Editor

नीती आयोगाचे बीव्हीआर सुब्रमण्यम यांची स्पष्टोक्ती, दिवाळी पूर्वी आणखी एक बदल बाजाराच्या अनुषंगाने आणखी एक मोठा बदल होणार

भारताने शुल्क कमी करावे आणि मूल्य साखळीतील बिगर-शुल्क अडथळे दूर करावेत, कारण उत्पादनात स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी बाजारपेठा उघडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी सोमवारी सांगितले. भारतात अनेक उत्पादन मध्यस्थांची कमतरता असल्याचे सांगून, आगामी राष्ट्रीय उत्पादन धोरण (एनएमपी) अशा समस्या सोडवेल अशी अपेक्षा आहे. “आशा आहे की, …

Read More »

नायका कंपनीचे शेअर्स ७ टक्क्याने वाढले शेअर्सच्या किंमतीत ७.१३ टक्क्यांनी वाढ २५६ वर पोहोचला दर

ऑनलाइन फॅशन रिटेलर नायकाची मूळ कंपनी असलेल्या एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये ७.१३ टक्क्यांनी वाढ झाली आणि तो २५६.९५ रुपयांचा सर्वकालीन उच्चांकी दर गाठला. अखेर हा शेअर ६.५४ टक्क्यांनी वाढून २५५.५० रुपयांवर स्थिरावला. या किमतीवर, गेल्या सहा महिन्यांत तो ४९.१५ टक्क्यांनी वधारला आहे. आज बीएसईवर सुमारे २०.२८ लाख शेअर्सची देवाणघेवाण …

Read More »

ब्रम्हा चेल्लानी यांनी लडाखमधील परिस्थितीवरून दिला केंद्र सरकारला इशारा सोनम वांगचूक यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्हे उपस्थित करणे सोडा

भू-रणनीतीकार ब्रह्मा चेल्लानी यांनी सोमवारी लडाखमधील चालू अशांततेबद्दल केंद्र सरकारला इशारा दिला आणि यावर भर दिला की परिस्थितीला केवळ पोलिसिंगपेक्षा जास्त काही आवश्यक आहे. ब्रह्मा चेल्लानी म्हणाले की सरकारने मणिपूरमधील अशांततेला हाताळलेल्या धड्यातून धडा घेतला पाहिजे. एक्स X वरील एका सविस्तर पोस्टमध्ये ब्रह्मा चेल्लानी म्हणाले: “मणिपूरमधील अशांततेला सुरुवातीच्या संथ प्रतिसादामुळे …

Read More »

यंदाचा रोग वैद्यकशास्त्रासाठीचे नोबेल पारितोषिक या तिघांना जाहिर मेरी ई. ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना दिला जाणार

२०२५ साठी शरिरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मेरी ई. ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना रोगप्रतिकारक शक्तीवरील त्यांच्या अभूतपूर्व कार्यासाठी, विशेषतः “परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलता” वर लक्ष केंद्रित केल्याबद्दल देण्यात आले. त्यांच्या शोधांमुळे रोगप्रतिकारक शक्ती हानिकारक आक्रमणकर्त्यां आणि शरीराच्या स्वतःच्या पेशींमध्ये कसे फरक करते याबद्दलची आपली समज वाढली आहे, जी …

Read More »

राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची सोडत जाहीर नगराध्यक्ष पदी कोणत्या आरक्षित संवर्गाचा बसणार

राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत आज नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नगर विकास विभागांचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उपसचिव प्रियांका कुलकर्णी, छापवाले, उपसचिव विद्या हंम्पय्या, अनिरुद्ध जेवळीकर, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील २४७ नगरपरिषद पैकी …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, मुख्यमंत्री फडणवीसांनीच फासला हरताळ दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक

राज्यातील जनतेचे वीज बील पुढील पाच वर्षात कमी कमी केले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीरपणे सांगितले होते पण मुख्यमंत्री यांनी आपल्याच शब्दाला बगल देत वीज बील महाग केले आहे. दिवाळीच्या तोंडावर केलेली ही वीज दरवाढ सर्वसामान्यांवर टाकलेला बोझा आहे, अशी टीका काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी …

Read More »

सचिन सावंत यांचा इशारा, राहुल गांधींबद्दल मनोज जरांगेंनी वापरलेली भाषा अत्यंत निषेधार्ह, मर्यादा पाळा मनोज जरांगेंच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा, आरक्षणाचा लढा खालच्या पातळीवर आणू नये

मनोज जरांगे यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करत असताना, ही भाषा सुसंस्कृत आणि समंजस असलेल्या मराठा समाजाला शोभणारी नाही, हे लक्षात घ्यावे. मनोज जरांगे यांच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा होत आहे. मराठा समाजाची ही भाषा नव्हे. त्यामुळे आरक्षणाचा लढा …

Read More »

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकीलास केले निलंबित शिस्तभंगाची कारवाई होईपर्यंत कोणत्याही न्यायालयात वकीली करण्यास मनाई

सोमवारी सकाळी भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर, बार कौन्सिल ऑफ इंडियाने अधिवक्ता राकेश किशोर यांचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. न्यायालयीन कामकाजादरम्यान मुख्य न्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या किशोर यांना पुढील शिस्तभंगाची कारवाई होईपर्यंत देशभरातील कोणत्याही न्यायालयात, न्यायाधिकरणात किंवा कायदेशीर अधिकारात प्रॅक्टिस करण्यास मनाई करण्यात आली …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, शेतकऱ्यांसाठी प्रस्तावाची वाट कसली पाहता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीपेक्षा मुख्यमंत्र्यांना सुरजागडच्या खाणीतून मिळणाऱ्या मलईतच जास्त रस

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात असताना त्याला भरीव मदत देण्यास भाजपा युती सरकार उदासीन आहे. महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवला की मदत देऊ हे वेळकाढूपणा व असंवेदनशिलपणाचे लक्षण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याआधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करायला हवे होते. शेतकऱ्यांचे सर्वकाही उद्ध्वस्त झाले असताना प्रस्तावाची वाट …

Read More »

बिहार विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले, दोन टप्प्यात १२१ मतदारसंघात मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदार, १४ नोव्हेंबरला होणार मतमोजणी

केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याने बिहारमध्ये सर्वच राजकिय पक्ष सज्ज झाले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यात ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होईल. १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. यावेळी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश …

Read More »