मुंबई : प्रतिनिधी घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर, शांतीसागर पोलीस वसाहत आणि कामराज नगर येथील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी आज मंत्रालयात सांगितले. ते आज घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर, शांतीसागर पोलीस वसाहत आणि कामराज नगर झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. महेता म्हणाले, …
Read More »सरकार दरबारी प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने राष्ट्रवादीकडे प्रश्न पाठवावे जनतेने प्रश्न आणि समस्या राष्ट्रवादी कार्यालयात पाठविण्याचे आवाहन
मुंबईः प्रतिनिधी दुष्काळ… महागाई… इंधनाचे वाढते दर… महिला सुरक्षितता… आरक्षण… शेतकऱ्यांचे… सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत त्यामुळे जनतेकडूनच थेट प्रश्न मागवण्यात येत असून हे प्रश्न आणि समस्या येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये भाजप सरकारच्या गळी उतरवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी देतानाच राज्यातील जनतेने आपले प्रश्न …
Read More »काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकारविरोधात मुंबईत आंदोलन राष्ट्रवादीच्या कार्यालयात महत्वपूर्ण संयुक्त बैठक पार
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवक काँग्रेस (INC)आणि समविचारी पक्षाच्या युवकांची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये आज पार पडली. येत्या काळामध्ये सरकारच्या धोरणाविरोधात मुंबईमध्ये मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला. ही बैठक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला …
Read More »आधी बनवा आणि मग नावाची भांडणे करा समृध्दी महामार्गाला नाव देण्याच्या मागणीवरून नवाब मलिक यांचा सेना-भाजपला टोला
मुंबई : प्रतिनिधी समृध्दी महामार्गातील शेतकऱ्यांवर अन्याय न करता समृध्दी महामार्ग बनवा नंतर नावाची भांडणे करा असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. समृध्दी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दयावे अशी मागणी शिवसेनेने तर भाजपने माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची …
Read More »मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्याची शिफारस निर्णय मात्र राज्य सरकारच्या हातात
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लावण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक निकषाच्या आधारे मराठा समाज मागस असल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गाखाली किंवा स्वतंत्ररित्या किमान ९ ते १० टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यास राज्य मागासवर्गीय आय़ोगाने सहमती दर्शविल्याची माहिती आयोगाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. आयोगाकडून राज्यातील जवळपास ४५ …
Read More »राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आता ६५ वर्षे दोन लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अंगणवाडी केंद्रात काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सुमारे दोन लाख कर्मचारी अंगणवाडी सेवेत कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसंदर्भात …
Read More »२६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर संविधान सप्ताह सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान संविधान सप्ताह साजरा करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. संविधान सप्ताह आयोजित करण्याबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी बडोले बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे …
Read More »सामाजिक वातावरण खराब करणाऱ्या शक्तीच्याविरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आदेश
मुंबईः प्रतिनिधी जाती-जातीमध्ये…धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे आणि गावागावात चुकीचे संदेश पोचवण्याचे काम केले जात असल्यामुळे देशात आज खराब आणि भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे…या शक्तीच्याविरोधात सामना करण्यासाठी तयार होतानाच आपल्याला नेहरु,मौलाना आजाद,आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मौलाना …
Read More »सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सतत अग्रेसर होता. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु, भाजप-शिवसेनेच्या काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले असून, यंदा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर घसरला आहे. भाजप शिवसेना सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले …
Read More »स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या नाव देण्याच्या मागणीने शिवसेनेची भाजपवर कुरघोडी समृध्दी महामार्गाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेने युती करावी यासाठी एकाबाजूला भाजपकडून मिनत्या सुरु आहेत. त्यास पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यास अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. मात्र नियोजित नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचे घाटत असतानाच शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya