म्हणणे आहे, अडचणी ऐकाव्यात हे आमची मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना आणि कोरोना काळात नेहमी सांगत होते की अधिवेशन ३ आठवड्याचे पाहिजे, शेतकरी अडचणीत असताना हे अधिवेशन ३ आठवड्याचे का नसावे असा सवाल …
Read More »
Marathi e-Batmya