Editor

राज्यपालांचे आदेश, आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करा राज्यात आदर्श आदिवासी गाव ही कल्पना देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण

आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आदिवासी बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा आणि उत्तम सेवा देवून आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे,असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, शिवाजी महाराजांच नाव वापरायचं… सन्मानाबाबत घेणेदेणे नाही पुतळ्याचे अनावरण करायचे हेच सत्ताधाऱ्यांचे ध्येय

मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना काळजी घेतली गेली नाही. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा ८ महिन्यातच कोसळला मालमणमधील सिंधुदूर्ग किल्याच्या किनारी वसविण्यात आलेला पुतळा

नौदल दिनाचे औचित्य साधत भारतीय नौदलाचे पहिले संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मालवण येथील सिंधूदुर्ग किल्ल्याच्या समुद्र किनारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले. तसेच त्यादिवशी नौदलाचे संचलनही झाले. या पुतळा अनावरणास आठ महिन्याचा कालावधी पूर्ण झाला नाही तोच हा पुतळा कोसळून पडल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र पुतळा …

Read More »

अनिवासी भारतीयांना आयकर विभागाकडून नोटीसा परदेशी मालमत्तेतून कमाई असल्याच्या संशय

अनिवासी भारतीयांना (एनआरआय) आयकर विभागाच्या तपास युनिटकडून त्यांच्या विदेशी वित्तीय संस्थांसोबतच्या संबंधांची चौकशी करण्यासाठी समन्स प्राप्त होत आहेत. करनिर्धारकांना परदेशात खाते उघडल्यापासून ते कोणत्या वर्षात परदेशी खाते उघडले होते आणि त्यांची निवासी स्थिती आणि खाते सुरू झाल्यापासूनच्या पासपोर्टच्या प्रतींची माहिती देण्यास सांगितले आहे. हे खाते परदेशातील निधी किंवा परदेशी बँकेतील …

Read More »

अनिल अंबानी सेबीच्या आदेशा विरुद्ध कायदेशीर पावले उचलण्याची शक्यता सेबीच्या आदेशाचे पुनरावलोकन सुरु

अनिल अंबानी यांना भांडवली बाजारातून पाच वर्षांसाठी बंदी सेबीने घातली आहे. या आदेशाच्या विरोधात अनिल अंबानी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या आदेशाचे पुनरावलोकन करत असल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने रविवारी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली. २२ ऑगस्ट २०२४ रोजी जारी करण्यात आलेली ही बंदी अंबानी आणि इतर २४ जणांविरुद्ध …

Read More »

एनबीसीसी कंपनीकडून रेकॉर्ड ब्रेक डिव्हिडंड वाटप करणार प्रती शेअर २०० रूपयाहून अधिकचा डिव्हीडंड देणार असल्याची चर्चा

एनबीसीसी NBCC India चे शेअर्स ६ सप्टेंबर २०२४ रोजी फर्मने अंतिम लाभांशासाठी रेकॉर्ड डेट घोषित केल्यापासून चर्चेत आहेत. कंपनीने प्रत्येक पेड अप इक्विटी शेअरसाठी ०.६३ रुपये लाभांश जाहीर केला होता. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन. एका वर्षात स्टॉक २५२.३३% वाढला आहे आणि दोन वर्षात ४४३.७५% वाढला आहे. तथापि, …

Read More »

केजी बसिन मध्ये नैसर्गिक वायु साठ्याची आणखी एक विहीर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती

सरकारी मालकीच्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ने रविवारी सांगितले की त्यांनी बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यात त्याच्या प्रमुख खोल समुद्र प्रकल्पावर आणखी एक विहीर सापडली आहे, त्यामुळे देशातंर्गत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. जानेवारीमध्ये, ओएनजीसी ONGC ने KG-DWN-98/2 किंवा KG-D5 ब्लॉकमधून तेलाचे उत्पादन …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसह घेतले हे महत्वाचे निर्णय गटप्रवर्तकाच्या मानधनातही केली वाढ

आज रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काही नव्या मतदार वर्गाला आकर्षित करण्याच्या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या वास्तविक २० ऑगस्टपर्यंत कराव्यात असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला देण्यात आले होते. मात्र ह्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत करण्याचा निर्णय राज्य …

Read More »

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार: योजनेचा विस्तार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० राबविण्यात येत …

Read More »

श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या संरजाम जमिनींची सूट कायम राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

श्रीमंत उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या संरजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना तहहयात सुरु ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे राज्याच्या इतिहासातील अनन्य साधारण महत्त्व विचारात घेऊन व श्रीमंत भोसले कुटुंबियांची उपजिविका यांच्या दर्जानुसार व्हावी यासाठी …

Read More »