Editor

सानंद येथे देशातील पहिली सेमी कंडक्टर टेस्ट सुविधेचे उद्घाटन सेमी कंडक्टर बनविण्याच्या मार्गातील पहिला टप्पा

अभियांत्रिकी कंपनी सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडने गुरुवारी (२८ ऑगस्ट) घोषणा केली की त्यांची उपकंपनी, सीजी सेमी प्रायव्हेट लिमिटेडने गुजरातमधील साणंद येथे त्यांच्या पहिल्या आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट (ओएसएटी) सुविधेचे उद्घाटन केले आहे. जी१ म्हणून ओळखली जाणारी ही सुविधा भारतातील पारंपारिक आणि प्रगत पॅकेजिंग तंत्रज्ञानावर व्यापक सेवा देणारी …

Read More »

एनएसडीएल शेअर्सचे किंमतीत वाढ, आयपीओपेक्षा जास्त व्यापार निव्वळ नफ्यात १५.१६ टक्के वाढ

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड -एनएसडीएल (NSDL) चे शेअर्स गुरुवारी ०.९३ टक्क्यांनी वाढून १,२४८.५५ रुपयांवर बंद झाले. वाढ झाली असली तरी, अलीकडेच सूचीबद्ध झालेला स्टॉक ११ ऑगस्ट २०२५ रोजीच्या १,४२५ रुपयांच्या विक्रमी उच्चांकापेक्षा १२.३८ टक्के कमी आहे. असे असले तरी, तो त्याच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग अर्थात आयपीओ IPO च्या ८०० रुपयांच्या …

Read More »

महिंद्रा एअरबससोबत आणखी एक करार, हेलिकॉप्टरच्या फ्युजलेजची निर्मिती करणार उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक्सवरून दिली माहिती

महिंद्रा एरोस्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड (एमएएसपीएल) ने एअरबससोबत आणखी एक मोठा करार केला आहे, यावेळी एच१२५ हेलिकॉप्टरच्या मुख्य फ्यूजलेजच्या निर्मितीसाठी, जे भारताच्या एरोस्पेस महत्त्वाकांक्षेत एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी या विकासाबद्दल उत्साह व्यक्त करत म्हटले आहे की, “आमच्या ग्रुपसाठी चांगली बातमी आहे, परंतु देशाच्या मेक इन …

Read More »

सेबीची ग्रोवच्या आयपीओला मान्यता कंपनीकडून बाजारातून ९ मिलियन उभारण्याचे लक्ष्य

भारतीय स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्म ग्रोवने त्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग अर्थात आयपीओ साठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी कडून मान्यता मिळवली आहे, जी त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला गोपनीयपणे दाखल केली होती. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ग्रोवने आयपीओसाठी फाइलिंग, जे $७०० दशलक्ष ते $१ अब्ज दरम्यान असू शकते, संवेदनशील आर्थिक डेटा …

Read More »

टॅरिफचा झटका, शेअर बाजार १५०० पेक्षा जास्त अंकानी घसरला कालपासून भारतीय मालावरील ५० टक्के टॅरिफ लागू झाल्याचा परिणाम बाजारावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहिर केल्याप्रमाणे काल गणेश चतुर्थीपासून अर्थात २७ ऑगस्टपासून भारतीय मालावर लागू करण्यात आलेल्या मालांवर ५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरु केली. त्याचा परिणाम आज शेअर बाजारावर होण्यास सुरुवात झाली. आज दिवसभरातील दोन सत्रांमध्ये बेंचमार्क इक्विटी मार्केट्सना विक्रीचा प्रचंड दबाव येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बीएसई सेन्सेक्स १,५०० …

Read More »

ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दालन खुले ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार

मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया २०२५ या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘उमेद’ अभियानातील महिलांच्या सियाल इंडियामधील सहभागामुळे त्यांची उत्पादने या व्यासपीठामार्फत थेट …

Read More »

विरार मधील इमारत दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू नारंगी फाटा येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची इमारत रात्री अचानक कोसळली

विरार मधील नारंगी फाटा येथील रामू कंम्पाऊंडच्या स्वामी समर्थ नगरातील रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत काल बुधवारी गणेश चतुर्थीच्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एका बाजूला कोसळली. या इमारतीमध्ये १५ ते २० नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या मलब्याखालील नागरिकांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण संध्याकाळपर्यंत यातील १७ …

Read More »

आरएसएस- भाजपा संबधावर डॉ मोहन भागवत यांचे वक्तव्य, संघर्ष होऊ शकतो…वाद नाही पंतप्रधान मोदींचा उल्लेख प्रधानसेवक म्हणून केला

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या वृत्तांवर आरएसएस प्रमुख डॉ मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच भाष्य करत म्हणाले की, संघर्ष होऊ शकतो, परंतु भाजपाशी कोणताही वाद नाही. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी “निवडणुकीच्या भाषणबाजीतून बाहेर पडून” मणिपूर संघर्ष प्राधान्याने …

Read More »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ मोहन भागवत यांचा पुन्हा तीन मुलांचा सल्ला संघाच्या १०० वर्षानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिला सल्ला

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ म्हणजे आरएसएसचे प्रमुख डॉ मोहन भागवत यांनी देशातील विवाहीत जोडप्यांनी तीन मुलं जन्माला घालावी असा सल्ला देत केंद्रीय कायद्यातील तरतूंदीना आणि जनसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्याच्या तरतूदींना हरताळ फासला होता. पण राज्यात आणि केंद्रात हिंदूत्व विचारांचे सरकार असल्याने त्यांच्या वक्तव्यावर कारवाईच नव्हे तर आक्षेप घेण्याचे धाडसही …

Read More »

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा …

Read More »