Editor

“फ्लाईंग सिख” यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार बॉलीवूड सेलिब्रेटीसह अनेकांकडून आदरांजली

चंदीगड: वृत्तसंस्था/ प्रतिनिधी आपल्या धावण्याच्याबळावर किमान काही काळ तरी भारत-पाकिस्तान मधील तणावाचे संबध तणावविरहीत करण्याची किमया साधणारे फ्लाईंग सिख अर्थात जीव मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे काल शुक्रवारी निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्यावर आज शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चारच दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे निधन …

Read More »

दहा मानाच्या पालख्या ” लाल परी ” ने विठ्ठल भेटीला परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे संकट पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची ” लालपरी ” धावणार …

Read More »

पॉझिटीव्हीटी दरात घट झाल्याने ऑक्सिजन यंत्रणा आठवडा बंद कोविड पॉझिटीव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट

मुंबई : प्रतिनिधी कोविड पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे २१ जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर( लेव्हल्स) ठरवेल असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशान्वये कळविले आहे. सध्या राज्यात १६ हजार ५७० ऑक्सिजन बेडसवर रुग्ण असून ही संख्या ३५ हजारापेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही. राज्यात त्या क्षेत्रातील कोव्हिड-19 पॉझिटीव्हीटीचा …

Read More »

मविआचे २ मोठे निर्णय: १२ वीनंतर थेट २ऱ्या वर्ष इंजि.ला आणि मराठीत शिकता येणार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात आले असून निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार असून पहिल्यांदाच अभियांत्रिकेचे शिक्षण मराठीत शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात …

Read More »

ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपाचा २६ जूनला राज्यात चक्काजाम प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली आणि ओबीसी …

Read More »

इलेक्ट्रीक वाहनांची चार्जिंग स्टेशन उभी राहणार : धोरण मसूदा सादर करा लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देणे गरजेचे असून यासाठीचे सर्वंकष सुधारित धोरण निश्चित करावे व लवकरात लवकर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांनी यासंबंधीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस परिवहन मंत्री ॲड.अनिल …

Read More »

चंद्रकांत पाटील यांनी केला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निषेध विधिमंडळ अधिवेशनात आशा कर्मचाऱ्यांचा प्रश्न लावून धरू

पुणे : प्रतिनिधी आशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकूनही घेतल्या नाहीत, याचा आपण निषेध करत असल्याचे सांगत विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात भारतीय जनता पार्टी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरेल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. समाजाच्या कोणत्याही घटकाने अन्यायाच्या …

Read More »

BreakTheChain या २५ जिल्ह्यांमध्ये ५ टक्केपेक्षा कमी पॉझिटीव्हीटी राज्य सरकारकडून जिल्हानिहाय पॉझिटीव्हीटीची माहिती जाहीर

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाला रोखण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांना रूग्णसंख्येच्या आधारावर लागू करण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता देण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून सर्व जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दराची माहिती जारी केली. या दुसऱ्या आठवड्यात ५ टक्केपेक्षा कमी दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये आणखी ४ जिल्ह्यांची वाढ झाली असून गतवेळी २१ तर या आठवड्यात २५ जिल्ह्यांमध्ये ५ टक्के …

Read More »

फटकार मोर्च्यानंतर आता भाजपाचा शिवसेनेला इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आम्ही रोषही व्यक्त करायचा नाही का?

पुणे: प्रतिनिधी अयोध्या येथील राम मंदिराच्या विरोधात सतत काही विरोधी मुद्दे उपस्थित करणे काँग्रेस आणि देशविरोधी शक्तींकडून चालू असताना, शिवसेनेने त्या सुरात सूर मिसळू नये. तुम्ही काही लिहिले तर रोषही व्यक्त करायचा नाही, अशी दंडुकेशाही चालणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही शिवसेना भवनासमोर घडलेल्या प्रकारावरून शिवसेनेला दिला. …

Read More »

काँग्रेस आऊट ?…जयंत पाटलांचे शिवसेनेबरोबरील युतीचे स्पष्ट संकेत ... तर महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते

मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील त्यादृष्टीने ‘सामना’ ने मत व्यक्त केले आहे. मात्र महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि …

Read More »