Editor

पवारांच स्टेटमेंटच मुख्यमंत्र्यांना कळलं नाही मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते - नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी मुख्यमंत्री पवारसाहेबांच्या स्टेटमेंटवर गैरसमज निर्माण करत आहेत. त्यांना ते स्टेटमेंटच कळलं नाही. मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. पवारसाहेब म्हणाले होते की, पाकिस्तानातील राज्यकर्ते आणि सैन्यदलातील लोकं स्वतःच्या हितासाठी व राजकीय फायद्यासाठी भारताच्या विरोधात वातावरण …

Read More »

घड्याळे, स्टॉप वॉचेस, फ्रीझ, फ्रीझर, वॉटर कुलरसह अनेक वस्तूंच्या किंमती कमी होणार १९३ वस्तूंवरील कर दरात घट झाल्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. यामध्ये २२८ पैकी १९३ वस्तुंवरील कर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतके कमी करण्यात आले. १८ टक्क्यांच्या व १२ टक्क्यांच्या कर दराच्या स्लॅबमधील काही वस्तूंचे कर दर आणखी कमी करण्यात आले तर काही वस्तूंवर करमाफी देण्यात …

Read More »

हिंदूत्ववाद्यांसाठी दलाली करणाऱ्या केंद्रीय मंत्री आणि डांगळेंच्या बैठकीवर बहिष्कार घाला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून साहित्यिक, विचारवंत, विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूकीचे पडघड वाजायला सुरुवात झालेली असतानाच निवडणूकीत आपल्याच पक्षाचा वरचष्मा रहावा यासाठी प्रत्येक राजकिय पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि दलित साहित्यिक अर्जून डांगळे यांनी आंबेडकरी विचारधारेवर आधारीत संस्थेची उभारणी करण्याकरीता एका बैठकीचे आयोजन केले. मात्र …

Read More »

शिवाजी महाराजांशी संबधित गड-किल्ल्यासाठी उच्चाधिकार समिती राज्य मंत्रिमंडळाच्या टिपणीत सुधारणा

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या पर्यटनाबरोबरच महसूली उत्पन्नवाढीसाठी राज्यातील गड-किल्ले लग्न समारंभ, हॉटेल्स, पार्टीकरीता भाडेतत्वावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयावर राज्यातील सर्वचस्तरातून टीकेची झोड उठल्याने अखेर राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबधित गड-किल्ल्यांना विकसित करण्यासाठी उच्चाधिकारीची स्थापना करत राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या टिपणीत सुधारणा करण्यात आल्याची माहिती हाती …

Read More »

महाजनादेश यात्रा झाली शासकिय यात्रा ? मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयातून भाजपाच्या यात्रेची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दैनंदिन शासकिय कार्यक्रम प्रसारमाध्यमांना कळावेत यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयातून त्याची माहिती देण्यात येते. मात्र शासकिय मुख्यमंत्र्यांचे शासकिय कार्यक्रम- बैठकांची माहिती देण्याऐवजी भाजपच्या राजकिय असलेल्या महाजनादेश यात्रेची माहिती मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसारमाध्यमांना कळविण्यात येत असल्याने महाजनादेश यात्रा …

Read More »

पं.दिनदयाल संस्थेला तो भूखंड अद्याप दिलेला नाही अखेर मराठी ई-बातम्याच्या वृत्तावर राज्य सरकारचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी चर्नी रोड स्टेशन लगत असलेली जवाहर बालभवन लगतचा भूखंड राज्य सरकारकडून पंडित दिनदयाल सेवाभावी संस्थेला देण्याचा घेतलेला निर्णय मराठी ई-बातम्या.कॉम या संकेतस्थळावर प्रसिध्द होताच तो भूखंड सदर संस्थेला द्यायचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याचा खुलासा उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. मराठी ई-बातम्या संकेतस्थळावर वृत्त प्रकाशित झाल्यानंतर …

Read More »

भाजप सरकारला पाकिस्तानचा कांदा कसा चालतो? राज्य सरकारला पाकिस्तानी शेतक-यांबद्दल प्रेम उफाळून आल्याचा आ. बाळासाहेब थोरातांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) ने पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतक-यांना वा-यावर सोडणा-या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतक-यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील …

Read More »

पवारांच्या भेटीनंतर उदयनराजे भाजपात जाहीर प्रवेश करणार मोदींच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा

पुणे-मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून सत्तेत राहता यावे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या मनधरणीला बगल देत सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अधिकृतपणे आपण भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केले. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या भेटीनंतर …

Read More »

दोन वर्षांत कोणीही बेघर राहणार नाही महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

अहमदनगरः प्रतिनिधी महाराष्ट्रात बेघर असलेल्या सर्वांना घरे देण्याचे काम वेगाने चालू असून २०२१ पर्यंत राज्यातील कोणीही बेघर असणार नाही, प्रत्येक गरीबाला रहायला घर मिळेल, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यात अकोले येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ …

Read More »

मोदी – फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत डंका पिटतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी देशात मोदी आणि राज्यात फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत विकासकामांचा डंका पिटत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. निवडणुका जवळ आल्यावर केंद्र व राज्य सरकार मोठमोठया जाहिराती आणि विकासकामांची उद्घाटने करत विकास आम्हीच करत आहे असे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री पियुष …

Read More »