Editor

काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंपर्क अभियानाची नांदेडमधून सुरुवात जनविरोधी भाजप सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचे चव्हाण यांचे आवाहन

नांदेड : प्रतिनिधी विश्वासघातकी,जुलमी व भ्रष्ट केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी काँग्रेस पक्षाने जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली असून राज्यव्यापी अभियानाचा प्रारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमधून आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी करण्यात आला. यावेळी  खा.अशोकराव चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर …

Read More »

मनरेगामधून आता पायाभूत सुविधांची निर्मिती रोहयो मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राज्य अभिसरण आराखडा अंमलबजावणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार मनरेगा योजनेसोबत शासनाच्या इतर योजनांचा सहभाग घेऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार …

Read More »

नोटबंदीची दोन वर्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्या घोषणा दोन वर्षातील घोषणा आणि त्यातील फोलपणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी लिहिलेला लेख

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय जाहीर केला. जो अगदी अनपेक्षित होता. त्यांनी असे जाहीर केले की ५०० आणि १००० रूपयांच्याचलनी नोटा रद्द करण्यात येत आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर उद्यापासून ते ‘एक कागज का तुकडा’ होणार आहेत. लक्ष्मीपूजन होणाऱ्या ह्या देशात ही  भाषा कितपत योग्य आहे हा तर मुद्दा आहेच, मात्र दोन वर्षांनंतर ह्या धमकी …

Read More »

विधानसभा-लोकसभेच्या निवडणूका एकत्रित घेणार ? जनतेचे जनमानस जाणून घेण्यासाठी कंत्राटी नोकर भरतीची सरकारची जाहीरात

मुंबईः प्रतिनिधी संसदेच्या लोकसभा सभागृहाची मुदत येत्या मे २०१९ रोजी संपत आलेली आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच राजकिय पक्षांकडून लोकसभेच्या निवडणूकीची पूर्व तयारी सुरु केलेली असताना केंद्रातील भाजप सरकारसोबतच राज्यातील विधानसभेची निवडणूक घेण्याच्या हालचाली पक्षीय पातळीवर सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणूकांना सामोरे जाण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. …

Read More »

सामाजिक न्यायमंत्री बडोले यांची विभागाच्या कारभारावर करडी नजर गोंदीया जिल्ह्याबरोबर राज्यात मागासवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये विकास कामे

मुंबईः प्रतिनिधी मागील चार वर्षापासून राज्यातील मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी अनेकविध सरकारी पातळीवर निर्णय घेण्यात आले. त्या निर्णयानुसार स्थानिक पातळीवर कामे करण्यात येत आहेत की नाहीत याचा आढावा घेण्याचे काम सध्या घेण्यात येत असून मागासवर्गीयांच्या विकासाच्यादृष्टीने घेण्यात आलेले निर्णयाचा लाभ राज्यातील तळागाळातील नागरीकांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विभागातील …

Read More »

राज्य सरकारच्या कारभाराची २०० पोस्टर्स मुंबईत लावणार मुंबई काँग्रेस काढणार कारभारांची वाभाडे

मुंबईः प्रतिनिधी मागील चार वर्षात राज्यातील फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्षात जनतेला मिळालेले अच्छे दिन यांचे वास्तव दर्शविणारे तब्बल २०० पोस्टर्स मुंबई काँग्रेसकडून लावण्यात येणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. राज्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच गुंतवणूक आणण्याच्यादृष्टीने मेक इन …

Read More »

ठाकरे घराण्यातील वाद अखेर मिटला जयदेव ठाकरेंनी मागे घेतली याचिका

मुंबईः प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेच्या वाटणीवरून ठाकरे घराण्यात निर्माण झालेला न्यायालयीन वाद आज अखेर मिटला. मालमत्तेच्या हिश्श्यावरून दोन भावांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र जयदेव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत हिस्सा मागितला. मात्र जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयातील ही याचिकाच मागे …

Read More »

महाविद्यालयीनस्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची लवकरच भरती तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनातील वाढीचा मंत्री तावडेंचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासन ‍शिक्षक व शिक्षकेत्तर भरती करणार असून आता महाविद्यालयांना या जागा भरण्याची अनुमती दिली जाईल. त्याच बरोबर तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्ये सुध्दा वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद …

Read More »

अखेर राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर ११२ तालुक्यात गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम दुष्काळ सरकारकडून जाहीर

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून ११२ तालुक्यात गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला. यासंदर्भात राज्याच्या महसूल विभागाने शासनादेश जारी केला आहे. राज्यात ३५५ तालुके असून यापैकी सांगली जिल्ह्यातील जत, कवठे-महांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगांव तर सातारा जिल्ह्यातील माण- दहिवडी, सोलापूर जिल्ह्यातील …

Read More »

पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयात रंगणार निवडणूका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणूकांमधून खऱ्या अर्थाने नेत्तृत्वाची संधी मिळावी व लोकशाही मार्गाने सार्वत्रिक मतदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यास वाव मिळावा यादृष्टीकोनातून पुन्हा एकदा महाविद्यालयीन निवडणूका घेण्यात येणार आहे. या निवडणूकांसाठी नियम तयार केले आहेत. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये तरतूद केल्याप्रमाणे पुढील काळामध्ये महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये …

Read More »