नाशिकः प्रतिनिधी निवडणूकांमध्ये मते मिळावीत यासाठी शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेतेही शेजारच्या देशाबद्दल चांगले बोलत आहेत. मात्र संपूर्ण महाराष्ट्र, भारत देश आणि जगाला माहित आहे की, दहशतवादाचे अड्डे आणि शस्त्रास्त्रे कुठून येतात. त्यामुळे पवारांच्या वक्तव्याबाबत आश्चर्य वाटत असल्याची उपरोधिक टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या टप्प्यातील …
Read More »उमेदवाराच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ करा राष्ट्रवादीची मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटी दरम्यान मागणी
मुंबई : प्रतिनिधी सध्या महागाई वाढलेली असून जीएसटीचा खर्चही आहे. त्यामुळे उमेदवारासाठी २८ लाख रूपयांची खर्च मर्यादा ही अपुरी असल्याने निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने दोन दिवसांच्या दौऱ्यावर केंद्रीय निवडणूक आयुक्त मुंबई …
Read More »राज्यातील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदार वगळा काँग्रेसची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची तसेच राज्याच्या मतदार यादीतील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नावे तातडीने वगळण्याची मागणी काँग्रेस पक्षाने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा, अशोक …
Read More »पक्षातून विकासासाठी गेलेल्यांना आमदार, मंत्री केले होते, त्यांनी काय केले? आगामी निवडणूकीत तरूणांईला प्राधान्य देणार असल्याची शरद पवारांची घोषणा
बीड: प्रतिनिधी आपल्या पक्षातून निघून जाताना या विभागातील नेत्यांनी विकासासाठी पक्ष सोडल्याची कबुली दिली पण मग प्रश्न पडतो की, पक्षात असताना तुम्हाला १५ वर्ष आमदार मग राज्य मंत्री केलं मग त्यावेळी तुम्ही नेमकं केलं काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर …
Read More »तीन महिन्यात ३३ कोटीपैकी ३१ कोटी वृक्षांची लागवड नाशिक, नांदेड, चंद्रपूर, पुणे, यवतमाळसह कोल्हापूरात १ कोटीहून अधिकची वृक्ष लागवड झाल्याची वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्याच्या वन विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार जुलै ते सप्टेंबर महिना अजून पूर्ण होण्याच्या आताच राज्यात ३१ कोटी २० लाख ०७ हजार ७३७ वृक्षांची लागवड झाली असून ही संख्या ३३ कोटी संकल्पाच्या ९०.६५ टक्के इतकी …
Read More »राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी खाजगीकरणाच्या विरोधात करणार आंदोलन सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, आझाद मैदानावर आंदोलन करणार
मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या सर्व विभागातील २५ टक्के पदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने आगामी २-३ वर्षात सरकारी सेवेतील चतुर्थश्रेणीची पदेच नष्ट होणार आहेत. त्यातच शिपाई प्रवर्गासाठी खाजगी संस्थेकडून मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत असल्याने राज्य सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि मुंबईत आझाद मैदानावर १९ …
Read More »पालघर, मेळघाटमधील बाईक ऍम्ब्युलन्स सेवा बंद पडल्याचा सरकारलाच पत्ता नाही भाजप-शिवसेना सरकारची जाहीरातबाजीमध्येही 'बनवाबनवी'! -विजय वडेट्टीवार
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात फसवण्याचा उद्योग करुन जनतेची दिशाभूल केली असून आता जाहिरातबाजीतही त्यांनी खोटारडेपणाची सीमा ओलांडली आहे. आरोग्य विभागाच्या जाहीरातीत दिलेली माहिती सपशेल खोटी आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारची पाच वर्षातील कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची झाली असून कोणताही घटक …
Read More »मला अजून लय जणांना घरी पाठवायचय ! राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकिय कुरघोडीचे संकेत
सोलापूर-मुंबईः प्रतिनिधी राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न दाखवित राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काँग्रेसमधील अनेक आमदार, नेत्यांना भाजपाने गळाला लावत विरोधकांना निष्भ्रम करण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र मी काय म्हातारा झालो? अजून लय जणांना घरी पाठवायचय असे सांगत राजकिय कुरघोडीत आपणही मागे नसल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणूकीत तोडीसतोड उत्तर देणार असल्याचे स्पष्ट संकेत …
Read More »नियोजनशून्य कारभारामुळे पाच वर्षात ६० टक्केच निधी खर्च भाजप-शिवसेना सरकारचा आर्थिक नियोजनात बेशिस्तीचा कळस: विजय वडेट्टीवार
मुंबई: प्रतिनिधी भाजप शिवसेना युती सरकारची पाच वर्षातील कामगिरी सुमार झाली असून आर्थिक नियोजनही फसले आहे. सरकारचा आर्थिक ताळेबंद पाहिला तर पाच वर्षात सर्व विभागांसाठी एकूण १४ लाख १३ हजार २७६ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती, परंतु ८ लाख ९६ हजार ४८२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. याचाच …
Read More »आम्ही विदर्भाला पैसे दिलेच पण पश्चिम महाराष्ट्रालाही पूर्ण निधी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर
सांगली-पलूसः प्रतिनिधी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना पश्चिम महाराष्ट्रात डझनभर मंत्री होते. विदर्भाचा अनुशेष म्हणून तिकडे पैसे द्यावे लागतात असे सांगून ते पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांना निधी देत नव्हते. आम्ही सत्तेवर आल्यावर विदर्भाला तर निधी दिलाच पण पश्चिम महाराष्ट्रातील टेंभू- ताकारी – म्हैसाळ अशा सर्व योजनांसाठी पूर्ण निधी …
Read More »
Marathi e-Batmya