Breaking News

दिल्ली भेटीत मुख्यमंत्री शिंदेंकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरे विकास मंत्री यांची भेट

वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ‘ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प’ काळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ६ ऑक्टोंबर रोजी केंद्रीय शहरे विकासमंत्र्यांसमोर मांडला. …

Read More »

निवडणूक आयोगासमोरील आजचा युक्तीवाद पवार विरूध्द पवार चा अजित पवार गटाकडून शिवसेनेच्या निकालाचा संदर्भ

राज्याच्या राजकारणातील अभेद्य अशा पवार घराण्याचा प्रमुख सहभाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली. समर्थक आमदारांनी कोण कोणासोबत हे जाहिर केल्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नवी दिल्लीतील कार्यालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी वेळी अजित पवार गटाचे वकील महेश जेठमलानी आणि काही नेते उपस्थित होते. तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल, घरात बसून सरकार चालवणाऱ्यांना बोलण्याचा काय अधिकार? चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवरून सरकार चालवले त्यांना रजेच्या मुख्यमंत्र्यांवर बोलण्याचा अधिकार आहे काय असा सवाल आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला अडीच वर्षे घरात बसून होते ते आज प्रश्न विचारतात हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार असा टोलाही बावनकुळे यांनी ठाकरे …

Read More »

भाजपाने अति केले तर त्याचे परिणाम…..नाना पटोले यांचा खणखणीत इशारा भाजपाची रावणप्रवृत्ती बदनामी करण्यावर उतरली

हिंदु-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करुन तसेच जाती-जातीमध्ये द्वेष पसरवून सत्तेच्या जोरावर भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र संविधान, लोकशाही व देशातील एकता व अखंडता कायम रहावी यासाठी संघर्ष करत आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुलजींनी भाजपाच्या हुकूमशाही व्यवस्थे विरोधात जनतेत जागृती व विश्वास निर्माण केला. राहुलजींची वाढती …

Read More »

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

गोरेगावच्या उन्नतनगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत व त्यांच्या कुटुंबियांच्याप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही …

Read More »

मोठी बातमीः नागरी सहकारी बँकांना ४ लाख रुपयांपर्यंतचे सोने कर्ज येता येणार नागरी सहकारी बँकांना ४ लाख रुपयांपर्यंतचे सोने कर्ज देण्यास परवानगी

नागरी सहकारी बँकांसाठी एक मोठी बातमी आहे. आरबीआयने नागरी सहकारी बँकांना सुवर्ण कर्ज देण्याची मर्यादा वाढवली आहे. आरबीआच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आरबीआचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ६ ऑक्टोबर रोजी याची घोषणा केली. अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आता चार लाख रुपयांचे सोने कर्ज देऊ शकणार असल्याचे त्यांनी …

Read More »

आरबीआयचा दिलासा, ना वाढ ना घट रेपो दर जैसे थे

रिझर्व्ह बँकेने सलग चौथ्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दर बदलला होता. तेव्हापासून रेपो दर ६.५० टक्के आहे. रेपो दरात बदल न झाल्याने कर्जदारांचा ईएमआय वाढणार नाही. यावेळीही आरबीआय दर कायम ठेवेल, अशी अपेक्षा बाजाराला होती. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज शुक्रवार, ६ …

Read More »

रुद्रा ग्लोबल इन्फ्राकडून बोनस शेअर्स जाहीर २७०.९३ कोटी रूपयांचे बाजार भांडवल

रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्सने त्यांच्या भागधारकांसाठी बोनस शेअर्स जाहीर केला आहे. याशिवाय स्टॉक स्प्लिटही जाहीर केले आहे. रुद्रा ग्लोबल इन्फ्राच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मोठा नफा दिला आहे. हा शेअर्स मल्टीबॅगर ठरला आहे. कंपनीचे बाजार भांडवल २७०.९३ कोटी रुपये आहे. रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्सने बोनस इश्यूद्वारे 1:1 च्या प्रमाणात इक्विटी …

Read More »

भेलने सरकारला दिला ८८ कोटी रुपयांचा अंतिम लाभांश तपशील जाणून घ्या

सरकारी अभियांत्रिकी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजे भेलने आपला नफा सरकारला दिला आहे. भेलने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश म्हणून केंद्र सरकारला ८८ कोटी रुपये दिले आहेत. भेलमध्ये भारत सरकारचा ६३.१७ टक्के हिस्सा आहे. लाभांशाचा धनादेश आज भेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नलिन शिंघल यांनी केंद्रीय अवजड उद्योग …

Read More »

विलंबित आयटीआर कोणी भरावा आणि अंतिम मुदत काय? दंडासह इतर नियम जाणून घ्या

तुमची आयटीआर भरण्याची ३१ जुलैची अंतिम मुदत चुकली असेल, तर तुम्ही विलंबित आयटीआर दाखल करून आयकर विभागाची कारवाई टाळू शकता. आयकर विभागाने अशा करदात्यांना विलंबित आयटीआर भरण्याची संधी दिली आहे आणि त्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे. मात्र, उशीरा आयटीआरसाठी दंड भरावा लागेल. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी …

Read More »