Editor

राज्याला पाऊसाने झोडपले! २१३ लोक पूराच्या पाण्यात अडकले एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने रेस्क्यू

राज्यात मागील तीन दिवसांपासून असलेल्या पावसाने सोमवारी मुंबईसह राज्याला झोडपून काढले. परिणामी पूर स्थितीत निर्माण झाल्याने पाण्यात अडकलेल्या २१३ लोकांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने रेस्क्यू केल्याची माहिती, मंत्रालय आपत्कालीन कक्षाने दिली. तसेच पुढील दोन दिवस हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केल्याचे ही सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन कक्षातील राज्यातील …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला स्थगिती नाही पण सुधारणांना स्थगिती संपूर्ण कायद्याला स्थगिती देण्यासाठीची याचिका नव्हती

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१५ सप्टेंबर २०२५) संपूर्ण वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ ला स्थगिती देण्यास नकार दिला, असे नमूद केले की गृहीतक नेहमीच विधिमंडळाने मंजूर केलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेच्या बाजूने असते. “केवळ दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांमध्येच न्यायालय कायद्याला आव्हान देण्यास स्थगिती देऊ शकते. आम्हाला असे आढळून आले आहे की संपूर्ण कायद्याला …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ह्युंदाई कंपनीने अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मिती वाढवावी ह्युंदाई कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

वाहन उद्योगात ह्युंदाई कंपनीचे मोठे नाव आहे. कंपनीने राज्यातही गुंतवणूक केली आहे. पुणे येथील प्रकल्पातून वाहन उत्पादनात वाढ होणार आहे. ह्युंदाई कंपनीने राज्यात वाहन उद्योगात अधिकाधिक गुंतवणुक करीत रोजगार निर्मितीमध्ये वाढ करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ह्युंदाई कंपनीच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत केले. ह्युंदाई कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू …

Read More »

राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट आष्टी तालुक्यात पुरामुळे अडकलेल्या ४० जणांना एअरलिफ्ट करण्याचे दिले निर्देश

मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, पंतप्रधान मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय पंतप्रधान मोदींचे आर्थिक, परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आर्थिक, परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी ठरले आहे. मोदी यांच्या स्वत:च्या इगोमुळे देशाचे आर्थिक, परराष्ट्र धोरण याला धक्का बसलाय. मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय. भारत जगभरातून जे ऑईल घेऊन इतर देशांना विकतोय त्याचा ८० टक्के नफा जवळपास ४४ हजार कोटींचा नफा (प्रॉफीट) हा फक्त अंबानीला होतोय. …

Read More »

राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

गुजरात राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ …

Read More »

माद्रिदमध्ये अमेरिकेचे स्कॉट बेसेंट आणि चीनचे उपप्रधान हे लाइफेंग दरम्यान चर्चा टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट

अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट आणि व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी १४ सप्टेंबर रोजी माद्रिदमध्ये चीनचे उप-पंतप्रधान हे लाइफेंग यांची भेट घेतली, ही गेल्या काही महिन्यांतील त्यांची चौथी उच्चस्तरीय चर्चा होती. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील टॅरिफ युद्धांमुळे बिघडलेले अमेरिका-चीन व्यापार संबंध स्थिर करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट आहे. चीनचे …

Read More »

अर्थशास्त्रज्ञ रूचिर शर्मा म्हणाले की, भारत चीनची बरोबरी करू शकणार नाही फ्रीबी संस्कृती हे एक प्रमुख कारण

अर्थशास्त्रज्ञ आणि निधी व्यवस्थापक रुचिर शर्मा यांनी म्हटले आहे की भारत कधीही चीन-शैलीतील दुहेरी-अंकी वाढ साध्य करू शकणार नाही, दोन्ही देशांमधील संरचनात्मक फरकांकडे लक्ष वेधले आणि चेतावणी दिली की फ्रीबी संस्कृतीमुळे अशी वाढ अशक्य होते. जर भारताने १०-११% दराने विकासाचे लक्ष्य ठेवले तर त्याला कोणते आव्हान असेल असे विचारले असता, …

Read More »

नवीन कर प्रणालीमुळे वजावटीचे प्रमाण कमी नाही, पण पैसे वाचणार १० प्रमुख कर सवलतींची रूपरेषा तयार

बहुतेक करदात्यांना असे वाटते की नवीन कर प्रणालीमुळे वजावटीचे प्रमाण कमी होते – परंतु ते पूर्णपणे खरे नाही. २०२५-२६ च्या कर निर्धारण वर्षासाठी, अनेक प्रमुख सवलती आणि वजावटी उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमचे हजारो पैसे वाचण्याची शक्यता आहे. ईफाइलटॅक्समध्ये नवीन प्रणाली अंतर्गत दहा प्रमुख कर सवलतींची रूपरेषा आहे ज्याचा पगारदार व्यक्ती, …

Read More »