मुंबई: प्रतिनिधी आज सकाळपासून ईडीने मुंबई आणि नागपूरातील अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्याशी संबधित व्यक्तींच्या घरावर छापे टाकले. या दरम्यानच्या काळात आपण ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य केले असून ईडी आणि सीबीआयला असेच सहकार्य करू अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे …
Read More »ट्विटरने दिला केंद्रीय मंत्र्यालाच झटका केंद्रीय मंत्र्याचे अकाऊंट केले लॉक
नवी दिल्ली-मुंबई : विशेष प्रतिनिधी केंद्राच्या नव्या कायद्यावरून WhatsApp, Twitter ने न्यायालयात धाव घेतली आहे. तरीही केंद्र सरकारकडून ट्विटरला चांगलेच धारेवर धरण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ट्विटर विरोधात केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद हे ट्विटरवरून देत असतात. मात्र आज त्यांचेच अकाऊंट ट्विटरने लॉक …
Read More »राज्य सरकारचा इशारा, ४ ते ६ आठवड्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जारी केल्या प्रतिबंधात्मक सूचना
मुंबई: प्रतिनिधी कोव्हिड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत. आगामी ४ ते ६ आठवड्यात कोव्हीड अर्थात कोरोनाची तिसरी लाट येवू शकते असा इशाराही सर्व जिल्हास्तरीय प्रशासनाला आज एका आदेशान्वये दिला. …
Read More »देशमुखांवरील कारवाई आणि भाजपातेर आघाडीबद्दल काय म्हणाले शरद पवार? पवारांच्या उपस्थितीत पुण्यात सुबोध मोहिते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई-पुणे: प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर येथील पाच घरांवर ईडीने छापे टाकले. या ठिकाणी ईडीनं शोधसत्र सुरू केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काय बोलणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता असतानाच पवार म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांना आलेल्या …
Read More »..तर मंत्र्यांना फिरू देणार नाही भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्य सरकारला इशारा
मुंबई: प्रतिनिधी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळावी या मागणीसाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी करत राज्य सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही तातडीने केली नाही तर या …
Read More »भाजपाच्या मविआ विरोधाला आता काँग्रेसचेही २६ जूनला मोदी विरोधी आंदोलनाचे उत्तर मोदी सरकार विरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलनः नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ओबीसी आरक्षणावरून भाजपा आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ओबीसी आरक्षण रद्द होण्यास सध्याचे महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपाने मविआच्या विरोधात २६ जूनला आंदोलनाचा इशारा दिला. त्यास प्रतित्तुर म्हणून आता काँग्रेसनेही ओबीसी आरक्षणच्या रद्द होण्यास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत २६ …
Read More »ऊसाप्रमाणे दुधासाठीही एफआरपी कायदा: दुधालाही मिळणार हमी भाव शेतकरी नेत्यांच्या बैठकीत मंत्री सुनिल केदार यांचे आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊसाला हमी भाव मिळावा यासाठी लागू करण्यात आलेल्या एफआरपी कायद्याच्या धर्तीवर राज्यातील कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एफआरपी कायदा आणणार असल्याचे आश्वासन पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी देत कायद्याची निर्मिती झाल्यानंतर दुधाला हमी भाव देण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करून त्यामध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात …
Read More »फडणवीसांचे आव्हान, देता येत नाही म्हणून सांगा ४ महिन्यात ओबीसींना आरक्षण ओबीसी आरक्षण पूर्ववत होईस्तोवर स्वस्थ बसणार नाही
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमधील ओबीसी नेत्यांकडून परस्परविरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसींना आरक्षण देता येत नाही असे सांगा चार महिन्यात आरक्षण मिळवून देतो अन्यथा पदावर राहणार नाही असे आव्हान महाविकास आघाडी सरकारला आज दिले. मुंबई येथे …
Read More »अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी: फि मध्ये २५ टक्के सूट सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा- मंत्री उदय सामंत यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड-१९ ची उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी फी व्यतिरिक्त इतर शुल्कात १६ हजार २५० रूपयांची (अंदाजे २५%) सूट देण्यात येत असल्यची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. क्रांतीज्योती …
Read More »मोदी सरकारने डाटा न दिल्याने ओबीसींवर ही वेळ ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी भाजपचे राज्य सरकार असतानाच केंद्राने त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली. पाच वर्ष हातात असताना ओबीसींचे प्रश्न का सोडवले नाही असा सवाल करतानाच भाजपला खरी काळजी असेल तर त्यांनी केंद्राकडून इंपेरिकल डाटा घ्यावा. जनतेला सुद्धा माहित आहे, कोणी कोणाच्या घरी जाऊन आता डाटा गोळा करू शकत नाही. डाटा ताबडतोब …
Read More »
Marathi e-Batmya