मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ व्यांदा एमपीएससी परिक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यातील विद्यार्थ्यांनी दिवसभर केलेल्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तातडीने दखल घेत या परिक्षेची नवी तारीख उद्या जाहिर करण्यात येणार असून हि तारीख ८ दिवसातील असणार असल्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना आज रात्री दिले. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेवून मुख्यमंत्री ठाकरे यांनी …
Read More »निवासी शाळेतील १० वीच्या विद्यार्थ्यांची परिक्षाकाळात राहण्याची सोय होणार १० आणि १२वीच्या ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासंदर्भात मोहिम राबविणार-शालेय शिक्षण मंत्री गायकवाड
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबर व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राज्यभर समान स्तरावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी सज्ज होताना (‘वी कॅन डू ईट ऑफलाईन एक्झाम’) ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासंदर्भातील मोहिम राज्यभर राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर …
Read More »रेम्डेसिवीर इंजेक्शन ३० टक्के अधिक किंमतीने विकता येणार अन्यथा.. किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रालाही प्रस्ताव पाठविला
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोविड-19 या साथरोगाचे रुग्ण ऑक्टोंबर, २०२० ते जानेवारी २०२१ या काळात बरेच कमी झाल्याचे दिसून आले होते. परंतु फेब्रुवारी, २०२१ च्या मध्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून दरदिवशी सुमारे १० हजार नवीन रुग्ण वाढत आहेत. आज रोजी राज्यात ९८८५९ सक्रीय रुग्ण आहेत. सदर परिस्थिती बघता राज्यात कोविड-19 …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंची स्पष्टोक्ती, लॉकडाऊनबाबत दोन दिवसात निर्णय मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळण्याचेही केले आवाहन
मुंबई : प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या आधीच राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होवू लागल्याचे दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावायचा कि नाही याचा निर्णय राज्यातील जनतेवर सोडला. परंतु, मुंबईसह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आणि पुणे विभागात सातत्याने बाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिथे …
Read More »विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन पाच जुलैपासून अधिवेशनात ६ विधेयके मंजूर
मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन सोमवार ५ जुलै २०२१ पासून सुरू होणार असून तशी शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कळविण्यात आल्याची माहिती विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत सांगितले. अर्थसंकल्पाद्वारे राज्यातील १३ कोटी जनतेला दिलासा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी असला …
Read More »अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपाचेच षडयंत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानीच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले …
Read More »तुम्ही १५ लाख देण्याची घोषणा केली पण दिले का? राज्यात दारू महागणार अर्थमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती
मुंबईः प्रतिनिधी अर्थसंकल्पावरील चर्चेत काहीजणांनी तिन्ही पक्षांचे जाहिरनामे वाचून दाखविले. आता तुम्हीही निवडणूकीच्या काळात प्रत्येकाच्या घरात १५ लाख रूपये देण्याची घोषणा केलीत. परंतु प्रत्यक्षात तुम्ही दिले का? असा उपरोधिक सवाल भाजपाच्या सदस्यांना करत आमच ही तिन्ही पक्षांचे सरकार असल्याने प्रत्येकाने जाहिर केलेल्या योजनांमध्ये काटछाट होवून किमान कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे …
Read More »भाजपा सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील घटनारी वृक्षसंख्येवर मात करण्यासाठी आणि वृक्ष लागवड होवून पर्यावरण संतुलन रहावे यासाठी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची घोषणा केली. मात्र या योजनेची चौकशी करण्यासाठी १६ आमदारांच्या विधिमंडळ समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत …
Read More »मुनगुंटीवारांचा चिमटा तर गृहमंत्री देशमुखांकडून गजल गाऊन दुःखावर फुंकर विधानसभेतील चिमट्यांनी एकच हास्यकल्लोळ
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असून मागील दोन दिवसांपासून सतत मनसुख हिरेन प्रकरणावरून विधानसभेत भाजपाने आक्रमक पवित्रा स्विकारला. त्यावरून मंत्रिमंडळात गृहमंत्री पद आपल्यालाच का मिळाले? दुसरे खाते का मिळाले नाही? असा प्रश्न कदाचित गृहमंत्री अनिल देशमुख यांना पडला असेल. तसेच मागील दोन दिवस सुरु असलेल्या गदारोळावरून तुमचे दुःख …
Read More »गृहमंत्री देशमुखांच्या विरोधात फडणवीसांनी मांडला विशेषाधिकार हक्कभंग अन्वय नाईकप्रकरणी गृहमंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती
मुंबईः प्रतिनिधी आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वक्तव्य करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केस दाबून ठेवल्याचा आरोप केला. तसेच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला असतानाही त्याबाबतची माहिती सभागृहास चुकीच्या पध्दतीने दिल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आपण विशेषाधिकार हक्कभंग मांडत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya