मुंबईः प्रतिनिधी विधानसभा सभागृहाची आयुध गोठवे, तारांकित प्रश्न व्यपगत करणे, हरकतीच्या मुद्द्यांवर बोलू न देणे, याबाबत संताप व्यक्त करणारे भाजपा सदस्य जेव्हा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत गेले त्यावेळी त्यांना मागे आणण्यासाठी गेलो असताना, अध्यक्षांच्या दालनात कोणत्याही प्रकारची शिविगाळ झालेली नसताना, उलट तालिका अध्यक्षांची क्षमा मी पक्षाच्यावतीने स्वतः मागितली असतानाही मला सस्पेंड केले …
Read More »एमपीएससी सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार: लोणकर कुटुंबियांना मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी करण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व जागा ३१ जुलै २०२१ अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. …
Read More »भाजपा आमदारांकडून सभागृहातच धमक्या ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर आक्षेप
मुंबईः प्रतिनिधी अधिवेशनातील चर्चेदरम्यान भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. भाजपाचे आमदार काय धमकी देत आहेत का? सभागृहात धमकी दिली जात आहे, काय सुरु आहे, असा संताप सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला. सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना नाना पटोले …
Read More »तालिका अध्यक्षांना शिवीगाळ-धक्काबुक्की केल्याने भाजपाचे १२ आमदार वर्षासाठी निलंबित घडलेल्या घटनेची भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आपबीती
विरोध असताना ओबीसी ठराव आवाजी मतदानाने मंजूर केल्याचा राग मनात धरून सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना भाजपा सदस्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची दुर्दैवी घटना घडली. झाल्याप्रकाराने विधानसभेचे कामकाज जवळपास १ तासासाठी तहकूब करावे लागले. अखेर झाल्याप्रकारावर सभागृहातच चर्चा करण्याचे ठरले. त्यानुसार तालिका अध्यक्ष …
Read More »ओबीसीप्रश्नी भुजबळ-फडणवीस यांच्यात खडाजंगीः गोंधळामुळे कामकाज तहकूब केंद्राने ओबीसींचा इप्मिरियल डेटा द्यावा या मागणीचा ठराव गोंधळातच मंजूर
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ओबीसी समाजाचे संपुष्टात आलेले राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सादर करावयाच्या इंम्पिरियल डेटा केंद्र सरकारने द्यावा अशी मागणी करणारा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यास भाजपा सदस्यांनी विरोध केला. तरीही तालिका अध्यक्षांनी सदरचा ठराव मंजूर करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपाचे सर्व सदस्य अध्यक्षाच्या आसानाजवळ जावून त्यांचे …
Read More »फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद का टाळली? अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला पत्रकार परिषदेला दांडी
मुंबई: प्रतिनिधी प्रत्येक अधिवेशाच्या पुर्वसंध्येला अधिवेशन काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सौहार्दाचे वातावरण रहावे यासाठी सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांसाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच पत्रकार परिषदेनंतर पत्रकार परिषद घेत विरोधकांनी केलेल्या आरोपाला उत्तर देणे ही विधिमंडळ अधिवेशन काळातील परंपरा आहे. मात्र कोरोनाच्या नावाखाली यंदाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चहापानाचा कार्यक्रम यावेळीही …
Read More »ठाकरे सरकार दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात ही ७ विधेयके मांडणार प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची यादी
मुंबई: प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या ५ जुलै ते ६ जुलै २०२१ असे दोन दिवस सुरू राहणार असून या दोन दिवसात ५ विधेयके नव्याने या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. तर २ प्रलिंबित विधेयकेही मांडली जाणार आहेत. मांडण्यात येणाऱ्या विधेयकांची यादी (1) कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेल्या …
Read More »१६ महिन्यात तब्बल १५५ कोटी रूपयांचा ठाकरे सरकारने केला प्रसिध्दीवर खर्च माहिती अधिकारात उघडकीस
मुंबई: प्रतिनिधी एकाबाजूला कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत महसूलाची वाणवा असल्याने अनेक योजनांच्या खर्चावर राज्य सरकारकडूनच मर्यादा आणण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने मागील १६ महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल १५५ कोटी खर्च केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारांतर्गत उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंदर्भात …
Read More »ओबीसींचा डेटा द्यायचा नाही हा तेव्हांच्या सरकारचा निर्णय; चेहरा उघडा पाडणार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
मुंबई : प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न फक्त देशात नाही तर केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत असून २०११ मध्ये जेव्हा केंद्र सरकारने सर्वे केला, तेव्हा त्यात ८ कोटी चुका असल्याचे निष्पन्न झाले. एकट्या महाराष्ट्रात ७० लाखावर चुका. त्यामुळे तेव्हाच्याच केंद्र सरकारने ही माहिती देऊ नये, असा निर्णय घेतला होता असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते …
Read More »सुनील लोणकरची आत्महत्या आणि सत्ताधारी-विरोधकांसाठी काही प्रश्न राजकारण्यांना परिस्थितीचे आकलन नसेल तर समाज कायम संकटात राहणार
कोरोनाचे किर्तन देशात जवळपास दिड वर्षापासून सुरु असून फेब्रुवारी २०२२ ला त्यास दोन वर्षे पूर्ण होतील. या दोन वर्षात सर्वसामान्य, कष्टकरी, वंचित, मध्यम वर्गीय, उच्च मध्यमवर्गीय अशा सर्वचस्तरातील आणि सर्वच वयोगटातील नागरीकांना याचा कोरोना प्रादुर्भावाचा फटका बसत चालला आहे. यापैकी ५० टक्केहून अधिक लोकांना त्यांच्या प्रियजनांना गमावावे लागले आहे. तर …
Read More »
Marathi e-Batmya