मुंबईः विशेष प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांच्या घराजवळ जीलेटीनच्या कांड्यानी भरलेली स्कॉरपीओ गाडी आढळली. त्या गाडीच्या मालकाचा आज मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे सकाळी आढळून आल्याने या प्रकरणातील गुढ वाढल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत याप्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्याची मागणी विधानसभेत केली. …
Read More »अजित पवारांना पडला प्रश्न म्हणाले सुधीर भाऊंना झालेय काय ? सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर अजित दादांची मिश्कील सवाल
मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांकडून टोकाची भाषणे होवून सुध्दा एकमेकांच्या टोप्या उडविण्याबाबत जरा उत्साह कमीच जाणवत आहे. मात्र आज खोपरखळ्या आणि चिमटे काढण्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चक्क भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे टोपी उडविण्याची संधी साधली. विधानसभेत आज विरोधकांनी …
Read More »देशाबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावरून घसरली उणे ८ टक्के वाढीचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात अंदाज
मुंबईः प्रतिनिधी भारताबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावरून घसरली असून आगामी वर्षभरात उणे ८ टक्के तर उद्योग क्षेत्रात ११.३ टक्के तर सेवा क्षेत्रात उमे ९.० टक्के वाढ होण्याचा अंदाज राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षण पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. फक्त कृषी क्षेत्रात सरळ ११.७ टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. राज्याचा आर्थिक …
Read More »ओबीसी- मराठा आरक्षणाप्रश्नी सरकारच्या भूमिकेची फडणवीसांनी केली पोलखोल चर्चा करून पुढील भूमिका ठरविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबईः प्रतिनिधी ओबीसी बहुल पाच जिल्ह्यात झालेल्या निवडणूकाच सर्वोच्च न्यायालयाने रद्द बातल केल्याने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ करण्याची भूमिका मांडत आहे तर दुसऱ्याबाजूला ओबीसी आरक्षण प्रकरणात ५० टक्के मध्ये आरक्षण बसविण्याचे शपथ पत्र न्यायालयात सादर केल्याने ओबीसींचे आरक्षण धोक्यात आल्याचा …
Read More »राज्यात आता सेंद्रीय-जैविक शेतीवर भर खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेती धोरणाबाबत बैठक संपन्न
मुंबई : प्रतिनिधी सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ मिळावी म्हणून जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या तयार करणे व त्यांचा जैविक शेती महासंघ तयार करणे या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व बँकाकडून सहकार्य मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …
Read More »चार दिवसानंतर राठोडांचा राजीनामा राज्यपालांकडे गेला…आणि मंजूर ही वनमंत्री संजय राठोडांचा राज्यपालांकडून राजीनामा मंजूर
मुंबईः प्रतिनिधी बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यां मंजूर केल्याची माहिती राजभवनाकडून कळविण्यात आली. संजय राठोड यांच्यासोबतचे पूजा चव्हाण हिचे अनेक फोटो समाज माध्यमात व्हायरल झाले. तसेच पूजा चव्हाण बरोबरील मोबाईल फोनवरील संभाषण व्हायरल झाले. त्यामुळे चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणी …
Read More »जळगांवच्या त्या प्रकरणात चौकशी अंती तथ्य नसल्याचा निर्वाळा गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत माहिती
मुंबई: प्रतिनिधी पोलिस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत महिला वसतीगृहातील तरूणींना कपडे काढून नाचविल्याच्या एका वृत्तामुळे विधिमंडळाच्या सभागृहात भाजपाच्या सदस्यांनी चांगलेच लावून धरले. त्यावर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहा महिला उच्च अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले. त्या चौकशी समितीचा अहवाल आज विधिमंडळात मांडताना असा कोणताही प्रकार तेथील वसतीगृहात …
Read More »मंत्रालयातून इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्रे देण्याचे नवे उद्योग भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी मुंबई महापालिकेने नाकारल्या नंतर मंत्रालयातून नगर विकास विभागाने भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे नवे उद्योग सुरु केलेत. मुंबई महापालिकेच्या अधिकारावर का गदा आणली जातेय? असा सवाल करीत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी बांद्रा येथील एक असे प्रकरणच आज सभागृहात उघड केले. विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करताना भाजपा …
Read More »कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी लागू उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करुन लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोविड सेंटरसाठी बंधनकारक असेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी विधानसभेत केली. औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला त्यावेळी उपमुख्यमंत्री …
Read More »नाना पटोलेंना देवेंद्र फडणवीसांचे आव्हान राम मंदिर निधी संकलनावरून काँग्रेस-भाजपामध्ये खडाजंगी
मुंबईः विशेष प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी काही जणांकडून निधी संकलनाचे काम करण्यात येत आहे. मात्र निधी न दिल्यास धमकाविण्याचे प्रकार सुरु असून सकाळीच कुलकर्णी व्यक्तीने येवून यासंदर्भातील माहिती दिली. त्यामुळे राम मंदिरासाठी निधी गोळा करण्याचा ठेका यांना कोणी दिला असा सवाल काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी करत अशांवर कारवाई …
Read More »
Marathi e-Batmya