Editor

चार महिन्यानंतर विधिमंडळाच्या समित्या जाहिर लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी विजय वडेट्टीवार

राज्य सरकारकडून मागील कालावधीतील केलेल्या चूकीत सुधारणा करत यावेळी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सत्तेवर आपली पूर्ण मांड व्यवस्थित बसविल्यानंतर आणि चार महिन्याच्या कालावधीनंतर राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यावरील नियुक्त्या जाहिर केल्या आहे. विशेष म्हणजे या समित्यांवर महायुतीतील आमदारांचाच वरचष्मा कसा राहिल याकडे महायुती सरकारने लक्ष दिले आहे. राज्य विधिमंडळाच्या विविध समित्या …

Read More »

जिंदाल स्टेनलेस महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटींची गुंतवणूक करणार उद्योजक रतन जिंदाल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव

जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प उभा करणार आहे. यातून सुमारे साडे पंधरा हजार रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याने, या प्रकल्पाचे महाराष्ट्रात स्वागत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचे अध्यक्ष रतन जिंदाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. …

Read More »

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला… ११ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या शीर्षकापासूनच लक्ष वेधून घेणाऱ्या आगामी मराठी चित्रपटाच्या उत्सुकता वाढवणाऱ्या टिझर मागोमाग आता ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात एका नव्या विषयावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. चित्रपटाचा विषय ‘पावटॉलॉजी’ आहे. हे नेमके काय? याचे ‘इन्स्टिट्यूट’ कसे असू शकते? ‘पावटे’ म्हणजे काय? त्यांना …

Read More »

प्रकाश आंबेडकर फडणवीसांना म्हणाले, राजदंड उचलतो, त्याला राज्य चालविता आलं पाहिजे संभाजी भिडे आणि लक्ष्मण हाके यांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटविण्यावरून माजी खासदार संभाजी राजे या भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिकेला संभाजी भिडे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना अटलबिहारी यांच्या वक्तव्याची आठवण करून देत म्हणाले की, ज्याला राजदंड उचलता येतो त्याला …

Read More »

अमित शाह यांचे आश्वासन, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणाऱ्यांवर कारवाई संसदेत इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक बिलावर बोलताना केले स्पष्टीकरण

पर्यटक म्हणून किंवा शिक्षण, आरोग्यसेवा आणि व्यवसायासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे, परंतु देशाला धोका निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी (२७ मार्च २०२५) दिले. अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, मुख्य मुद्दा असा आहे की स्थलांतर हा एक वेगळा विषय …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, कोस्टल रोड लगतची जागा विकास आराखड्यासाठी आरक्षित करा सार्वजनिक उद्यान व किनारी वन म्हणून विकास आराखड्यात आरक्षित करा

मुंबई कोस्टल रोडच्या निर्मितीसाठी अरबी समुद्रातून १११ हेक्टरपेक्षा जास्त जमीन समुद्र किनारी भरावाद्वारे विकसित करण्यात आली आहे. ही नव्याने विकसित झालेली जमीन मुंबईकरांच्या हक्काची आणि हिरवळीची जागा म्हणून जपली गेली पाहिजे, त्यासाठी या जमिनीला ‘सार्वजनिक उद्यान’ आणि ‘किनारी वन’ म्हणून मुंबईच्या विकास आराखड्यात राखीव करण्यात यावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी …

Read More »

मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश जाणून घ्या सरकारची नवी नियमावली

मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वीत करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामाकरीता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, कामगारांचे शोषण गाव खेड्यापर्यंत पोहचले… खाजगीकरणामुळे कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न, भविष्यातील संकटे ओळखून लढा द्या

कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती, आपल्या हक्कांसाठी चक्का जामचा नारा दिला तर बंद होत होता पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक उद्योग बंद पडत आहे आणि जे आहेत त्यात आऊटसोर्सिंग व कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाते, यातून शोषणाचे प्रमाण वाढत आहे. हे शोषण फक्त शहरात होत नाही तर ते …

Read More »

मुंबईतील गृहसंकुल पुनर्विकासासाठी महाप्रित – एनबीसीसी यांच्यात सामंजस्य करार मुंबईत सुमारे ५६ एसआरए प्रकल्प महाप्रीत राबविणार

महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) व एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड, नवी दिल्ली गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारची नवरत्न कंपनी  यामध्ये विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्याकरिता मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला. एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड या कंपनीची मोठे गृहनिर्माण प्रकल्प, आयटी इमारतींचे बांधकाम तसेच स्वदेशात आणि परदेशात …

Read More »

संजय निरूपम यांचा आरोप, दिशा सालियन हत्येमागे सेलिब्रेटींचे ड्रग्ज रॅकेट आदित्य ठाकरेनी सुप्रीम कोर्टात खोटी माहिती दिली

दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रेटिंगचे ड्रग्ज रॅकेट आहे. सतीश सालियन यांनी नव्याने केलेले आरोप गंभीर असून त्यांच्या तक्रारीवर लवकरच मालवणी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ नोंदवला जाईल, असा दावा शिंदे गटाचे शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. दिशा सालियन हत्याकांडात उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची मोठी भूमिका असल्याचे पुरावे …

Read More »