मुंबई : प्रतिनिधी ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी …
Read More »कोरोना: दिड महिन्यानंतर बाधितांची संख्या २० हजाराच्या खाली १८ हजार ६०० नवे बाधित, २२ हजार ५३२ बरे झाले तर ४०४ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील जवळपास दोन महिने सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून २० ते ३० हजारा दरम्यान बाधित राज्यात आढळून येत होते. मात्र आज २० हजाराच्या आत अर्थात १८ हजार ६०० रूग्ण आढळून आले असून मागील काही दिवसातील सर्वात कमी रूग्णसंख्येची नोंद …
Read More »मराठा आंदोलन: मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकास १५ जूनपर्यंत हजर करून घ्या एसटी महामंडळाकडून आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जवळपास ८१ हून अधिक आंदोलनकर्त्यांनी आपला प्राण गमावला. अशा मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीस शैक्षणिक पात्रतेनुसार एस.टी.माहामंडळात नोकरी देण्यात येणार असून ही कार्यवाही १५ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश सर्व एसटी डेपोंना एसटी महामंडळाने दिल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी …
Read More »आघाडी सरकार SC-ST च्या सर्व योजना बंद करण्यासाठीच काम करतेय माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा आरोप
नागपूर-मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रातील आघाडी सरकार अनु.जाती/अनु.जमाती यांच्या सगळ्या योजना बंद करण्यासाठी काम करते हे दिड वर्षातील सरकारच्या कामकाजावरून सिद्ध झाले आहे. हे सांगत असताना कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे सांगत नाही तर ह्या समाजाचा घटक म्हणुन मागील दिड वर्षात सरकार मागासवर्गीय समाजाचे संवैधानिक चौकटीतील निर्णय घेत नाही हे दिसून …
Read More »मोदींचे धोरण म्हणजे लसीसाठी पैसेवाल्यांना पंचतारांकीत सुविधा तर गरिबांसाठी रांग देशातील जनतेला कोरोनाच्या खाईत लोटणा-या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा : नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली, पण सात वर्षात मोदी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून पहिल्या लाटेत नमस्ते ट्रम्पच्या आयोजनात व्यस्त राहिले आणि परिस्थिती अंगलट येताच तबलीगीच्या नावावर कोरोनाचे खापर फोडून धार्मिक रंग देण्याचा …
Read More »केंद्राच्या फेरविचार याचिकेत मराठा आरक्षणाचा उल्लेखच नाही: राजेंना वेळ द्या पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून काम करण्याचे आवाहन- मंत्री अशोक चव्हाण
मुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या फेरविचार याचिकेमध्ये ‘मराठा आरक्षण’ या शब्दाचा साधा उल्लेखही नाही. त्यांनी आपली भूमिका केवळ १०२ व्या घटनादुरुस्ती पर्यंतच मर्यादित ठेवली आहे. हा ढकलाढकलीचा विषय नाही. एक तर तूर्तास राज्याला ‘एसईबीसी’ आरक्षण देण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. हे अधिकार मिळाले तरी ५० टक्क्यांच्या मर्यादेमुळे त्याचा उपयोग होणार नाही. या …
Read More »ओबीसी आरक्षण : आता तरी नाकर्तेपणा सोडा आणि जागे व्हा ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात- देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असे पत्र विधानसभेतील …
Read More »काँग्रेस नेते-मंत्री करणार मोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने: नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करुन टाकला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठमानेने उभे केले त्याची …
Read More »आमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज माकप नेते सीताराम येचुरी यांचे मत
नवी दिल्ली / मुंबई: प्रतिनिधी आमूलाग्र सामाजिक परिवर्तन ही काळाजी गरज बनली आहे असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीने आयोजित केलेल्या ‘ महाराष्ट्राचे दीपस्तंभ ‘ या ऑनलाईन व्याख्यानमालाचे समारोपाचे पुष्प गुंफताना केले. ‘ प्रबोधन आणि समाजवाद ‘ हा …
Read More »सोशल मिडियाला संपवणं आणि लोकांना तुरुंगात टाकणं हाच केंद्राचा खेळ लोकांच्या खाजगी आयुष्यात घुसू पाहणाचा भाजपाचा कुटील डाव- नवाब मलिक
मुंबई्: प्रतिनिधी व्हॉटस्ॲपच्या आधारावर लोकांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्या आधारावर शिक्षा व्हावी. लोकांची खाजगी माहिती गोळा करता यावी. हे सगळं गंभीर व खतरनाक आहे. केंद्र सरकारचा हा सारा खेळ सोशल मीडियाला संपवणं आणि त्याआधारावर लोकांना तुरुंगात टाकणं हा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक …
Read More »
Marathi e-Batmya