मुंबई : प्रतिनिधी राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्यानुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे सोबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. राज्यात सात लाख …
Read More »राज्य सरकारचा मोठा निर्णय: १० वीची परिक्षा अखेर रद्द मंत्रिमंडळ बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानंतर सीबीईएस, आयसीईएस केंब्रीज बोर्डांनाही याबाबत सूचना करत पुढील निर्णय घेण्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार या बोर्डांनी १० वी ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याधर्तीवर राज्यातील १० …
Read More »ऑक्सीजन, रेमडेसिवीर अभावी जीव जात असतानाही भाजपाचे राजकारण भाजपा शासीत राज्यातील कोरोना स्थितीवर हायकोर्टाने ओढलेले ताशेरे डॉ. हर्षवर्धन यांनी आधी पहावेत- नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या भयानक स्थितीचा महाराष्ट्र सामना करत असताना केंद्र सरकारने राज्याला योग्य ती मदत करणे अपेक्षित आहे. परंतु रेमडेसीवर, ऑक्सीजनअभावी जीव जात असतानाही त्यात राजकारण केले जात आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. राज्य सरकारने रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी निविदा काढली असता दोन कंपन्या ज्या आतापर्यंत राज्याला दररोज ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन …
Read More »भाजपावाल्यांनाच रेमडेसीवीर कसे मिळते? आगामी काळात भाजपच्या कारनाम्यांचा भांडाफोड करणार असल्याचे नवाब मलिक यांचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी राज्यासह देशात कोरोनाबाधित रूग्णांसाठी रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा जाणवत असताना गुजरातमध्ये भाजपा कार्यालयात आणि जळगांवातील भाजपाच्या माजी आमदाराकडून रेमडेसिवीर औषधांचे मोफत वाटप, त्याचा काळाबाजार आणि साठेबाजी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना ब्रुक फार्मा कंपनीकडूनही रेमडेसिवीरचा साठा उलब्ध होणार असल्याचे सांगितले. रूग्णांसाठी रेमडेसीवीर औषधे उपलब्ध …
Read More »BreakTheChain: हि दुकाने यावेळेनंतर बंद पण होम डिलीव्हरी सुरु राहणार राज्य सरकारकडून आज पुन्हा नव्याने आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कडक निर्बंध लागू करून अत्यावश्यक सेवेतील दुकांनातील वस्तु खरेदीच्या नावाखाली रस्त्यावर फिरताना आढूळ येत आहेत. तसेच दुकांनावर खरेदीच्या निमित्ताने गर्दीही करत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी त्याची साखळी वाढतच असल्याने राज्य सरकारने नव्याने निर्बंध लादत हॉटेल-रेस्टॉरंट वगळता अत्यावश्यक सेवेतील दुकांनाच्या वेळेचे बंधन घातले आहे. यासंबधीचे आदेश …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या मागणीला अखेर यश: १८ वर्षावरील सर्वांना लस पंतप्रधान मोदींचे मानले आभार, १ मे पासून लस मिळणार
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी कोरोनाची लस १८ वर्षावरील सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सर्वप्रथम मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत आणि पत्राद्वारे केली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अखेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यासंदर्भात पंतप्रधान …
Read More »चंद्रकांत पाटील यांचा खा. राऊतांना सल्ला तर मलिक यांची राज्यपालांकडे तक्रार रेमडेसिवीरवरून राजकारण थांबविण्याचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. केंद्र सरकारने महाराष्ट्राला होणारा …
Read More »अजित पवारांचे आदेश, आर्थिक पॅकेजमधील लाभार्थ्यांना मदत निधी वाटप करा निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही
मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना’संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४७६ कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले. सात कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, सामाजिक न्याय विभागाच्या ३५ लाख, आदिवासी विभागाच्या १२ …
Read More »राज्यातील किराणा दुकाने आता सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली राहणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ऑक्सिजन, रेमडीसीवीर उपलब्धतेबाबत महत्वाची बैठक
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कडक निर्बंध लागू करूनही जनता किराणा दुकानाच्या नावाखाली रस्त्यावर बाहेर फिरत आहे. तसेच गर्दीही करत आहे. त्यामुळे आता किराणा दुकाने उघडी ठेवण्यावर निर्बंध आणण्यात आले असून राज्यातील सर्व किराणा दुकाने आता सकाळी ७ ते सकाळी ११ वाजण्याच्या कालावधीत सुरू ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …
Read More »रेल्वेने प्रवासानंतर १५ दिवस होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक लांब पल्ल्याच्या गाड्यानी राज्यांतर्गत आणि जिल्ह्यातंर्गत जाण्यासाठी नियम
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहिर केली असून लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांनी करणाऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असेल तरी ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबरोबर आपल्या इच्छितस्थळी पोहोचल्यानंतर १५ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्याचे आदेश राज्य …
Read More »
Marathi e-Batmya