Editor

पटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास

अमरावती: प्रतिनिधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग हा फक्त मोझरी परिसरातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण वाटचाल करू. महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचा आधार घेऊनच ते सरकार काम करेल, असा …

Read More »

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आतापर्यंत ही उत्पन्न मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती. आता उत्पन्न मर्यादा वाढविल्याने जास्तीत …

Read More »

उपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात जीएसटी कमी करण्याचा शिफारस अहवाल जीएसटी परिषदेत मान्य

मुंबई : प्रतिनिधी कोरोना उपचारासाठीची औषधे, लस, उपकरणे आदींवरील जीएसटी माफ किंवा कमी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील मंत्रीगटाने केलेल्या शिफारशी ४४ व्या जीएसटी परिषदेने आज मान्य केल्या आहेत. शिफारशी मान्य झाल्याने ऑक्सिजन व संबंधित सामग्रीवर १२ ऐवजी आता ५ टक्के जीएसटी आकारला जाईल. कोविडसंबंधीत बहुतांश सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी केल्याने कोरोनावरील उपचार स्वस्त होण्यास …

Read More »

“आयडॉलॉजीकल करोना”च्या विरोधात गांव, वार्ड तिथे संविधान घर ! चाळीस विचारवंतांचे एकजुटीचे आवाहन गणेश देवी,आढाव, आंबेडकर, रावसाहेब कसबे, फादर दिब्रिटो यांचा सहभाग

मुंबई: प्रतिनिधी सेवादलाच्या ऐंशीव्या पुनर्घटनादिनी देशाला संबोधताना, भारतरत्न अमर्त्य सेन यांनी स्किझोफ्रेनिया सरकारशी लढताना भारत हा भरपूर प्रतिकार शक्ती असलेला आणि उत्पादनाची कमाल क्षमता असलेला देश असल्याचं म्हटलं आहे. अमर्त्य सेन आणि राजमोहन गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे गांधी आणि आंबेडकर यांच्या रस्त्यानेच अपार शक्यतांचा, अपार आशा, उमेद आणि संभावनांचा हा देश या …

Read More »

पवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार- प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत अधिकृत भूमिका मांडली. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि …

Read More »

प्रशांत किशोर- शरद पवार यांची भेट: नव्या निवडणूक रणनीतीची नांदी पण काहीकाळ वाट पहावी लागणार

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख ही खरी तर दिल्लीच्या तक्ताला धडका मारणारा नेता अशीच आहे. त्यानंतर गुढ राजकिय व्यक्तीमत्व आणि बदलत्या परिस्थितीवर मात करत स्वत:चे वेगळे अस्तित्व टिकवून ठेवणारा नेता, दूरदृष्टीचा नेता म्हणून ही सबंध देशभरात ओळखले जाते. निवडणूकीच्या आधीच राज्यात काय वारे वहातेय अंदाज …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनी सर्व सरपंचांचा माझे सहकारी असा उल्लेख करून पुढे म्हणाले की, आपण सर्वांनी गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अतिशय चांगले काम केले आहे, त्यासाठी खुप नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, मी तुम्हाला सुचना देण्यापेक्षा तुम्ही केलेल्या कामातूनच मला खुप चांगली माहिती मिळाली आहे. ज्याचा राज्यभरासाठी उपयोग करता येईल. आपण सर्वजण जनहितासाठी समाजमाध्यमांचाही खुप …

Read More »

अजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: प्रतिनिधी कोरोना काळात जनतेचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी सरकारच्या सर्व लोकांनी लक्ष घातले. सरकारने केलेल्या आवाहनाला जनतेनेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरकारने कोरोना रुग्णांच्या आकडेवारीबाबत कुठेही लपवाछपवी केली नाही. लोकांना लस कशी मिळेल आणि विशेष म्हणजे दोन डोस कसे देता येईल हा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. परंतु कोट्यवधी लोकसंख्येचा विचार करता …

Read More »

मुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालचा समुद्र आणि लगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात आजपासून १५ जून पर्यंत पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देत मुंबई कोकणसह पुणे, परभणी, सातारा, हिंगोली उस्मानाबाद, नांदे़ड लातूर भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग …

Read More »

कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी काही दिवसापासून मोदी आणि योगी यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तर प्रदेशमध्ये येत आहेत. परंतु कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती असल्याची पोलखोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. कोरोना काळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात …

Read More »